शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, कामावरून घरी परतत असलेल्या बिहारमधील २ मजुरांची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 08:21 IST

मणिपूरमध्ये बिहारमधील दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी सायंकाळी ५.२० च्या सुमारास घडली.

गेल्या काही दिवसापासून हिंसाचार सुरू आहे, अजूनही हिंसाचार थांबत नाही.  काल शनिवारी सायंकाळी बिहारमधील दोन जणांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. ही घटना ककचिंग जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही स्थलांतरित मजुरांची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ५.२० च्या सुमारास ही घटना घडली. दोन्ही मजूर ककचिंग जिल्ह्यातील केरक येथे बांधकाम करून परतत होते. ही घटना पंचायत कार्यालयाजवळ घडल्याचे ककचिंग पोलिसांनी सांगितले आहे. सुनालाल कुमार (१८) आणि मोहन सानी यांचा मुलगा दशरथ कुमार (१७) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही यादवपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गोपालगंज जिल्ह्यातील राजवाही गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही तर मनुस्मृतीविरुद्ध संविधानाची लढाई; राहुल गांधी यांचे लोकसभेत चर्चेवेळी कठोर टीकास्त्र

दोन्ही मजूर सायकलवरून भाड्याच्या घरात परतत होते. यादरम्यान बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही स्थानिक जीवन रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. हत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मणिपूर १९ महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. आतापर्यंत शेकडो लोकांचा बळी गेला आहे. हजारो कुटुंबांना घरे सोडून मदत छावण्यांमध्ये राहावे लागले आहे. मात्र मणिपूर शांत होण्याऐवजी संतप्त होत आहे.

गेल्या वर्षी ३ मे रोजी ईशान्येकडील मणिपूर राज्यात कुकी समुदायाकडून 'आदिवासी एकता मार्च' काढण्यात येत असताना हिंसाचार उसळला होता. चुरचंदपूरच्या तोरबांग परिसरातून हा मोर्चा निघाला होता. मेईतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येत होता. यावेळी कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला. तेव्हापासून येथील परिस्थिती तणावपूर्ण आहे. मणिपूरमध्ये अजूनही हिंसाचार सुरूच आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार