शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

१३०० शिक्षणसेवक प्रतीक्षेत

By admin | Updated: December 31, 2014 18:54 IST

श्रीरामपूर : राज्यातील १३०० शिक्षणसेवक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २ मे २०१० रोजी प्राथमिक शिक्षणसेवकांच्या १५ हजार पदांसाठी केंद्रीय भरतीपूर्व परीक्षा (सीईटी)घेतली होती. त्याचा निकाल १ जून २०१० ला लागला. उत्तरपत्रिकेत दहा प्रश्नांची उत्तरे चुकीची आढळल्याने काही उमेदवारांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सरकारने उत्तरपत्रिकेतील चुका काढून दोषरहीत उत्तरपत्रिका काढावी, असा आदेश न्यायालयाने दिला होता. सरकारने ४ जुलै २०११ च्या निर्णयानुसार संबंधित उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी समिती स्थापन केली. समितीने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या १४ हजार ४०० पैकी ३१२१ उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणून पात्र ठरविले. त्यांना नियुक्त्या न दिल्याने पुन्हा न्यायालयात गेल्यानंतर तब्बल साडेचार वर्षानंतर १७५९ उमेदवारांना ३१ मे २०१४ रोजी नियुक्त्य्

श्रीरामपूर : राज्यातील १३०० शिक्षणसेवक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २ मे २०१० रोजी प्राथमिक शिक्षणसेवकांच्या १५ हजार पदांसाठी केंद्रीय भरतीपूर्व परीक्षा (सीईटी)घेतली होती. त्याचा निकाल १ जून २०१० ला लागला. उत्तरपत्रिकेत दहा प्रश्नांची उत्तरे चुकीची आढळल्याने काही उमेदवारांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सरकारने उत्तरपत्रिकेतील चुका काढून दोषरहीत उत्तरपत्रिका काढावी, असा आदेश न्यायालयाने दिला होता. सरकारने ४ जुलै २०११ च्या निर्णयानुसार संबंधित उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी समिती स्थापन केली. समितीने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या १४ हजार ४०० पैकी ३१२१ उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणून पात्र ठरविले. त्यांना नियुक्त्या न दिल्याने पुन्हा न्यायालयात गेल्यानंतर तब्बल साडेचार वर्षानंतर १७५९ उमेदवारांना ३१ मे २०१४ रोजी नियुक्त्या दिल्या. उर्वरित १३६२ उमेदवारांना दोन महिन्यांमध्ये नियुक्त्या देण्याचे आश्वासन शिक्षण संचालनालयातील अधिकार्‍यांनी दिले होते. पण शिक्षण संचालनालयाच्या भोंगळ कारभाराचा फटका पात्र उमेदवारांना बसत असून १३६२ उमेदवार आजही नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा परिषदांकडून प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांचा अहवाल वेळेवर मिळत नसल्याचे कारण शिक्षण संचालनालयातील अधिकारी सांगत आहेत. त्यांच्याकडून तात्काळ माहिती मागवून १३६२ शिक्षणसेवकांना रिक्ताजागी पदस्थापना द्यावी, अशी मागणी डी.एड. सी.ई.टी.पुनर्मूल्यांकन पात्र उमेदवारांनी शिक्षण संचालक महावीर माने यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)