शहरं
Join us  
Trending Stories
1
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
2
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
3
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
4
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
5
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
6
प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
7
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
8
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
9
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
10
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
11
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
12
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
13
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
14
सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?
15
फायद्याची गोष्ट! हात धुण्याची योग्य पद्धत माहितीय का? ९९% लोक करतात 'या' छोट्या चुका
16
क्रेडिट कार्ड बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? बंद करण्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाची गोष्टी
17
बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
18
'कौआ बिर्याणी'च्या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आठवतोय का?, एकेकाळी विकायचा साडी
19
शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट! पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? तुमचे नाव यादीत असे घरबसल्या तपासा
20
Gold Price Impacts on buying: किंमती वाढल्या तरी सोनं खरेदी करणं थांबवत नाहीत भारतीय; पण यावेळी झालाय परिणाम, जाणून घ्या

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, कामावरून घरी परतत असलेल्या बिहारमधील २ मजुरांची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 08:21 IST

मणिपूरमध्ये बिहारमधील दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी सायंकाळी ५.२० च्या सुमारास घडली.

गेल्या काही दिवसापासून हिंसाचार सुरू आहे, अजूनही हिंसाचार थांबत नाही.  काल शनिवारी सायंकाळी बिहारमधील दोन जणांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. ही घटना ककचिंग जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही स्थलांतरित मजुरांची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ५.२० च्या सुमारास ही घटना घडली. दोन्ही मजूर ककचिंग जिल्ह्यातील केरक येथे बांधकाम करून परतत होते. ही घटना पंचायत कार्यालयाजवळ घडल्याचे ककचिंग पोलिसांनी सांगितले आहे. सुनालाल कुमार (१८) आणि मोहन सानी यांचा मुलगा दशरथ कुमार (१७) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही यादवपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गोपालगंज जिल्ह्यातील राजवाही गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही तर मनुस्मृतीविरुद्ध संविधानाची लढाई; राहुल गांधी यांचे लोकसभेत चर्चेवेळी कठोर टीकास्त्र

दोन्ही मजूर सायकलवरून भाड्याच्या घरात परतत होते. यादरम्यान बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही स्थानिक जीवन रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. हत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मणिपूर १९ महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. आतापर्यंत शेकडो लोकांचा बळी गेला आहे. हजारो कुटुंबांना घरे सोडून मदत छावण्यांमध्ये राहावे लागले आहे. मात्र मणिपूर शांत होण्याऐवजी संतप्त होत आहे.

गेल्या वर्षी ३ मे रोजी ईशान्येकडील मणिपूर राज्यात कुकी समुदायाकडून 'आदिवासी एकता मार्च' काढण्यात येत असताना हिंसाचार उसळला होता. चुरचंदपूरच्या तोरबांग परिसरातून हा मोर्चा निघाला होता. मेईतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येत होता. यावेळी कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला. तेव्हापासून येथील परिस्थिती तणावपूर्ण आहे. मणिपूरमध्ये अजूनही हिंसाचार सुरूच आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार