शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कायमस्वरूपी कराल वर्क फ्रॉम होम? त्यासाठी चालेल का पगार कपात?; ऐका भारतीयांची 'मन की बात'

By कुणाल गवाणकर | Updated: November 26, 2020 20:16 IST

भारतीयांना आवडतोय वर्क फ्रॉम होमचा पर्याय; घराला वेळ देता येत असल्यानं महिला वर्ग खूष

मुंबई: संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना संकटानं माणसाच्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलल्या. कोरोनाची लस अद्याप तरी मिळाली नसल्यानं धोका कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेले निर्बंध यापुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. कोरोना संकटात अनेक जण वर्क फ्रॉम करत आहेत. यापुढेही वर्क फ्रॉम होमचा पर्याय बऱ्यापैकी कायम राहील, असा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर मॅवेरिक्स इंडियानं केलेल्या सर्वेक्षणातून महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे.७० टक्के लोकांनी 'हा' उपाय केल्यास नियंत्रणात येईल कोरोनाचा प्रसार; संशोधनातून खुलासाजगातल्या अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमचा पर्याय देऊ केला आहे. भारतीयांनादेखील हा पर्याय आवडत असल्याचं दिसत आहे. मॅवेरिक्स इंडियानं 'कोविड-१९ अँड बियॉण्ड: ऍन इव्हॉल्विंग पर्सपेक्टिव्ह' नावानं एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या सर्वेक्षणात देशातील ७२० जणांनी सहभाग घेतला. यातल्या ५४ टक्के जणांनी 'वर्क फ्रॉम होम'च्या पर्यायाला पसंती दर्शवली. यातल्याच ३४ टक्के कर्मचाऱ्यांनी कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम मिळत असल्यास १० टक्के पगार कपात चालेल, असं मत व्यक्त केलं. प्रवासावर होणारा खर्च पगारातून कमी केला तर काय हरकत काय, असा या वर्गाचा मतप्रवाह आहे. कार्यालय गाठण्यासाठी दीड तासाहून अधिक वेळ प्रवास करणाऱ्या ८१ टक्के कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम कायमस्वरुपी चालेल, असं मत नोंदवलं. अरे बापरे! कोरोनावरील कोणतीही लस घेतली, तरीही 'हे' साईड इफेक्ट्स दिसणारच?वर्क फ्रॉम होमवर महिला खूषमहिला कर्मचाऱ्यांनादेखील वर्क फ्रॉम होमचा पर्याय उत्तम वाटत आहे. सध्या प्रमाणे काम सुरू असल्यास काहीच हरकत नाही, असं मत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचं प्रमाण ५६ टक्के इतकं आहे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलेल्या ८० टक्के महिलांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय अतिशय चांगला वाटतो. नव्या पर्यायामुळे काम आणि घराच्या जबाबदाऱ्या अतिशय व्यवस्थित सांभाळता येत असल्याचं या महिलांचं मत आहे.घरात राहूनही होऊ शकते धुळीच्या एलर्जीची समस्या; तज्ज्ञांनी सांगितली लक्षणं अन् बचावाचे उपाय कर्मचाऱ्यांमधील कोरोनाची भीती घटलीकर्मचाऱ्यांच्या मनातील कोरोनाची भीती कमी होत असल्याचं सर्वेक्षण सांगतं. एप्रिलमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यावर ६६ टक्के कर्मचाऱ्यांना कोरोनाची भीती होती. मात्र आता हेच प्रमाण ३९ टक्क्यांवर आलं आहे. तरुणाईच्या मनातील कोरोनाची भीती ३३ टक्क्यांनी कमी झाली आहे. चेन्नईतील ७४ टक्के कर्मचारी एप्रिलमध्ये कोरोनाबद्दल चिंतित होते. ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण थेट २८ टक्क्यांवर आलं आहे. कोलकात्यामधील कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती मात्र वाढली आहे. एप्रिलमध्ये इथल्या ५४ टक्के लोकांना कोरोनाची भीती वाटत होती. ऑक्टोबरमध्ये हेच प्रमाण ६२ टक्क्यांवर पोहोचलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या