शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

लोकल टू ग्लोबल... तरुणांना मोठी संधी, मोदींनी विद्यार्थ्यांना दिला उद्योजकतेचा मंत्र

By महेश गलांडे | Updated: December 24, 2020 13:47 IST

कोरोना महामारीच्या संकटामुळे यंदा विश्वविद्यालयात यात्रेचं आयोजन करता आलं नाही, तरीही येथील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात येणाऱ्या लोकांशी संपर्क करावा.

ठळक मुद्देकोरोना महामारीच्या संकटामुळे यंदा विश्वविद्यालयात यात्रेचं आयोजन करता आलं नाही, तरीही येथील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात येणाऱ्या लोकांशी संपर्क करावा.

मुंबई - पंतप्रधाननरेंद्र मोदींनी गुरुवारी पश्चिम बंगालच्या विश्वभारती विद्यापीठाच्या शतकपूर्ती कार्यक्रमात सहभाग घेतला. आपल्या भाषणात गुरुदेव रविंद्र नाथ टॅगोर यांच्यासह स्वामी विवेकानंदांच्या आठवणींना उजाळा दिला. स्वातंत्र्याच्या लढाईत विश्वभारती विद्यापीठाचे महत्त्वपूर्ण योगदान असून राष्ट्रवाद आणि देशभक्तीची प्रेरणा याच विद्यापीठातून रुजू झाल्याचं मोदींनी म्हटलं. तसेच, यावेळी बोलताना देशातील तरुणाईनला लोकल टू व्होकलसाठी प्रयत्न करुन आत्मनिर्भतेचा संदेशही मोदींनी दिला.

कोरोना महामारीच्या संकटामुळे यंदा विश्वविद्यालयात यात्रेचं आयोजन करता आलं नाही, तरीही येथील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात येणाऱ्या लोकांशी संपर्क करावा. त्यातून, लोकल कलाकृती ऑनलाईन पद्धतीने कशारितीने विकता येतील, यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन मोदींनी केले आहे. आपले ध्येय साध्य करण्यासाठी एकट्याने चालावे लागले तरी चालावे, जेव्हा स्वातंत्र्यांची लढाई उंबरठ्यावर होती, तेव्हा बंगालनेच या चळवळीला दिशा दिली. त्यासोबतच कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातही पश्चिम बंगालने मोठं योगदान दिलं. 

इतिहासात ही तिसरी वेळ आहे की, यंदा पौष मेळ्याचं आयोजन करण्यात येत नाही. त्यामुळे, यंदा विद्यापीठातील अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी स्थानिक कलाकारांशी संपर्क साधावा, त्यांची कलाकृती ऑनलाईन पद्धतीने बाजारात विकावी, आपलं लोकल प्रोडक्ट ग्लोबल बनविण्याचं काम तुमच्या हाती असल्याचे मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं. तसेच, सन 2015 साली झालेल्या विद्यापीठातील योग डिपार्टमेंटची लोकप्रियता जगभरात झाली. या विद्यापीठाने दिलेला संदेश जगभरात पोहचल्याचेही मोदींनी सांगितंल. 

पंतप्रधान मोदींनी गुरुदेव यांचे मोठे बंधु सत्येंद्र नाथ टॅगोर यांच्यामुळे रविंद्र नाथ टॅगोर यांचं गुजरातशी नातं असल्याचं सांगितलं. सत्येंद्रनाथ टॅगोर यांची नियुक्ती गुजरातमध्ये होती. त्यामुळे, गुरुदेव रविंद्रनाथ हे मोठ्या भावाला भेटण्यासाठी अहमदाबादला येत. तेथेच त्यांनी दोन कवितांचे लेखन केले होते. तर, गुजरातच्या कन्येनंही गुरुदेव यांच्या घरी सून बनून प्रवेश केला. सत्येंद्रनाथ यांची पत्नी ज्ञानेंद्री देवी अहमदाबादमध्ये राहात होत्या, त्यावेळी तेथील महिला साडीचा पदर उजवीकडे टाकत असल्याचं त्यांनी पाहिलं. तेव्हा डाव्या बाजच्या खांद्यावर साडीचा पदर ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. तेव्हापासून ती प्रथा आजतागायत असल्याचंही मोदींनी सांगितलं.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान