शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणात हिंसाचार सुरूच

By admin | Updated: February 21, 2016 03:46 IST

जाट आंदोलन चिघळल्यामुळे हरियाणात उफाळलेला हिंसाचार शमला नसून शनिवारी हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्या. झज्जर आणि रोहतकमध्ये हिंसक जमावाला पांगविण्यासाठी

चंदीगड : जाट आंदोलन चिघळल्यामुळे हरियाणात उफाळलेला हिंसाचार शमला नसून शनिवारी हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्या. झज्जर आणि रोहतकमध्ये हिंसक जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात ५ जण ठार झाले आहेत. त्यामुळे कालपासून आंदोलनात मरण पावलेल्यांची संख्या ८ झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी जिंदमध्ये एका रेल्वे स्थानकाला आग लावली; तर लष्कराने संचारबंदी लागू असलेल्या दोन जिल्ह्यांत ध्वजसंचलन केले. रोहतक जिल्ह्यात आंदोलकांनी रस्तेच खणून ठेवल्यामुळे लष्कराला हेलिकॉप्टरद्वारे तिथे धाडले. आंदोलनकर्त्यांनी दिल्ली-रोहतक आणि फजिलका महामार्गावर चक्काजाम केल्याने तिथेही हवाईमार्गे जवानांची कुमक येथे पोहोचविण्यात आली. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून, जाट समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देणे शक्य असल्यास आपण निश्चितच तो निर्णय घेउ, असे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज पुन्हा सांगितले. त्यांनी आंदोलकांना हिंसक मार्गाचा अवलंब न करण्याचे आवाहनही केले. मात्र त्यांच्या या घोषणेने आंदोलकांचे समाधान झालेले नाही. परिणामी आंदोलन लगेचच शांत होण्याची लक्षणे नाहीत. सरकारने शाळा आणि महाविद्यालयांना २२ फेब्रुवारीपर्यंत सुटी जाहीर केली आहे.काही ठिकाणी जाळपोळ तर काही ठिकाणी संचारबंदी यांमुळे रस्ते व रेल्वे वाहतूक बंदच झाली आहे. त्यामुळे नोकरदार तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांचे हाल सुरू आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातून हरयाणामार्गे दिल्ली, पंजाब, जम्मूकडे जाणाऱ्या गाड्या एक तर रद्द करण्यात आल्या आहेत वा निघालेल्या गाड्या मध्येच थांबवण्यात आल्या आहेत. दिल्लीहून हरयाणात वा तेथून दिल्लीकडे रोज नोकरी, उद्योगासाठी येणाऱ्या मंडळींचे तर प्रचंड हाल होत आहेत. मारुती कंपनीने कारखाना बंद करून, कारचे उत्पादन थांबवले आहे. काही अज्ञात व्यक्तींनी सकाळी जिंद जिल्ह्यातील बुढाखेडा रेल्वेस्टेशनला आग लावली. या आगीत येथील फर्निचर, रेकॉर्ड रुम आणि इतर सामान जळून खाक झाले. प्रशासनाने दिसताक्षणी गोळी मारण्याचे आदेश दिल्यावरही रात्रभर अनेक जिल्ह्यात हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना सुरूच होत्या. हिसार, झज्जर, जिंद, कैथल आणि पानिपतमध्ये याची तीव्रता अधिक आहे.जाट आंदोलनकर्त्यांनी अनेक ठिकाणी रस्ते खोदून वाहतूक ठप्प पाडली आहे. लष्कराच्या एका ताफ्याला रस्ता खोदला असल्याने मदनखेरी गावाजवळच थांबावे लागले. राज्याच्या अनेक भागांत हिंसाचार सुरूच असून रोहतक, भिवानी, झज्जर आणि गुरगावमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रोहतक आणि भिवानीमध्ये लष्कराने ध्वजसंचलन केले. राज्यात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याला सरकारचे प्राधान्य असून यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल,असे पोलीस महासंचालक यशपाल सिंघल यांनी पत्रपरिषदेत सांगितले.पोलीस ठाणे आणि पेट्रोल पंप जाळलारोहतक येथून प्राप्त वृत्तानुसार जिल्ह्यातील मेहम गावात सुमारे दोन ते अडीच हजार लोकांच्या हिंसक जमावाने पोलीस ठाणे, पेट्रोल पंप आणि शासकीय इमारतींना आग लावली. भाजपच्या खासदाराचे घर जाळण्याचाही प्रयत्न आंदोलकांनी केला. हिसारमध्ये एक मॉल पेटवण्याचे प्रयत्न हिंसक जमावाने शुक्रवारी रात्री केले.खट्टर यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आंदोलन मागे घेऊन राज्यात शांतता आणि कायदा-व्यवस्था कायम राखण्याचे तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान न करण्याचे आवाहन केले आहे. आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक घेण्यात आली.जातीच्या आधारे फूट पाडण्याचा भाजपा, संघाचा डाव : काँग्रेसचा आरोपहिंसक आंदोलनासाठी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असून, जातीच्या आधारे राज्यात फूट पाडण्याचा हा डाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकांना शांतता राखण्याचे आणि चर्चेतून तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी हरियाणावासीयांना राज्याच्या हितासाठी आंदोलन मागे घेण्याची विनंती शनिवारी केली. दिल्लीत पाण्याची चिंतादिल्लीला ६0 टक्के पाणीपुरवठा करणाऱ्या मुनक कालव्यावरही आंदोलकांनी कब्जा प्रस्थापित केल्यामुळे अवघे दिल्ली शहर चिंतित असून, मुख्यमंत्री केजरीवालांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंहांकडे त्वरित हस्तक्षेपाची मागणी केली आहे. जाट आरक्षण आंदोलनामुळे रेल्वेला दररोज 200कोटींचे नुकसान सोसावे लागतेय. ७१६ ट्रेन्सवर या आंदोलनाचा विपरीत परिणाम झाला असून, 450 पेक्षा अधिक ट्रेन्स रद्द केल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क /वृत्तसंस्था)