शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

मतदान यंत्र हॅक करून दाखवाच; ३ जूनला संधी

By admin | Updated: May 21, 2017 04:27 IST

भारतात वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पूर्णपणे निर्धोेक आहेत व त्यांत कोणतीही हेराफेरी केली जाऊ शकत नाही, अशी ग्वाही निवडणूक आयोगाने शनिवारी

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भारतात वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पूर्णपणे निर्धोेक आहेत व त्यांत कोणतीही हेराफेरी केली जाऊ शकत नाही, अशी ग्वाही निवडणूक आयोगाने शनिवारी दिली आणि तरीही विश्वास नसेल, तर ‘या आणि आमची मतदान यंत्रे हॅक करून दाखवा,’ असे खुले आव्हान राजकीय पक्षांना दिले.हे आव्हान जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नस्सीम झैदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की येत्या ३ जूनपासून आयोगाची मतदान यंत्रे हॅक करून दाखविण्यासाठी उपलब्ध असतील. यासाठी इच्छुक राजकीय पक्षांना येत्या २६ मे रोजी सायंकाळी ५ पर्यंत नोंदणी करावी लागेल. नोंदणी केलेल्या राजकीय पक्षांचे प्रत्येकी ३ प्रतिनिधी यात भाग घेऊ शकतील. हे प्रतिनिधी त्यांच्या पसंतीची कोणतीही ४ मतदान यंत्रे हॅक करून दाखविण्यासाठी निवडू शकतील. डॉ. झैदी म्हणाले, की ताज्या विधानसभा निवडणुकांनंतर अनेक राजकीय पक्षांनी मतदान यंत्रांमध्ये हेराफेरी झाल्याचे आरोप केले. १३ राजकीय पक्षांचे नेते आयोगाला भेटले; पण त्यांपैकी कोणीही मतदान यंत्रांमध्ये हेराफेरी झाल्याचे किंवा हेराफेरी केली जाऊ शकते, याचे कोणतेही विश्वासार्ह पुरावे दिलेले नाहीत. यापुढे सर्व निवडणुका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटीने घेण्याची घोषणाही डॉ. झैदी यांनी या वेळी केली. यामुळे निवडणुकीतील पारदर्शकता वाढेल, असे ते म्हणाले. तत्पूर्वी आयोगाने मतदान यंत्रे आणि त्यासोबत जोडलेली छापील पावती देण्याची (व्हीव्हीपीएटी) यंत्रणा प्रत्यक्षात कशी काम करते याचे व यात कोणतीही गडबड करणे कसे सर्वस्वी अशक्य आहे, याचे सविस्तर प्रात्यक्षिक दाखविले.काय म्हणतो निवडणूक आयोग?- मतदान यंत्राचा कोणत्याही पक्षाच्या बाजूने अगर विरोधात वापर केला जाऊ शकत नाही. ईव्हीएम बनविताना किंवा मतदानासाठी त्यांचा वापर करताना हेराफेरी शक्य नाही.ही यंत्रे परदेशातून आयात केली जात नाहीत. सर्व यंत्रे भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन आॅफ इंडिया या सार्वजनिक उपक्रमांकडून घेतो. त्याचे सॉफ्टवेअरही येथेच तयार केले जाते. - मतदानापूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर ईव्हीएमची तपासणी होते. ईव्हीएममध्ये दोष आहे किंवा काय, हे तपासण्यासाठी मतदानाची रंगीत तालीम घेण्यात येते. ही प्रक्रिया आटोपल्यानंतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोरच ईव्हीएम सील केले जाते. सर्व यंत्रे स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात येतात.