शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

काळ्या पैशाविरुद्धचे युद्ध सुरूच राहील

By admin | Updated: April 10, 2017 23:52 IST

काळ्या पैशाविरोधातील युद्ध एखाद्या कारवाईने संपत नाही तर मोदी सरकार या संदर्भात आणखी पावले उचलणार आहे, असे केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी म्हटले.

नवी दिल्ली : काळ्या पैशाविरोधातील युद्ध एखाद्या कारवाईने संपत नाही तर मोदी सरकार या संदर्भात आणखी पावले उचलणार आहे, असे केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी म्हटले. तमिळनाडूतील आर. के. नगर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूक निवडणूक आयोगाने तेथे पैशांचा वापर होत असल्याच्या कारणावरून रद्द केली. या निर्णयाचे नायडू यांनी समर्थन केले. पैशांचा वापर होत असल्याचे आरोप होत असताना निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द करून योग्य निर्णय घेतला, असे सांगून नायडू यांनी काँग्रेसच्या राजवटीत हजारो कोटी रुपयांचे घोटाळे झाले व त्यामुळेच काळा पैसा तयार झाला, अशा शब्दांत काँग्रेसवर हल्ला केला.इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) फेरफार केले जात असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप नायडू यांनी फेटाळला. मतदारांनी आपल्याला नाकारल्यामुळे आपला पराभव झाला हे ते स्वीकारत नाहीत. उलट विरोधकांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे नायडू म्हणाले. चिदंबरम यांची टीका - आर. के. नगर मतदार संघातील पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा हा अपेक्षित परिणाम आहे का, असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला. - नोटाबंदीच्या निर्णयाने आम्ही काळा पैसा संपवला आहे, असे आम्हाला सांगितले गेले होते. आर. के. नगर मतदार संघात वाटले गेलेले पैसे पांढरे होते का?, असे चिदंबरम टिष्ट्वटरवर म्हणाले. आर. के. मतदार संघात १२ एप्रिल रोजी मतदान होणार होते. पैशांचा वापर करून पक्षांनी निवडणूक प्रक्रिया दूषित करून टाकली असल्याचे ते म्हणाले.- ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना मोदी यांनी आता काळापैसा नियंत्रणात येईल व इतरही सकारात्मक परिणाम होतील, असे सांगितले होते, असे चिदंबरम म्हणाले. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनामुळे आर. के. नगर मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर झाली होती.