शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

काळ्या पैशाविरुद्धचे युद्ध सुरूच राहील

By admin | Updated: April 10, 2017 23:52 IST

काळ्या पैशाविरोधातील युद्ध एखाद्या कारवाईने संपत नाही तर मोदी सरकार या संदर्भात आणखी पावले उचलणार आहे, असे केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी म्हटले.

नवी दिल्ली : काळ्या पैशाविरोधातील युद्ध एखाद्या कारवाईने संपत नाही तर मोदी सरकार या संदर्भात आणखी पावले उचलणार आहे, असे केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी म्हटले. तमिळनाडूतील आर. के. नगर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूक निवडणूक आयोगाने तेथे पैशांचा वापर होत असल्याच्या कारणावरून रद्द केली. या निर्णयाचे नायडू यांनी समर्थन केले. पैशांचा वापर होत असल्याचे आरोप होत असताना निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द करून योग्य निर्णय घेतला, असे सांगून नायडू यांनी काँग्रेसच्या राजवटीत हजारो कोटी रुपयांचे घोटाळे झाले व त्यामुळेच काळा पैसा तयार झाला, अशा शब्दांत काँग्रेसवर हल्ला केला.इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) फेरफार केले जात असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप नायडू यांनी फेटाळला. मतदारांनी आपल्याला नाकारल्यामुळे आपला पराभव झाला हे ते स्वीकारत नाहीत. उलट विरोधकांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे नायडू म्हणाले. चिदंबरम यांची टीका - आर. के. नगर मतदार संघातील पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा हा अपेक्षित परिणाम आहे का, असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला. - नोटाबंदीच्या निर्णयाने आम्ही काळा पैसा संपवला आहे, असे आम्हाला सांगितले गेले होते. आर. के. नगर मतदार संघात वाटले गेलेले पैसे पांढरे होते का?, असे चिदंबरम टिष्ट्वटरवर म्हणाले. आर. के. मतदार संघात १२ एप्रिल रोजी मतदान होणार होते. पैशांचा वापर करून पक्षांनी निवडणूक प्रक्रिया दूषित करून टाकली असल्याचे ते म्हणाले.- ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना मोदी यांनी आता काळापैसा नियंत्रणात येईल व इतरही सकारात्मक परिणाम होतील, असे सांगितले होते, असे चिदंबरम म्हणाले. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनामुळे आर. के. नगर मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर झाली होती.