शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

काळ्या पैशाविरुद्धचे युद्ध सुरूच राहील

By admin | Updated: April 10, 2017 23:52 IST

काळ्या पैशाविरोधातील युद्ध एखाद्या कारवाईने संपत नाही तर मोदी सरकार या संदर्भात आणखी पावले उचलणार आहे, असे केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी म्हटले.

नवी दिल्ली : काळ्या पैशाविरोधातील युद्ध एखाद्या कारवाईने संपत नाही तर मोदी सरकार या संदर्भात आणखी पावले उचलणार आहे, असे केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी म्हटले. तमिळनाडूतील आर. के. नगर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूक निवडणूक आयोगाने तेथे पैशांचा वापर होत असल्याच्या कारणावरून रद्द केली. या निर्णयाचे नायडू यांनी समर्थन केले. पैशांचा वापर होत असल्याचे आरोप होत असताना निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द करून योग्य निर्णय घेतला, असे सांगून नायडू यांनी काँग्रेसच्या राजवटीत हजारो कोटी रुपयांचे घोटाळे झाले व त्यामुळेच काळा पैसा तयार झाला, अशा शब्दांत काँग्रेसवर हल्ला केला.इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) फेरफार केले जात असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप नायडू यांनी फेटाळला. मतदारांनी आपल्याला नाकारल्यामुळे आपला पराभव झाला हे ते स्वीकारत नाहीत. उलट विरोधकांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे नायडू म्हणाले. चिदंबरम यांची टीका - आर. के. नगर मतदार संघातील पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा हा अपेक्षित परिणाम आहे का, असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला. - नोटाबंदीच्या निर्णयाने आम्ही काळा पैसा संपवला आहे, असे आम्हाला सांगितले गेले होते. आर. के. नगर मतदार संघात वाटले गेलेले पैसे पांढरे होते का?, असे चिदंबरम टिष्ट्वटरवर म्हणाले. आर. के. मतदार संघात १२ एप्रिल रोजी मतदान होणार होते. पैशांचा वापर करून पक्षांनी निवडणूक प्रक्रिया दूषित करून टाकली असल्याचे ते म्हणाले.- ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना मोदी यांनी आता काळापैसा नियंत्रणात येईल व इतरही सकारात्मक परिणाम होतील, असे सांगितले होते, असे चिदंबरम म्हणाले. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनामुळे आर. के. नगर मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर झाली होती.