शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

जो गुन्हा केलाच नव्हता, त्याबद्दल २० वर्षं शिक्षा भोगून 'तो' अखेर जेलबाहेर आला; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 14:58 IST

बलात्काराच्या आरोपाखाली २ दशकं तुरुंगात असलेल्या विष्णू तिवारी यांची अखेर सुटका

ललितपूर: बलात्काराच्या आरोपात २० वर्षांपासून तुरुंगात असलेल्या विष्णू तिवारी नावाच्या व्यक्तीची उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. तब्बल २ दशकांनंतर विष्णू तिवारी तुरुंगातून बाहेर आले. त्यांना ३ वर्षे ललितपूरच्या, तर १७ वर्षे केंद्रीय कारागृहात ठेवण्यात आलं होतं. ललितपूरमधल्या महरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या सिलावन गावातल्या महिलेनं बलात्काराचा आरोप केल्यानं विष्णू यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.भयंकर! भाजपा खासदाराच्या मुलावर भररस्त्यात गोळीबार, चौकशीतून धक्कादायक सत्य झालं उघडबलात्कार प्रकरणात गेल्या २० वर्षांपासून तुरुंगात असलेल्या विष्णू यांची दोनच दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. तिवारी २३ वर्षांचे असताना ट्रायल कोर्टानं त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ते बलात्काराच्या आरोपात दोषी आढळले होते. आता २० वर्षांनंतर उच्च न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. पण या कालावधीत त्यांनी स्वत:चे आई-वडील आणि दोन मोठे भाऊ गमावले.महिला न्यायाधीशांना 'बर्थ डे'च्या शुभेच्छा दिल्या, आरोपी वकिलास अटकआयपीसी आणि एससी/एसटीच्या अंतर्गत गुन्हा दाखलविष्णू उत्तर प्रदेशच्या ललितपूर गावचा रहिवासी आहेत. वर्ष २००० मध्ये दुसऱ्या एका गावातल्या महिलेनं त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. अनुसूचित जातीच्या महिलेवर बलात्कार केल्याचा, धमकी दिल्याचा, लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा विष्णू यांच्यावर दाखल करण्यात आला. त्यावेळी विष्णू वडील आणि दोन भावांसोबत राहायचे. कुटुंबाला मदत करण्यासाठी ते नोकरी करत होते.वडील, भावंडांच्या अंत्यसंस्कारांना मुकलेट्रायल कोर्टानं विष्णू तिवारींना दोषी ठरवलं. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २००३ मध्ये त्यांची रवानगी आग्र्यातील मध्यवर्ती तुरुंगात करण्यात आली. २००५ मध्ये विष्णू यांनी ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला हाय कोर्टात आव्हान देण्याचा विचार केला. मात्र त्यांना आव्हान देता आलं नाही. सहा वर्षांपूर्वी विष्णू यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. पण पॅरोल न मिळाल्यानं त्यांना वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आलं नाही. दोन भावांच्या अंत्यविधींसाठीदेखील त्यांना पॅरोल मिळाला नाही.