शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

हरयाणात हिंसाचार थांबेना; प्रदीप शर्मा हत्येप्रकरणी आप नेत्यासह १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 05:23 IST

- बलवंत तक्षक  लोकमत न्यूज नेटवर्क  चंडीगड : हरयाणातील नूह येथे झालेल्या हिंसाचारात बादशाहपूर येथील बजरंग दलाचे संयोजक प्रदीप शर्मा ...

- बलवंत तक्षक लोकमत न्यूज नेटवर्क चंडीगड : हरयाणातील नूह येथे झालेल्या हिंसाचारात बादशाहपूर येथील बजरंग दलाचे संयोजक प्रदीप शर्मा यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आम आदमी पार्टीचे (आप) नेते जावेद अहमद यांच्यासह सुमारे १५० जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.  दरम्यान,  हरयाणात हिंसाचार सुरूच असून, पानिपतमध्ये दुकानांची तोडफोड करण्यात आली.आपल्या तक्रारीत पवन याने म्हटले आहे की, जावेदने जमावाला सांगितले की, त्यांना मारा. जे होईल ते मी पाहून घेईन.

या हल्ल्यात प्रदीप यांना रॉड लागला आणि ते जखमी होऊन खाली पडले. गोळीबाराचा आवाज ऐकून पोलिस तेथे पोहोचले. प्रदीप यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. जावेद त्या दिवशी घटनास्थळी उपस्थित नव्हता, असे काही लोकांचे म्हणणे आहे. दरम्यान, नूहमध्ये अजूनही संचारबंदी आहे, सरकारने इंटरनेटसेवा, बल्क एसएमएस सेवा ८ ऑगस्टपर्यंत बंद ठेवल्या आहेत. 

दंगलीचे पाकिस्तानी कनेक्शन?n नूह दंगलीचे पाकिस्तानी कनेक्शनही समोर आले आहे. तपासादरम्यान, पोलिसांना पाकिस्तानी यूट्यूबर जीशान मुश्ताकची माहिती मिळाली आहे, ज्याने ‘अहसान मेवाती’ या नावाने सोशल मीडियावर आपले खाते तयार केले होते. त्याने नूह हिंसाचाराच्या वेळी प्रक्षोभक व्हिडीओ पोस्ट केले. n हे लोकेशन राजस्थानातील अलवरचे सांगितले जाते. मात्र, हे व्हिडीओ पाकच्या इस्लामाबाद, लाहोर येथून अपलोड करण्यात आले होते. मोनू मानेसरला मारणे आणि नूह येथील हिंसाचाराला जीशाननेच प्रवृत्त केले होते. पोलिसांनी जीशानविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे.

बिट्टू बजरंगीला अटक नूह येथे हिंसाचार भडकविल्याच्या आरोपावरून पोलिसांनी गोरक्षक बिट्टू बजरंगीला अटक केली आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी बजरंगीविरुद्ध फरिदाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अटक झाल्यानंतर, लगेचच बजरंगीला जामिनावर सोडण्यात आले होते. 

खट्टर, विज यांच्यात तणाव हिंसाचारानंतर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि गृहमंत्री अनिल विज यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे. नूह दंगलीसंदर्भात कोणताही प्रश्न विचारला असता, विज यांनी स्पष्टपणे सांगितले की, तुम्हाला जे विचारायचे आहे, ते मुख्यमंत्र्यांनाच विचारा. त्यांच्याकडे सर्व माहिती आहे. 

पानिपतमध्ये दुकानांची तोडफोड हरयाणाच्या पानिपतमध्ये रविवारी चेहरा झाकून दुचाकीवरून आलेल्या पुरुषांच्या गटाने दोन ठिकाणी काही दुकानांची तोडफोड केली. यात काही लोक जखमी झाले. यासंदर्भात १५ जणांना ताब्यात घेण्यात आहे.

आमदाराची सुरक्षा काढून घेतलीहिंसाचारानंतर खट्टर सरकारने फिरोजपूर-झिरका येथील काँग्रेस आमदार मामन खान यांची सुरक्षा काढून घेतली आहे. नूह येथील हिंसाचारात खान यांचेही नाव जोडले जात आहे. नूह येथील हिंसाचारासाठी मामन खान यांच्या विधानसभेतील भाषणाला जबाबदार धरले जात आहे.

टॅग्स :Haryanaहरयाणा