शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

व्यंकय्या नायडू होऊ शकतात उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार

By admin | Updated: July 17, 2017 17:20 IST

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीचं मतदान संपन्न झाल्यानंतर आता उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपानं मोर्चेबांधणी सुरू केली

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 17 - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीचं मतदान संपन्न झाल्यानंतर आता उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपानं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विरोधकांनी उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून गोपालकृष्ण गांधी यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर भाजपाही व्यंकय्या नायडूंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची तयारी चालवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय संसदीय मंत्री आणि दक्षिणेतला भाजपाचा मोठा चेहरा म्हणून एनडीएकडून व्यंकय्या नायडूंचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपाचे घटक पक्षही व्यंकय्या नायडूंच्या नावाला सहमती दर्शवू शकतात. विशेष म्हणजे व्यंकय्या नायडूंच्या नावावर संघानंही सहमती दिल्याची चर्चा आहे. व्यंकय्या नायडू हे आंध्र प्रदेश म्हणजेच दक्षिणेतून येतात. तिथे भाजपाला चांगला असा जनाधार नाही. त्यामुळे दक्षिणेत स्वतःची बाजू भक्कम करण्यासाठी भाजपाकडे याहून चांगली संधी नाही. सुरुवातीला भाजपा दक्षिणेतील कोणत्याही नेत्याला उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरवू शकते, अशी चर्चा होती. मात्र आता उपराष्ट्रपतिपदासाठी व्यंकय्या नायडू यांच्याहून योग्य चेहरा असू शकत नाही, असंही भाजपाच्या धुरिणांना वाटतं. व्यंकय्या नायडू हे संघाचे कार्यकर्ते आहेत. भाजपामध्ये त्यांच्याकडे मोठा आणि जाणकार नेता म्हणून पाहिलं जातं. ब-याचदा भाजपा पक्ष अडचणीत सापडलेला असताना व्यंकय्या नायडू बचावासाठी पुढे येऊन पक्षाची बाजू भक्कमपणे मांडताना पाहायला मिळतात. त्याप्रमाणेच सर्वपक्षीयांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.आणखी वाचा(राज्यपाल राव उपराष्ट्रपतीपदासाठी स्पर्धेत?)(उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही नितीश कुमारांची मोदींना साथ ?)(अमित शाह राज्यसभेवर, आनंदीबेन उपराष्ट्रपती?)येत्या 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आघाडीचा उमेदवार ठरविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या संसदीय मंडळाची बैठक आज सायंकाळी दिलीत बोलाविण्यात आली आहे. केंद्रीय नगरविकास आणि माहिती व नभोवाणीमंत्री एम. व्यंकय्या नायडू हे या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात असले तरी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे नावही चर्चेत असल्याचे पक्षातील विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. 

या सूत्रांनुसार पक्षात असा मतप्रवाह आहे की, उपराष्ट्रपतिपदासाठी दक्षिण भारतातील उमेदवार असावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन व राष्ट्रपतीपदाचे उमेदावर रामनाथ कोविंद उत्तरेकडील असल्याने उपराष्ट्रपतिपद देशाच्या दक्षिणेकडील राज्याकडे जावे, असे मत पक्षात तयार होत आहे.