शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

...म्हणून शेतकऱ्यांनी शेतात उभारली हत्तीची मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 11:29 IST

शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळ हत्तीची एक मोठी मूर्ती उभारली आहे.

ठळक मुद्देछत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातही जंगली हत्तींनी उच्छाद मांडला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळ हत्तीची एक मोठी मूर्ती उभारली आहे. गणपती हत्तींपासून त्यांच्या शेताचं आणि पिकांचं रक्षण करेल अशी ग्रामस्थांना आशा आहे.

महासमुंद - शेतकरी शेतात राबून अन्नधान्य पिकवत असतात. मात्र अनेक ठिकाणी जंगलातील प्राणी त्यांच्या पिकांचं नुकसान करतात. हत्तींनी धुमाकूळ घातल्याच्या घटना समोर येत असतात. हत्ती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील करतात. छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातही जंगली हत्तींनी उच्छाद मांडला आहे. शेतात घुसून हत्तींचा कळप शेतीची नासधूस करतो. सातत्याने होणाऱ्या या नुकसानीमुळे गावातील शेतकरी हतबल झाले आहेत. यावर उपाय म्हणून आता शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळ हत्तीची एक मोठी मूर्ती उभारली आहे. तसेच देवाकडे प्रार्थना केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातील कुकराडीह गावामध्ये शेताजवळ हत्तीची एक मोठी मूर्ती उभारण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी हत्तींच्या त्रासाला कंटाळून आपल्या शेताजवळ ही मूर्ती उभारली आहे. कुकराडीह गावात हत्तींची दहशत निर्माण झाली आहे. शेतात घुसून हत्तींचा कळप शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान करत आहे. 

शेतकऱ्यांनी अनेकदा याबाबत सरकार आणि प्रशासनाला माहिती दिली. तसेच या समस्येवर काहीतरी मार्ग काढावा असे सांगितले. मात्र प्रशासनाने अद्याप काहीच उपाययोजना न केल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली. त्यामुळे त्यांनी आता हत्तीची मूर्ती उभारून देवाकडे त्यासाठी प्रार्थना केली आहे. गणपती हत्तींपासून त्यांच्या शेताचं आणि पिकांचं रक्षण करेल अशी ग्रामस्थांना आशा आहे. 'आम्ही विधिवत पूजा करून शेतामध्ये हत्तीची मूर्ती उभारली आहे. गणपती हत्तींपासून आमच्या शेताचे रक्षण करेल. हत्तीची ही मूर्ती आमच्या संपूर्ण गावाचं रक्षण करेल असा विश्वास आहे' अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. 

हत्तींमुळे शेतीचे खूप नुकसान होत आहे. हत्तींपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं वन विभागाने म्हटलं आहे. मात्र कुकराडीह गावातील  शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळ हत्तीची एक मोठी मूर्ती उभारली आहे. तसेच पूजा करून देवाकडे प्रार्थना केली आहे. गणपती बाप्पा हत्तींपासून त्यांच्या शेताचं आणि पिकांचं रक्षण करेल अशी त्यांना आशा आहे. वनविभागचे अधिकारी मयांक पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही शेतकऱ्यांचा विश्वासाचा आदर करतो. हत्तींमुळे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत.' 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडFarmerशेतकरीagricultureशेती