शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

भाडोत्री मातृत्वासाठी प्रतीक्षा काळ एक वर्ष करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 04:33 IST

लग्नानंतर सक्तीने पाच वर्षे प्रतिक्षा करायला लावणे अन्यायाचे असल्याने हा प्रतिक्षाकाळ कमी करून एक वर्ष करावा, अशी शिफारस संसदीय समितीने केली

नवी दिल्ली: भाडोत्री मातृत्वाने अपत्यप्राप्ती करून घेऊ इच्छिणाºया दाम्पत्यांना त्यासाठी लग्नानंतर सक्तीने पाच वर्षे प्रतिक्षा करायला लावणे अन्यायाचे असल्याने हा प्रतिक्षाकाळ कमी करून एक वर्ष करावा, अशी शिफारस संसदीय समितीने केली आहे. भाडोत्री मातृत्वाचे नियमन करण्यासाठी करायच्या प्रस्तावित कायद्याचे सरकारने तयार केलेले विधेयक छाननी आणि सूचनांसाठी कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संलग्न संसदीय समितीकडे पाठविण्यात आले होते. त्यातील तरतुदींचा अभ्यास करून समितीने ही शिफारस केली आहे. विधेयकात सुचविलेला किमान पाच वर्षांचा सक्तीचा प्रतिक्षाकाळ हा संसतीहक्कांची पायमल्ली करणारा तर आहेच. शिवाय त्यामुळे कृत्रिक गर्भधारणेने अपत्यप्राप्तीची शक्यताही कमी होईल. पाच वर्षांचा सक्तीचा प्रतिक्षाकाळ मनमानी, भेदभाव करणारा व कोणत्याही रास्त तर्कावर आधारित नसल्याने तो कमी करून एक वर्ष करावा, असे समितीला वाटते.समिती म्हणते की, हल्ली वयाच्या तिशी आणि चाळीशीमध्ये लग्ने होतात ही वस्तुस्थिती आहे. त्यात आणखी नैसर्गिक प्रक्रियेने स्वत:चे मूल होते की नाही हे पाहण्यासाठी त्यांना पाच वर्षे वाट पाहायला लावली, तर जेव्हा खरेच कृत्रिम गर्भधारणा करून येण्याची वेळ येईल, तेव्हा वय आणखी वाढलेले असेल. त्याने संकरासाठी उपलब्ध होणारे शुक्राणू व स्त्रीबीज चांगल्या दर्जाचे मिळणार नाही व परिणामी गर्भधारणेची शक्यता आणखी दुरापास्त होत जाईल.समिती म्हणते की, प्रजनन हा व्यक्तीच्या मूलभूत हक्काचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे अन्य मार्गाने शक्य असूनही त्या व्यक्तीला मूल होण्यासाठी पाच वर्षे थांबायला सांगणे हा त्याच्या या हक्काचा संकोच करणे आहे. शिवाय याने पालकत्वही सक्तीने लांबविले जाईल.समितीला असेही वाटते की, भारतात वंध्यत्व हा सामाजिक कलंक मानला जातो. त्यामुळे मूल होऊ न शकणारी दाम्पत्ये मोठा मानसिक ताणतणाव व हेटाळणी सोसत असतात. शिवाय गर्भधारणा होणे किंवा न होणे हे दोघांच्याही हातात नसलेल्या अनेक गोष्टींवर अवलंबून असल्याने, पाच वर्षांचा सक्तीचा प्रतीक्षा काळ अशा दाम्पत्यांच्या मानसिक त्रासात भर टाकणारा ठरेल.एवढेच नव्हे, तर स्त्रीला गर्भाशयच नसणे, असलेले गर्भाशय कर्करोगामुळे काढून टाकावे लागणे, गर्भाशयात फायब्रॉईड््स जमा होणे यासारख्या वैद्यकीय कारणांमुळे संततीप्राप्तीसाठी फक्त भाडोत्री मातृत्व हाच एकमेव पर्याय उपलब्ध असेल, अशा वेळी एक वर्षाचा प्रतीक्षा काळही माफ केला जावा, अशी समितीने शिफारस केली.>व्यापारीकरण रोखायला हवे; त्यासाठी कायदा प्रभावी असणे गरजचेदेशात भाडोत्री मातृत्वाचे व्यापारीकरण रोखायचे असेल, तर त्यासाठी केवळ हे ‘सरोगसी’ विधेयक मंजूर करून काही साध्य होणार नाही. भाडोत्री मातृत्वासाठी कृत्रिम गर्भधारणेच्या विविध तंत्रांचा आधार घेतला जातो. यासाठी असलेली ‘एआरटी क्लिनिक्स’च भाडोत्री मातृत्वाच्या केसेस हाताळत असतात. त्यामुळे या ‘एआरटी क्लिनिक्स’चे नियमन करणारे २००८ मध्ये मांडलेले विधेयक आधी मंजूर करून, तसा कायदा केल्याखेरीज ‘सरोगसी नियमन कायदा’ प्रभावी होणार नाही, असेही समितीने सुचविले आहे.