शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग क्र. ५४

By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST

मूलभूत सुविधांचीही वानवा

मूलभूत सुविधांचीही वानवा
इंदिरानगर : महापालिकेत गेल्या निवडणुकीत नव्याने झालेला प्रभाग म्हणजे प्रभाग ५४ होय. हा प्रभाग मनपाचा सर्वांत लहान प्रभाग म्हणून ओळखला जातो. सुमारे २८०० मतदारांचा हा प्रभाग आहे.
प्रभाग ५४ मध्ये श्रद्धाविहार, श्रद्धा गार्डन, कलानगर, रंगरेज मळा, शिव कॉलनी, पांडवनगरी, सावित्रीबाई वसाहत, पिंगूळबागसह परिसर आहे. या प्रभागात सर्वांत जास्त झोपड्या विखरलेला मतदार आहे. यामुळे प्रभागात विकास झालाच नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
श्रद्धाविहार कॉलनी, पांडवनगरी, परिसरात गेल्या दहा वर्षांपासून अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही, तर काही भागांत अद्याप रस्त्यांचे साधे खडीकरणही झालेले नाही. तसेच कलानगर परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तसेच अवेळी येणार्‍या पाण्यामुळे महिलावर्गाची गैरसोय होत आहे. पाणीपुरवठ्याची वेळ बदलण्याची मागणी धूळखात पडून आहे.
परिसरात बालगोपाळांसाठी उद्यान आणि क्रीडांगण नाही, तर श्रद्धाविहार कॉलनी व शिव कॉलनीसह काही भागांत असलेल्या मनपाच्या भूखंडांना संरक्षक भिंती बांधण्याचा सपाटाच लावला आहे, परंतु भूखंड विकसित न केल्याने हे भूखंड म्हणजे केरकचर्‍याचे माहेरघर बनले आहे.
घंटागाडी नियमित येत नसल्याने श्रद्धा गार्डनमधील रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक विहीर केरकचर्‍याने भरली आहे. हा केरकचरा कुजल्याने घाण व दुर्गंधी पसरून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच पांडवनगरी बसथांब्यापासून ते शिवकॉलनी, रंगरेज मळ्यासह परिसरातून गेलेल्या पावसाळी नाल्यात भूमिगत गटारीचे पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे घाण आणि दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच स्वच्छता कर्मचारीअंतर्गत रस्त्यांवर फिरकत नसल्याने बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.

नागरिकांच्या प्रतिक्रिया
दुर्गंधीचे साम्राज्य
घंटागाडी आणि स्वच्छता कर्मचारी अनियमित येतात. यामुळे परिसरातील मोकळ्या भूखंडावर केरकचरा टाकण्यात येत असल्याने घाण व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मनपाच्या मोकळ्या भूखंडावर संरक्षक भिंती बांधून विकसित करण्यात आले नाही. तसेच टवाळखोरांचा उपद्रव नागरिकांना होतो.
- उज्ज्वला दळे, शिवकॉलनी
पाण्याची वेळ चुकीची
महिलांचा रात्री ८ वाजेची स्वयंपाक करण्याची वेळ आणि त्याचवेळी पाणी येत असल्याने महिलांची गैरसोय होते. परिसरात उद्याने व क्रीडांगण विकसित करण्याची आवश्यकता आहे. औषध व धूरफवारणी होतच नाही.
- जिभाऊ खैरनार, रंगरेज मळा

रस्ते गेले खड्ड्यात
परिसर विकासापासून अद्यापही वंचित आहे. परिसरातील रस्त्यास दहा वर्षे होऊन गेले आहेत. त्यामुळे रस्ते खड्ड्यात हरविले आहे. त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. बंगले आणि सोसायटीचे रॅप तपासणी गरजेचे आहे. घंटागाडी अनियमित येत असल्याने घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
- राजेश कंकरेज, श्रद्धा गार्डन
पथदीपांअभावी अंधार
परिसरातील अंतर्गत रस्ते खडीकरण आणि डांबरी करण्याच्या प्रतीक्षेत आहे. तसेच काही भागांत पथदीपअभावी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
- संतोष पजई, पांडवनगरी
चोर्‍यांमध्ये वाढ
परिसरात भुरट्या चोर्‍या आणि सोनसाखळी चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बालगोपाळांसाठी उद्याने आणि क्रीडांगणे नाहीत. कमी दाबाने अपरात्री येणार्‍या पाण्यामुळे महिलांची तारांबळ उडत आहे. साफसफाई होत नाही.
- गायत्री खोडे
नाल्यात गटारींचे पाणी
पावसाळी नाल्यात भूमिगत गटारींचे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच औषध आणि धूर फवारणी होत नाही.
- सुधीर पानूरकर