शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

लोकल टू ग्लोबल... तरुणांना मोठी संधी, मोदींनी विद्यार्थ्यांना दिला उद्योजकतेचा मंत्र

By महेश गलांडे | Updated: December 24, 2020 13:47 IST

कोरोना महामारीच्या संकटामुळे यंदा विश्वविद्यालयात यात्रेचं आयोजन करता आलं नाही, तरीही येथील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात येणाऱ्या लोकांशी संपर्क करावा.

ठळक मुद्देकोरोना महामारीच्या संकटामुळे यंदा विश्वविद्यालयात यात्रेचं आयोजन करता आलं नाही, तरीही येथील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात येणाऱ्या लोकांशी संपर्क करावा.

मुंबई - पंतप्रधाननरेंद्र मोदींनी गुरुवारी पश्चिम बंगालच्या विश्वभारती विद्यापीठाच्या शतकपूर्ती कार्यक्रमात सहभाग घेतला. आपल्या भाषणात गुरुदेव रविंद्र नाथ टॅगोर यांच्यासह स्वामी विवेकानंदांच्या आठवणींना उजाळा दिला. स्वातंत्र्याच्या लढाईत विश्वभारती विद्यापीठाचे महत्त्वपूर्ण योगदान असून राष्ट्रवाद आणि देशभक्तीची प्रेरणा याच विद्यापीठातून रुजू झाल्याचं मोदींनी म्हटलं. तसेच, यावेळी बोलताना देशातील तरुणाईनला लोकल टू व्होकलसाठी प्रयत्न करुन आत्मनिर्भतेचा संदेशही मोदींनी दिला.

कोरोना महामारीच्या संकटामुळे यंदा विश्वविद्यालयात यात्रेचं आयोजन करता आलं नाही, तरीही येथील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात येणाऱ्या लोकांशी संपर्क करावा. त्यातून, लोकल कलाकृती ऑनलाईन पद्धतीने कशारितीने विकता येतील, यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन मोदींनी केले आहे. आपले ध्येय साध्य करण्यासाठी एकट्याने चालावे लागले तरी चालावे, जेव्हा स्वातंत्र्यांची लढाई उंबरठ्यावर होती, तेव्हा बंगालनेच या चळवळीला दिशा दिली. त्यासोबतच कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातही पश्चिम बंगालने मोठं योगदान दिलं. 

इतिहासात ही तिसरी वेळ आहे की, यंदा पौष मेळ्याचं आयोजन करण्यात येत नाही. त्यामुळे, यंदा विद्यापीठातील अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी स्थानिक कलाकारांशी संपर्क साधावा, त्यांची कलाकृती ऑनलाईन पद्धतीने बाजारात विकावी, आपलं लोकल प्रोडक्ट ग्लोबल बनविण्याचं काम तुमच्या हाती असल्याचे मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं. तसेच, सन 2015 साली झालेल्या विद्यापीठातील योग डिपार्टमेंटची लोकप्रियता जगभरात झाली. या विद्यापीठाने दिलेला संदेश जगभरात पोहचल्याचेही मोदींनी सांगितंल. 

पंतप्रधान मोदींनी गुरुदेव यांचे मोठे बंधु सत्येंद्र नाथ टॅगोर यांच्यामुळे रविंद्र नाथ टॅगोर यांचं गुजरातशी नातं असल्याचं सांगितलं. सत्येंद्रनाथ टॅगोर यांची नियुक्ती गुजरातमध्ये होती. त्यामुळे, गुरुदेव रविंद्रनाथ हे मोठ्या भावाला भेटण्यासाठी अहमदाबादला येत. तेथेच त्यांनी दोन कवितांचे लेखन केले होते. तर, गुजरातच्या कन्येनंही गुरुदेव यांच्या घरी सून बनून प्रवेश केला. सत्येंद्रनाथ यांची पत्नी ज्ञानेंद्री देवी अहमदाबादमध्ये राहात होत्या, त्यावेळी तेथील महिला साडीचा पदर उजवीकडे टाकत असल्याचं त्यांनी पाहिलं. तेव्हा डाव्या बाजच्या खांद्यावर साडीचा पदर ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. तेव्हापासून ती प्रथा आजतागायत असल्याचंही मोदींनी सांगितलं.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान