शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

प्रभाग क्र. ५४

By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST

मूलभूत सुविधांचीही वानवा

मूलभूत सुविधांचीही वानवा
इंदिरानगर : महापालिकेत गेल्या निवडणुकीत नव्याने झालेला प्रभाग म्हणजे प्रभाग ५४ होय. हा प्रभाग मनपाचा सर्वांत लहान प्रभाग म्हणून ओळखला जातो. सुमारे २८०० मतदारांचा हा प्रभाग आहे.
प्रभाग ५४ मध्ये श्रद्धाविहार, श्रद्धा गार्डन, कलानगर, रंगरेज मळा, शिव कॉलनी, पांडवनगरी, सावित्रीबाई वसाहत, पिंगूळबागसह परिसर आहे. या प्रभागात सर्वांत जास्त झोपड्या विखरलेला मतदार आहे. यामुळे प्रभागात विकास झालाच नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
श्रद्धाविहार कॉलनी, पांडवनगरी, परिसरात गेल्या दहा वर्षांपासून अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही, तर काही भागांत अद्याप रस्त्यांचे साधे खडीकरणही झालेले नाही. तसेच कलानगर परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तसेच अवेळी येणार्‍या पाण्यामुळे महिलावर्गाची गैरसोय होत आहे. पाणीपुरवठ्याची वेळ बदलण्याची मागणी धूळखात पडून आहे.
परिसरात बालगोपाळांसाठी उद्यान आणि क्रीडांगण नाही, तर श्रद्धाविहार कॉलनी व शिव कॉलनीसह काही भागांत असलेल्या मनपाच्या भूखंडांना संरक्षक भिंती बांधण्याचा सपाटाच लावला आहे, परंतु भूखंड विकसित न केल्याने हे भूखंड म्हणजे केरकचर्‍याचे माहेरघर बनले आहे.
घंटागाडी नियमित येत नसल्याने श्रद्धा गार्डनमधील रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक विहीर केरकचर्‍याने भरली आहे. हा केरकचरा कुजल्याने घाण व दुर्गंधी पसरून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच पांडवनगरी बसथांब्यापासून ते शिवकॉलनी, रंगरेज मळ्यासह परिसरातून गेलेल्या पावसाळी नाल्यात भूमिगत गटारीचे पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे घाण आणि दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच स्वच्छता कर्मचारीअंतर्गत रस्त्यांवर फिरकत नसल्याने बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.

नागरिकांच्या प्रतिक्रिया
दुर्गंधीचे साम्राज्य
घंटागाडी आणि स्वच्छता कर्मचारी अनियमित येतात. यामुळे परिसरातील मोकळ्या भूखंडावर केरकचरा टाकण्यात येत असल्याने घाण व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मनपाच्या मोकळ्या भूखंडावर संरक्षक भिंती बांधून विकसित करण्यात आले नाही. तसेच टवाळखोरांचा उपद्रव नागरिकांना होतो.
- उज्ज्वला दळे, शिवकॉलनी
पाण्याची वेळ चुकीची
महिलांचा रात्री ८ वाजेची स्वयंपाक करण्याची वेळ आणि त्याचवेळी पाणी येत असल्याने महिलांची गैरसोय होते. परिसरात उद्याने व क्रीडांगण विकसित करण्याची आवश्यकता आहे. औषध व धूरफवारणी होतच नाही.
- जिभाऊ खैरनार, रंगरेज मळा

रस्ते गेले खड्ड्यात
परिसर विकासापासून अद्यापही वंचित आहे. परिसरातील रस्त्यास दहा वर्षे होऊन गेले आहेत. त्यामुळे रस्ते खड्ड्यात हरविले आहे. त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. बंगले आणि सोसायटीचे रॅप तपासणी गरजेचे आहे. घंटागाडी अनियमित येत असल्याने घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
- राजेश कंकरेज, श्रद्धा गार्डन
पथदीपांअभावी अंधार
परिसरातील अंतर्गत रस्ते खडीकरण आणि डांबरी करण्याच्या प्रतीक्षेत आहे. तसेच काही भागांत पथदीपअभावी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
- संतोष पजई, पांडवनगरी
चोर्‍यांमध्ये वाढ
परिसरात भुरट्या चोर्‍या आणि सोनसाखळी चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बालगोपाळांसाठी उद्याने आणि क्रीडांगणे नाहीत. कमी दाबाने अपरात्री येणार्‍या पाण्यामुळे महिलांची तारांबळ उडत आहे. साफसफाई होत नाही.
- गायत्री खोडे
नाल्यात गटारींचे पाणी
पावसाळी नाल्यात भूमिगत गटारींचे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच औषध आणि धूर फवारणी होत नाही.
- सुधीर पानूरकर