शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

डायरी, कॅलेंडरऐवजी एलईडी बल्ब भेट द्या -पंतप्रधानांचे आवाहन

By admin | Updated: January 6, 2015 02:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षानिमित्त भेटवस्तू म्हणून डायरी व कॅलेंडर अशा वस्तू देण्याऐवजी एलईडी बल्ब देण्याचे आवाहन सोमवारी केले.

नवी दिल्ली : विजेची मोठ्या प्रमाणावर बचत करणाऱ्या एलईडी बल्बला ‘प्रकाश पथ’ असे संबोधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षानिमित्त भेटवस्तू म्हणून डायरी व कॅलेंडर अशा वस्तू देण्याऐवजी एलईडी बल्ब देण्याचे आवाहन सोमवारी केले.घरगुती वीज बचत योजनेअंतर्गत वीज ग्राहकांना एलईडी बल्बचे स्वस्त दरात वितरण करण्याची, तसेच देशभरात घरे आणि रस्त्यांवर प्रकाशासाठी एलईडी बल्बचा वापर करून वीज बचत करण्याची राष्ट्रीय योजना सरकारने आखली आहे. दिल्लीत साऊथ ब्लॉकमधील इमारतीत पारंपरिक बल्बच्या जागी स्वत:च्या हाताने एलईडी बल्ब बसवून मोदी यांनी या योजनेचा प्रतिकात्मक शुभारंभ केला. यावेळी बोलताना मोदी यांनी वरील आवाहन केले. कंपन्या आपल्या भागधारकांना लाभांशासोबतही एलईडी बल्ब देऊ शकतात, असेही त्यांनी सुचविले.वीज बचतीसाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून त्यास जनआंदोलनाचे स्वरूप देण्याची आवश्यकता प्रतिपादित करताना पंतप्रधान म्हणाले की, वीज निमिर्तीपेक्षा वीज बचत करणे अधिक किफायतशीर आहे; परंतु प्रत्यक्षात वीजनिर्मितीपेक्षा वीज बचत करणे अधिक कठीण आहे. कारण वीजनिर्मिती करणारी कंपनी मोठ्या प्रमाणावर वीज तयार करू शकते; पण तेवढ्या विजेची बचत करायचे म्हटले, तर त्यासाठी कोट्यवधी ग्राहकांचे सक्रिय सहकार्य लागते.या जनआंदोलनात सेलिब्रिटी व प्रतिष्ठित नागरिकांना सामील करून घेतले जावे, असे सांगून मोदी म्हणाले की, वीज बचत हे राष्ट्रप्रेमाचे काम आहे, कारण त्यामुळे देशाचा आयात खर्च कमी होईल. शिवाय त्यामुळे पर्यावरण रक्षण होत असल्याने ती समाजसेवाही आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)ऊर्जा बचत... विजेची बचत करण्यासाठी घरी आणि रस्त्यांवर एलईडी दिवे वापरण्याच्या मोहिमेचे उद््घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत सोमवारी झाले. यावेळी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग उपस्थित होते.यासाठी ग्राहकाकडून सुरुवातीस फक्त १० रुपये रोख घेतले जातील व त्यानंतर त्याच्या वीज बिलातून पुढील १२ महिने दरमहा १० रुपये वसूल केले जातील. अशा प्रकारे प्रत्येक एलईडी बल्ब खरेदीमागे ग्राहकाचे १३ रुपये वाचतील. शिवाय वीज बचतीने वीज बिल कमी येईल ते वेगळेच. या बल्बची तीन वर्षांची वॉरन्टी असेल.१० रुपयांत एलईडी बल्ब!दिल्लीपासून सुरू करण्यात आलेली ही योजना येत्या मार्चपासून टप्प्याटप्प्याने देशभर राबवून पुढील वर्षाच्या मार्चपर्यंत देशातील १०० शहरांमध्ये घरे व रस्त्यांवर प्रकाशासाठी एलईडी बल्ब बसविण्याचे उद्दिष्ट आहे.एलईडी बल्ब पिवळट प्रकाश देणाऱ्या साधारण दिव्यांच्या तुलनेत ५० पट अधिक व सीएफएल दिव्यांच्या तुलनेत आठ ते १० पट अधिक काळ टिकतात. त्यामुळे किमतीच्या दृष्टीने एलईडी बल्बचा सुरुवातीचा खर्च जास्त असला तरी दीर्घकालीन वीज बचतीच्या दृष्टीने ते वास्तवात स्वस्त पडतात.