शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

मोदी-शहांविरुद्धच्या लढाईत 'आप'ण जिंकलो, मी पराभूत नसून 'शहीद' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 18:08 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2020मध्ये पुन्हा एकदा मोठा विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या 8 उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामध्ये, करावलनगर मतदारसंघातील केजरीवाल यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय दुर्गेश पाठक पराभूत झाले आहेत. मात्र, पराभवानंतरही त्यांनी कार्यकर्ते आणि सहकारी मित्रांना मोठा धीर दिला. विशेष म्हणजे, पराभवानंतरही त्यांनी मोठ्या हिंमतीने भाषण करत, मी जरी हरलो तरी 'आप'ण जिंकलो हे महत्वाचं असल्याचं दुर्गेश यांनी म्हटलंय. 

आपली लढाई ही मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात होती. आपली लढाई ही दोन विचारांची लढाई होती. लढाई लढताना काही सैनिक शहीद होत असतात, शहीद सैनिकांचं दु:ख न बाळगता त्यांचा अभिमान-गर्व बाळगला पाहिजे, असे दुर्गेश यांनी म्हटले. कारण, सैनिक जरी शहीद झाले तरी आपण लढाई जिंकली आहे. मोदी अन् शहा यांचा चांगलाच हिसका दाखवलाय, असेही त्यांनी म्हटले. आपण या पराभवाचा नक्कीच बदला घेऊ, दोन वर्षांनी आणखी एक निवडणूक होईल, त्यावेळी पाचही जागा जिंकायच्या आहेत. आता, त्याच काम आपल्याला करायचंय. मी जरी पराभूत झालो असलो तरी, मी तुम्ही म्हणाल तिथं काम करणार. आमदार असो किंवा नसो तुमच्यासाठी सर्वकाही करेल, असे म्हणत दुर्गेश यांनी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला.    

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2020मध्ये पुन्हा एकदा मोठा विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतल्या रामलीला मैदानात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यामुळे, केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत.  दिल्ली विधानसभा निवडणुकी 2015च्या निवडणुकांसारखाच यंदाही आपने मोठा विजय मिळवला. आपनं 62 जागांवर विजय मिळवलेला असून, गत निवडणुकीच्या तुलनेत 5 जागा कमी झालेल्या आहेत. भाजपाला या निवडणुकीत 8 जागाच राखता आल्या. तर काँग्रेसच्या 67 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. निवडणूक निकालाचं विश्लेषण करताना मनिष सिसोदिया यांनी भाजपवर शरसंधान साधले.  

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालVotingमतदानMartyrशहीदNarendra Modiनरेंद्र मोदी