शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
5
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
6
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
7
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
8
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
9
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
10
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
11
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
12
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
13
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
15
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
16
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
17
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
18
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
19
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
20
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण

मोदींनी उल्लेख केलेले गाव अजूनही अंधारात

By admin | Updated: August 18, 2016 06:08 IST

हाथरसमध्ये नागला फटेला नावाचे खेडे आहे. दिल्लीहून तीन तासांत तेथे पोहोचता येते; मात्र या गावात वीज पोहोचण्यासाठी ७० वर्षे लागली, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी

- शीलेश शर्मा, नवी दिल्ली

हाथरसमध्ये नागला फटेला नावाचे खेडे आहे. दिल्लीहून तीन तासांत तेथे पोहोचता येते; मात्र या गावात वीज पोहोचण्यासाठी ७० वर्षे लागली, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात केले होते. त्यांच्या या विधानाने गावातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण यातील अनेक जण आजही विजेविना जगत आहेत. या गावात ६०० घरे असून, त्यातील ४५० घरांत आजही वीज नाही. ज्या १५० घरांत वीज आहे ती त्यांनी विंधन विहिरीसाठी बसविलेल्या रोहित्रावर आकडे टाकून घेतली असून, त्याबदल्यात ते दक्षिणांचल विद्युत वितरण निगमला दर दोन महिन्याला ३९५ रुपये देतात, असे गावचे सरपंच योगेश कुमार यांनी एका दैनिकाला सांगितले. कदाचित पंतप्रधानांना आमच्या गावातील परिस्थितीची कल्पना दिली गेली नसेल, असे गावातील एक रहिवासी उलानूर उस्मानी यांनी सांगितले. नागला फटेला हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव राजधानी दिल्लीपासून ३०० कि.मी. अंतरावर आहे. या गावात ९०० नोंदणीकृत मतदार आहेत. पंतप्रधान ग्रामीण विद्युतीकरण मोहिमेअंतर्गत पायाभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या १०,०४५ गावांत नागला फटेलाचा समावेश आहे. कळस म्हणजे पंतप्रधान कार्यालयाने या गावातील ग्रामस्थ टीव्ही पाहत असल्याची छायाचित्रे स्वातंत्र्यदिनी शेअर केली. ही छायाचित्रे पाहिल्यानंतर ‘हसावे की रडावे’, अशी अवस्था ग्रामस्थांची झाली. ही छायाचित्रे आमच्या गावची नाहीत. फुगे असलेले छायाचित्र नागला सिंधी या गावचे असू शकते. हे गावही हाथरसमध्ये असून, याच योजनेअंतर्गत त्याचे विद्युतीकरण झाले आहे, असे नागला फटेलाचे माजी सरपंच देवेंद्रसिंह यांनी सांगितले. वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता व्ही. एस. गंगवार यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, १९८५ मध्येच या गावाला वीज पुरवठा करण्यात आला आहे. अद्याप दूरचे स्वप्नचऊर्जा मंत्रालयानुसार १८ हजार ४७५ गावांचे संपूर्ण विद्युतीकरण मे २०१७ पर्यंत पूर्ण होणार आहे. ‘दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत आमच्या गावच्या विद्युतीकरणासाठी सरकारने व्यवस्था केली, हे खरे आहे. आम्हाला विद्युत खांब, वीजतारा आणि मीटर मिळाले; परंतु वीज पुरवठा अद्यापही आमच्यासाठी दूरचे स्वप्न आहे, असे सरपंच कुमार यांनी म्हटले.