शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

आंध्रात मतदानाच्या वेळी हिंसाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 04:55 IST

दोन स्थानिक नेत्यांचा झाला मृत्यू; ईव्हीएमविषयी तक्रारी; छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट

नवी दिल्ली : देशातील ९१ लोकसभा मतदारसंघांत गुरुवारी साधारणपणे शांततेने मतदान पार पडले असले तरी आंध्र प्रदेश व काश्मीरमध्ये ईव्हीएमविषयी अनेक तक्रारी आल्या. आंध्र प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी द्विवेदी यांनाच त्याचा फटका बसल्याचे आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले. आंध्रातच तेलगू देसम व वायएसआर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये हाणामारी झाली आणि त्यात दोन जण मरण पावले, तर छत्तीसगडमध्ये दोन ठिकाणी नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. मात्र सुदैवाने त्यात प्राणहानी झाली नाही.

जम्मू भागातील मतदारसंघांत भाजपच्या उमेदवाराला मतदान करा, असे सुरक्षा रक्षक मतदारांना सांगत असल्याचा व्हिडीओ ओमर अब्दुल्ला व मेहबुबा मुफ्ती यांनी सादर केला आहे. तेथील काही मतदान केंद्रांत ईव्हीएमवर हाताच्या चिन्हाचे बटण दाबले जात नसल्याच्या तक्रारी काही मतदारांनी केल्या. उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये हाताचे बटण दाबल्यावर कमळाला मत जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रे सकाळी सुरू होण्यात अडचणी आल्याने मतदानास विलंब झाला. एका ठिकाणी तर या यंत्रांच्या चाचणीच्या वेळी झालेले मतदान रद्द करण्यात आले नव्हते. त्यामुळे ते रद्द करताना नंतर ज्यांनी मतदान केले, तेही रद्द झाले.दिल्लीजवळील, उत्तर प्रदेशच्या नॉयडा भागात पोलिसांना जी जेवणाची पाकिटे देण्यात आली, त्यावर नमो फूड्स असे छापलेलेहोते. ती भाजपतर्फे देण्यात आल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केला असला तरी त्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील फरसगाव येथे निवडणूक कर्मचाºयांना संरक्षणात मतदान केंद्रांवर नेले जात असताना पहाटे सव्वाचार वाजता नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. मात्र सीआरपीएफ जवानांनी या कर्मचाºयांना अन्य मार्गाने नेल्याने प्राणहानी झाली नाही. विजापूर येथे ४ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून तीन रायफली जप्त करण्यात आल्या.

आंध्रात विधानसभेसाठीचे मतदान सुरू असताना अनंतपूर जिल्ह्यातील मीरापूरममध्ये झालेल्या हिंसाचारात तेलुगू देसम व वायएसआर काँग्रेसचे दोन स्थानिक नेते ठार झाले. ुवायएसआर काँग्रेसचे आमदार जी. श्रीनिवास रेड्डी जखमी झाले. जन सेनेच्या एका उमेदवाराने ईव्हीएम नीट चालत नसल्याने ते जमिनीवर फेकले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली.

मतदानास मज्जावउत्तर प्रदेशात कैराना मतदारसंघात आपणास मतदान करू दिले नाही. आपल्याऐवजी निवडणूक अधिकाºयांनीच मतदान केले, असा आरोप दोन मतदारांनी केला. त्यामुळे मतदानावर बहिष्काराचा निर्णय गावकºयांनी घेतला. त्यामुळे तिथे गोंधळ उडाला आणि तो थांबविण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी हवेत गोळीबार केला. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी तिथे जाऊ न मतदारांची समजूत घातली. त्यानंतर मतदान पूर्ववत सुरू झाले.

टॅग्स :Andhra Pradesh Lok Sabha Election 2019आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक 2019