शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हीव्हीपॅट’ पडताळणी किमान ५० टक्केच करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 06:47 IST

निवडणुकीची विश्वासार्हता : २१ विरोधी पक्षांची सुप्रीम कोर्टात आग्रही भूमिका

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघातील किमान ५० टक्के मतदानयंत्रांमधील मतांची ‘व्हीव्हीपॅट’ पडताळणी केल्याने निवडणुकीचा निकाल काही दिवसांनी लांबणार असेल तरी निवडणुकीच्या नि:ष्पक्षतेची देशातील जनतेला नि:संदिग्धपणे ग्वाही मिळावी यासाठी तशी पडताळाणी करणे गरजेचे आहे, अशी ठाम भूमाका २१ विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे.

येत्या निवडणुकीत देशभरातील सर्व १० लाख मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदानयंत्रे वापरण्यात येणार आहेत. मात्र निकाल जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील एक मतदानयंत्र सरधोपटपणे निवडून त्यातील मतांची ‘व्हीव्हीपॅट’शी पडताळणी करण्याचे निवडणूक आयोगाने ठरविले आहे. मात्र अशी पडताळणी किमान ५० टक्के मतदानयंत्रांच्या बाबतीत केली जावी, अशी विनंती करणारी याचिका २१ विरोधी पक्षांनी न्यायालयात केली आहे.

सुनावणीच्या पहिल्या तारखेला खुद्द न्यायालयानेही पडताळणीचे प्रमाण वाढविण्यास अनुकुलता दर्श विली होती व निवडणूक आयोगास भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. त्यावर आयोगाने प्रतिज्ञापत्र करून प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर अधिक व्यापक पडताळणीस विरोध केला.एक म्हणजे, सध्या ‘व्हीव्हीपॅट’ पडताळणीचे जे प्रमाण ठरविले आहे ते निवडणुकीच्या नि:ष्पक्षतेची खात्री करण्यासाठी पुरेसे आहे. ‘इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट’ या मान्यवर संस्थेनेच हे प्रमाण योग्य असल्याचे कळविले आहे. दुसरे असे की, विरोधी पक्ष म्हणतात तशी ५० टक्के पडताळणी करायची झाल्यास निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यास पाच ते सहा दिवसांचा विलंब होईल. त्यामुळे पडताळणीचे प्रमाण वाढविल्याने विश्वासार्हता वाढणार नसल्याने अधिक व्यापक पडताळणी करणे निरर्थक ठरेल.

आयोगाच्या या भूमिकेचा प्रतिवाद करताना विरोधी पक्षांनी न्यायालयास असे कळविले आहे की, एकीकडे निवडणुकीची विश्वासार्हता व दुसरीकडे निकालास होणारा संभाव्य विलंब यांचा तौलनिक विचार केला तर संभाव्य विलंबाहून नि:संशय विश्वासार्हता अधिक महत्वाची आहे. त्यामुळे निकाल काही दिवसांनी लांबले तरी मतदानापूर्वी किंवा नंतर मतदानयंत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची हेराफेरी झालेली नाही याची पक्की खात्री पटण्यासाठी अधिक व्यापक पडताळणी होणेच गरजेचे आहे.

या पक्षांनी असेही म्हटले की, मुळात मतदानयंत्रांसोबत ‘व्हीव्हीपॅट’ची सोय न्यायालयाच्याच आदेशाने करण्यात आली आहे. दिलेले मत यंत्रात योग्यप्रकारे नोंदले गेले आहे, याची मतदाराला खात्री पटवून घेता यावी यासाठी ही सोय करण्यात आली आहे. आयोग म्हणतो तशी जुजबी पडताळणी केली तर हा आदेश देण्यामागचा न्यायालयाचा मूळ हेतू साध्य झाल्यासारखे होणार नाही.

सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठापुढे सोमवारी या याचिकेवर पुढील सुनावणी व्हायची आहे. दोन्ही पक्षांची सविस्तर प्रतिज्ञापत्रे सादर झाली आहेत व येत्या दोन दिवसांत निवडणुकीचे पहिल्या टप्प्याचे मतदान व्हायचे आहे हे लक्षात घेता यावर सुनावणी घेऊन न्यायालय निकाल देईल, अशी अपेक्षा आहे.