शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

केवळ नियम करून स्वातंत्र्य मिळत नाही, त्यासाठी चांगली कामगिरीही करावी लागते; सरकारचा उर्जित पटेलांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 10:45 IST

फक्त कायदेशीर गोष्टी याच महत्त्वाच्या नसून रिझर्व्ह बँकेची प्रत्यक्ष कृतीही तितकीच महत्त्वाची आहे.

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेला अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य केवळ नियम तयार करून मिळणार नाही, तर त्यासाठी चांगली कामगिरी आणि निर्णय घेण्याची आवश्यकता असते, असे सांगत केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना टोला लगावला. काही दिवसांपूर्वी उर्जित पटेल यांनी पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यासंदर्भात भाष्य करताना म्हटले होते की, रिझर्व्ह बँक मर्यादांचे ओझे घेऊन वावरत आहे. घोटाळा झाल्यास सरकारी बँकांवर कारवाई करण्याबाबत रिझर्व्ह बँकेवर कमालीच्या मर्यादा आहेत. विविध कायद्यांमुळे कारवाई करता येणे अशक्य आहे, असे सांगत उर्जित पटेल यांनी हतबलता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना अरविंदर सुब्रमणियन यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, स्वातंत्र्य हे केवळ नियम करूनच मिळत नाही. किंबहुना स्वातंत्र्य हे बहुतांशी  चांगल्या व प्रभावी निर्णयांची परंपरा आणि प्रतिष्ठेवर अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा रिझर्व्ह बँकेच्या विश्वासर्हतेचा दाखला देता, तेव्हा केवळ स्वातंत्र्यच अभिप्रेत नसते. तुम्ही स्वतंत्र असाल आणि एकापाठोपाठ एक चुकीचे निर्णय घेत असाल तर तुमची विश्वासर्हता रसातळाला जाऊ शकते. त्यामुळे फक्त कायदेशीर गोष्टी याच महत्त्वाच्या नसून रिझर्व्ह बँकेची प्रत्यक्ष कृतीही तितकीच महत्त्वाची आहे, असे सुब्रमणियन यांनी म्हटले. त्यामुळे आता सुब्रमणियन यांच्या विधानावर उर्जित पटेल नेमकी काय प्रतिक्रिया देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उर्जित पटेल यांनी पूर्वसुरी रघुराम राजन यांच्या काळातही रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार यांच्यात अनेकदा खटके उडाले होते. सरकारकडून रिझर्व्ह बँकेवर व्याजदर कमी करण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात असल्याचेही अनेकदा निदर्शनास आले आहे. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा