शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

वक्फ सुधारणा विधेयकासाठी JPC स्थापन, लोकसभेचे २१ आणि राज्यसभेचे १० सदस्य सामील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 17:44 IST

waqf act amendment bill 2024 : ही समिती आता वक्फ विधेयकावर विचारमंथन करेल आणि संसदेच्या पुढील अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आपला रिपोर्ट सरकारला सादर करेल.

waqf act amendment bill 2024 : नवी दिल्ली : वक्फ सुधारणा विधेयकासाठी सरकारनं संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन केली आहे. समितीमध्ये एकूण ३१ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये लोकसभेतील २१ आणि राज्यसभेतील १० सदस्यांचा समावेश आहे. ही समिती आता वक्फ विधेयकावर विचारमंथन करेल आणि संसदेच्या पुढील अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आपला रिपोर्ट सरकारला सादर करेल.

समितीमधील लोकसभेच्या सदस्यांमध्ये जगदंबिका पाल, निशिकांत दुबे, तेजस्वी सूर्या दिलीप सैकिया, गौरव गोगोई, इम्रान मसूद, कृष्णा देवरयालू, मोहम्मद जावेद, कल्याण बॅनर्जी, ए राजा, दिलेश्वर कामैत, अरविंद सावंत, नरेश मस्के, अरुण भारती आणि असदुद्दीन ओवेसी यांचा समावेश आहे.  

सरकारनं हे विधेयक लोकसभेत एक दिवस आधी म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी सादर केलं. अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक सभागृहात मांडताच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गदारोळ सुरू केला. काँग्रेससह इंडिया आघाडीत असलेल्या पक्षांनी या विधेयकाला मुस्लिमविरोधी ठरवून गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी हे विधेयक संविधानावर हल्ला असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं अयोध्या मंदिर मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. गैर-हिंदू त्याचा सदस्य होऊ शकतो का? मग, वक्फ बोर्डात बिगर मुस्लिम सदस्यांची चर्चा का? हा थेट मुस्लिमांवर हल्ला आहे. यानंतर पुन्हा ख्रिश्चनांवर आणि नंतर जैनांवर केला जाईल, असं ते म्हणाले.

दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सरकारचा प्रस्तावित वक्फ कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली वक्फ जमीन विकण्याचा डाव असल्याचा आरोप केला. सरकार रिअल इस्टेट कंपनीसारखे काम करत असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला. तसंच, मुस्लिमांवर हा अन्याय का होत आहे, असा सवाल समाजवादी पक्षाचे नेते मोहिबुल्लाह नदवी यांनी केला.

दरम्यान, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विरोध केल्यानंतर, अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, वक्फ कायदा १९९५ आपलं उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी झाला नाही. जी कामं तुमचं सरकार करू शकलं नाही, ती पूर्ण करण्यासाठी हे सुधारणा विधेयक आणलं जात आहे. यामुळं कोणाच्याही धार्मिक स्वातंत्र्यात हस्तक्षेप होत नाही आणि संविधानाच्या कोणत्याही कलमाचे उल्लंघन होत नाही.

टॅग्स :Parliamentसंसद