शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लोकल टू ग्लोबल... तरुणांना मोठी संधी, मोदींनी विद्यार्थ्यांना दिला उद्योजकतेचा मंत्र

By महेश गलांडे | Updated: December 24, 2020 13:47 IST

कोरोना महामारीच्या संकटामुळे यंदा विश्वविद्यालयात यात्रेचं आयोजन करता आलं नाही, तरीही येथील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात येणाऱ्या लोकांशी संपर्क करावा.

ठळक मुद्देकोरोना महामारीच्या संकटामुळे यंदा विश्वविद्यालयात यात्रेचं आयोजन करता आलं नाही, तरीही येथील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात येणाऱ्या लोकांशी संपर्क करावा.

मुंबई - पंतप्रधाननरेंद्र मोदींनी गुरुवारी पश्चिम बंगालच्या विश्वभारती विद्यापीठाच्या शतकपूर्ती कार्यक्रमात सहभाग घेतला. आपल्या भाषणात गुरुदेव रविंद्र नाथ टॅगोर यांच्यासह स्वामी विवेकानंदांच्या आठवणींना उजाळा दिला. स्वातंत्र्याच्या लढाईत विश्वभारती विद्यापीठाचे महत्त्वपूर्ण योगदान असून राष्ट्रवाद आणि देशभक्तीची प्रेरणा याच विद्यापीठातून रुजू झाल्याचं मोदींनी म्हटलं. तसेच, यावेळी बोलताना देशातील तरुणाईनला लोकल टू व्होकलसाठी प्रयत्न करुन आत्मनिर्भतेचा संदेशही मोदींनी दिला.

कोरोना महामारीच्या संकटामुळे यंदा विश्वविद्यालयात यात्रेचं आयोजन करता आलं नाही, तरीही येथील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात येणाऱ्या लोकांशी संपर्क करावा. त्यातून, लोकल कलाकृती ऑनलाईन पद्धतीने कशारितीने विकता येतील, यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन मोदींनी केले आहे. आपले ध्येय साध्य करण्यासाठी एकट्याने चालावे लागले तरी चालावे, जेव्हा स्वातंत्र्यांची लढाई उंबरठ्यावर होती, तेव्हा बंगालनेच या चळवळीला दिशा दिली. त्यासोबतच कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातही पश्चिम बंगालने मोठं योगदान दिलं. 

इतिहासात ही तिसरी वेळ आहे की, यंदा पौष मेळ्याचं आयोजन करण्यात येत नाही. त्यामुळे, यंदा विद्यापीठातील अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी स्थानिक कलाकारांशी संपर्क साधावा, त्यांची कलाकृती ऑनलाईन पद्धतीने बाजारात विकावी, आपलं लोकल प्रोडक्ट ग्लोबल बनविण्याचं काम तुमच्या हाती असल्याचे मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं. तसेच, सन 2015 साली झालेल्या विद्यापीठातील योग डिपार्टमेंटची लोकप्रियता जगभरात झाली. या विद्यापीठाने दिलेला संदेश जगभरात पोहचल्याचेही मोदींनी सांगितंल. 

पंतप्रधान मोदींनी गुरुदेव यांचे मोठे बंधु सत्येंद्र नाथ टॅगोर यांच्यामुळे रविंद्र नाथ टॅगोर यांचं गुजरातशी नातं असल्याचं सांगितलं. सत्येंद्रनाथ टॅगोर यांची नियुक्ती गुजरातमध्ये होती. त्यामुळे, गुरुदेव रविंद्रनाथ हे मोठ्या भावाला भेटण्यासाठी अहमदाबादला येत. तेथेच त्यांनी दोन कवितांचे लेखन केले होते. तर, गुजरातच्या कन्येनंही गुरुदेव यांच्या घरी सून बनून प्रवेश केला. सत्येंद्रनाथ यांची पत्नी ज्ञानेंद्री देवी अहमदाबादमध्ये राहात होत्या, त्यावेळी तेथील महिला साडीचा पदर उजवीकडे टाकत असल्याचं त्यांनी पाहिलं. तेव्हा डाव्या बाजच्या खांद्यावर साडीचा पदर ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. तेव्हापासून ती प्रथा आजतागायत असल्याचंही मोदींनी सांगितलं.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान