शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

अरे देवा! 'बेपत्ता विवाहिते'ला शोधण्यासाठी NAVY ने खर्च केले 1 कोटी; पण बॉयफ्रेंडसोबत सापडली 'ती' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 14:11 IST

महिला समुद्रात बुडाल्याची शंका आल्यामुळे नौदल आणि तटरक्षक दलानं शोधमोहीम सुरू केली. जवळपास 36 तास सुरू असलेल्या या शोधमोहिमेसाठी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला.

नवी दिल्ली - आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणम येथून दोन दिवसांपूर्वी एक विवाहित महिला बेपत्ता झाली. महिला समुद्रात बुडाल्याची शंका आल्यामुळे नौदल आणि तटरक्षक दलानं शोधमोहीम सुरू केली. जवळपास 36 तास सुरू असलेल्या या शोधमोहिमेसाठी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला. नौदलाचं एक हेलिकॉप्टर आणि तटरक्षक दलाची तीन जहाजं त्या महिलेला शोधत होती. मात्र प्रत्यक्षात ती विवाहित तरुणी प्रियकरासोबत पळून गेली होती. तिने स्वतःच त्याबद्दलची माहिती आता घरच्यांना दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणमच्या आरके बीचवर पती श्रीनिवास यांच्यासोबत 23 वर्षीय साई प्रिया सोमवारी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आली होती. दोघांनी आधी सिंहाचलम मंदिरात दर्शन घेतलं. तिथून ते समुद्रकिनाऱ्यावर आले. तिथे आल्यावर काही फोटो काढले. व्हिडिओही बनवले. त्याच वेळी श्रीनिवास यांच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. त्यामुळे ते बोलण्यात गुंग झाले. बोलणं झालं आणि नंतर पत्नी कुठेच दिसली नाही, म्हणून त्यांनी शोध सुरू केला. तिला फोन करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला; पण तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

अखेर पती श्रीनिवास यांनी थ्री टाउन या स्थानिक पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर घरच्यांना आणि सासरच्यांनाही त्याने कळवलं. तरुणी समुद्रकिनाऱ्यावरून बेपत्ता झाल्यामुळे समुद्रात गेली असेल, अशी शंका पोलिसांना आली. त्यामुळे नौसेना आणि तटरक्षक दलानं शोध सुरू केला. समुद्रात शोधण्यासाठी मच्छिमार आणि स्कूबा डायव्हिंग करणाऱ्यांना समुद्रात उतरवलं गेलं. नौदलानं एक हेलिकॉप्टर आणि तटरक्षक दलानं 3 बोटींच्या साह्यानं शोधमोहीम राबवली; मात्र तरुणीचा काहीच पत्ता लागला नाही. दरम्यान, तरुणीनं तिच्या आईला टेक्स्ट मेसेज करून ती कुठे आहे, याबद्दल कळवलं. आपला प्रियकर रवी याच्यासोबत नेल्लूरला आल्याचंही तिनं सांगितलं. प्रियकरावर काही कारवाई न करण्याबाबतही तिने कुटुंबीयांना विनंती केली. 

थ्री टाउन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. रामा राव यांच्या म्हणण्यानुसार, साई प्रियानं तिच्या लोकेशनबद्दल स्वतःच माहिती दिली आहे. ती नेल्लूरमध्ये असून सुरक्षित आहे. ही माहिती खरी असल्याची खात्री पटवण्यात आली आहे. नौदल आणि तटरक्षक दलानं चालवलेल्या या संपूर्ण शोधमोहिमेसाठी जवळपास एक कोटी रुपये खर्च आला. दोन दिवसांपेक्षा जास्त काळ ही मोहीम सुरू होती. विशाखापट्टणम इथे राहणाऱ्या साई प्रिया हिचं 2020 मध्ये श्रीकाकुलममधल्या श्रीनिवास यांच्यासोबत लग्न झालं होतं. साई प्रिया अजून शिकते आहे, तर पती श्रीनिवास हैदराबादच्या एका फार्मसी कंपनीत कर्मचारी आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :indian navyभारतीय नौदल