शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
2
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची मोठी घोषणा
3
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
4
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
5
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
6
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
7
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
8
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
9
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
10
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
11
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
12
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
13
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
14
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
15
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
16
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
18
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
20
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

‘व्हीव्हीपॅट’ पडताळणी किमान ५० टक्केच करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 06:47 IST

निवडणुकीची विश्वासार्हता : २१ विरोधी पक्षांची सुप्रीम कोर्टात आग्रही भूमिका

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघातील किमान ५० टक्के मतदानयंत्रांमधील मतांची ‘व्हीव्हीपॅट’ पडताळणी केल्याने निवडणुकीचा निकाल काही दिवसांनी लांबणार असेल तरी निवडणुकीच्या नि:ष्पक्षतेची देशातील जनतेला नि:संदिग्धपणे ग्वाही मिळावी यासाठी तशी पडताळाणी करणे गरजेचे आहे, अशी ठाम भूमाका २१ विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे.

येत्या निवडणुकीत देशभरातील सर्व १० लाख मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदानयंत्रे वापरण्यात येणार आहेत. मात्र निकाल जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील एक मतदानयंत्र सरधोपटपणे निवडून त्यातील मतांची ‘व्हीव्हीपॅट’शी पडताळणी करण्याचे निवडणूक आयोगाने ठरविले आहे. मात्र अशी पडताळणी किमान ५० टक्के मतदानयंत्रांच्या बाबतीत केली जावी, अशी विनंती करणारी याचिका २१ विरोधी पक्षांनी न्यायालयात केली आहे.

सुनावणीच्या पहिल्या तारखेला खुद्द न्यायालयानेही पडताळणीचे प्रमाण वाढविण्यास अनुकुलता दर्श विली होती व निवडणूक आयोगास भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. त्यावर आयोगाने प्रतिज्ञापत्र करून प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर अधिक व्यापक पडताळणीस विरोध केला.एक म्हणजे, सध्या ‘व्हीव्हीपॅट’ पडताळणीचे जे प्रमाण ठरविले आहे ते निवडणुकीच्या नि:ष्पक्षतेची खात्री करण्यासाठी पुरेसे आहे. ‘इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट’ या मान्यवर संस्थेनेच हे प्रमाण योग्य असल्याचे कळविले आहे. दुसरे असे की, विरोधी पक्ष म्हणतात तशी ५० टक्के पडताळणी करायची झाल्यास निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यास पाच ते सहा दिवसांचा विलंब होईल. त्यामुळे पडताळणीचे प्रमाण वाढविल्याने विश्वासार्हता वाढणार नसल्याने अधिक व्यापक पडताळणी करणे निरर्थक ठरेल.

आयोगाच्या या भूमिकेचा प्रतिवाद करताना विरोधी पक्षांनी न्यायालयास असे कळविले आहे की, एकीकडे निवडणुकीची विश्वासार्हता व दुसरीकडे निकालास होणारा संभाव्य विलंब यांचा तौलनिक विचार केला तर संभाव्य विलंबाहून नि:संशय विश्वासार्हता अधिक महत्वाची आहे. त्यामुळे निकाल काही दिवसांनी लांबले तरी मतदानापूर्वी किंवा नंतर मतदानयंत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची हेराफेरी झालेली नाही याची पक्की खात्री पटण्यासाठी अधिक व्यापक पडताळणी होणेच गरजेचे आहे.

या पक्षांनी असेही म्हटले की, मुळात मतदानयंत्रांसोबत ‘व्हीव्हीपॅट’ची सोय न्यायालयाच्याच आदेशाने करण्यात आली आहे. दिलेले मत यंत्रात योग्यप्रकारे नोंदले गेले आहे, याची मतदाराला खात्री पटवून घेता यावी यासाठी ही सोय करण्यात आली आहे. आयोग म्हणतो तशी जुजबी पडताळणी केली तर हा आदेश देण्यामागचा न्यायालयाचा मूळ हेतू साध्य झाल्यासारखे होणार नाही.

सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठापुढे सोमवारी या याचिकेवर पुढील सुनावणी व्हायची आहे. दोन्ही पक्षांची सविस्तर प्रतिज्ञापत्रे सादर झाली आहेत व येत्या दोन दिवसांत निवडणुकीचे पहिल्या टप्प्याचे मतदान व्हायचे आहे हे लक्षात घेता यावर सुनावणी घेऊन न्यायालय निकाल देईल, अशी अपेक्षा आहे.