शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

युद्ध केवळ सीमांवर नाही, देशात अनेक आघाड्यांवर लढले जाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 05:05 IST

‘मन की बात’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : युद्धासारख्या परिस्थितीत आपण खूपच विचार करून बोलले पाहिजे. कारण, याचा सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. आजकाल युद्ध केवळ सीमेवर नाही, तर देशातही अनेक आघाड्यांवर सोबतच लढले जाते आणि प्रत्येक देशवासीयास यात आपली भूमिका निश्चित करावी लागते, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

आकाशवाणीवरील आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, कारगिल युद्ध म्हणजे भारताच्या मैत्रीच्या मोबदल्यात शेजारी देशाने पाठीत खंजीर खुपसल्याचा परिणाम होता. युद्धाच्या परिस्थितीत जपून बोलले पाहिजे. आमचे आचार, व्यवहार, वाणी, मर्यादा याकडे लक्ष असायला हवे.

मोदी म्हणाले की, कधी-कधी विचार न करता सोशल मीडियावरून अशा गोष्टींना प्रोत्साहन दिले जाते, ते देशासाठी नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे देशातील नागरिकांनी आपली भूमिका योग्य रीतीने पार पाडावी. चीनसोबत संघर्ष सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्याने सरकारला लक्ष्य करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या वक्तव्यांना महत्त्व आहे.

मोदी म्हणाले की, महात्मा गांधीजींचा मंत्र होता की, आपण जे काही करीत आहोत, त्यामुळे देशातील सर्वात गरीब आणि असहाय व्यक्तीबाबत विचार करायला हवा. त्यामुळे त्या व्यक्तीचे भले होणार की नाही? हाच विचार पुढे नेऊन अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की, काही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही हा विचार करायला हवा की, आमचे पाऊल त्या सैनिकांसाठी योग्य आहे की नाही, ज्या सैनिकाने दुर्गम डोंगरी भागात आपल्या प्राणांची आहुती दिली.कोरोनाचा धोका संपला नाहीच्मोदी म्हणाले की, कोरोनाचा धोका संपला नाही. सुरुवातीला होता तेवढाच तो आजही घातक आहे; पण यातून बाहेर पडण्याचा दर अन्य देशांच्या तुलनेत चांगला आहे. मृत्यूदरही अनेक देशांच्या तुलनेत कमी आहे. यंदा १५ आॅगस्टही कोरोनामुळे वेगळ्या परिस्थितीत होणार आहे.च्स्वातंत्र्यदिनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प करा, काही नवे शिकण्याचा संकल्प करा, आपल्या कर्तव्याचे पालन करण्याचा संकल्प करा.अफगाणिस्तानमध्ये ६,००० ते ६,५०० पाकिस्तानी अतिरेकी सक्रियच्संयुक्त राष्टÑ : पाकिस्तानचे सुमारे6,००० ते 6,5००अतिरेकी शेजारी देश अफगाणिस्तानमध्ये सक्रिय आहेत व त्यातील बहुतांश तहरिक- ए- तालिबान पाकिस्तानचे (टीटीपी) आहेत आणि ते दोन्ही देशांसाठी धोकादायक आहेत, असे संयुक्त राष्टÑांच्या अहवालात म्हटले आहे.च्आयएसआयएस, अल-कायदा व संबंधित व्यक्ती व संस्थांशी संबंधित विश्लेषणात्मक सहाय्यता व प्रतिबंध निगराणी पथकाच्या २६ व्या अहवालात म्हटले आहे की, भारतीय उपमहाद्वीपमध्ये अल-कायदा तालिबानच्या अंतर्गत अफगाणिस्तानच्या निमरूज, हेलमंद व कंदाहार प्रांतात कारवाया करते.150 ते 200 अतिरेकी या संघटनेत बांगलादेश, भारत, म्यानमार व पाकिस्तानचे आहेत. एक्यूआयएसचा म्होरक्या ओसामा महमूद असून, त्याने आसीम उमर याची जागा घेतली आहे. एक्यूआयएस आपल्या पूर्वीच्या म्होरक्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मोठा कट रचत आहे, असेही अहवालात म्हटले आहे.च्अफगाणिस्तानातील सर्वांत मोठी अतिरेकी संघटना टीटीपीने पाकमध्ये अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली आहे. संघटनेला जमात- उल- अहरार व इतर संघटनांनी मदत केली आहे.च्टीटीपीचे यापूर्वीचे अनेक अतिरेकी स्टेट इन इराक अँड द लॅवेंट खुरासानमध्ये सामील झालेले आहेत. इतरही अनेक अतिरेकी संघटना मिळून काम करतील, अशी संयुक्त राष्टÑसंघाला शंका आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी