शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

वॉर्डाचा कानोसा -१

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

फोटो आहे... वॉर्डाचा कानोसा..-------------- पिवळी नदी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात कारखान्यामुळे प्रदूषण वाढले : २० वसाहतींना धुराचा फटका गरीबनवाजनगर : आशीनगर झोन अंतर्गत येत असलेल्या गरीबनवाजनगर प्रभागांतर्गत येणाऱ्या पिवळीनदी परिसरातील कारखान्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात प्रदूषण वाढले आहे. तब्बल २० वसाहतींना या धुराचा फटका बसत असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले ...


फोटो आहे...

वॉर्डाचा कानोसा..
--------------


पिवळी नदी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कारखान्यामुळे प्रदूषण वाढले : २० वसाहतींना धुराचा फटका


गरीबनवाजनगर :
आशीनगर झोन अंतर्गत येत असलेल्या गरीबनवाजनगर प्रभागांतर्गत येणाऱ्या पिवळीनदी परिसरातील कारखान्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात प्रदूषण वाढले आहे. तब्बल २० वसाहतींना या धुराचा फटका बसत असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पिवळी नदी परिसरात ३० पेक्षा अधिक कंपन्या आहेत. यातील काही कंपन्यांचा धूर सोडणाऱ्या चिमण्या या खूप कमी उंचीवर आहे. त्यामुळे परिसरातील २० ते २२ वसाहतींना या धुराचा फटका बसतो आहे. या धुरामुळे धम्मानंदनगर, भीमवाडी, बम्लेश्वरीनगर, एकता नगर, पिवळी नदी, उप्पलवाडी, रमाईनगर, अरविंदनगर, संघर्षनगर, हामीदनगर, संगमनगर, वांजरा परिसर, पवननगर, यशोधरानगर या वस्तीतील नागरिक त्रस्त आहेत. साधारणत: २० ते २५ हजार नागरिकांना या प्रदूषणाचा त्रास होत आहे.
पिवळी नदीला लागून हे कारखाने आहेत. तर दुसऱ्या बाजुला वस्त्या आहेत. या परिसरात वीटभट्ट्याचे कारखाने, कोल डेपो, प्लास्टर ऑफ पॅरिस, सिमेंट वर्क रंग तयार करणे, इस्पातसारखे मोठे कारखाने आहेत. काही कंपन्यांमध्ये धूर बाहेर फेकणाऱ्या चिमण्या आहेत. चिमण्या या किमान १०० फूट उंचीवर असायला हव्या, परंतु काही कारखान्यामधील चिमण्या या कमी उंचीच्या आहेत. या कारखान्यामुळेच पिवळी नदी संपूर्णपणे प्रदूषित झाली आहे. आता विहीर आणि बोअरवेलचे पाणीसुद्धा प्रदूषित होऊ लागले आहे. परिसरातील नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहेत. तेव्हा याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

बॉक्स...

शारदा चौक ते कळमना पुलापर्यंतचे पथदिवे बंद

कळमना : शारदा कंपनी चौक ते कळमना पूल रिंगरोडपर्यंतचे पथदिवे बंद पडले आहेत. रात्री सर्वत्र अंधार असतो. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक चालत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. दुचाकी आणि पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागते. महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.