शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
3
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
4
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
5
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
6
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
7
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
8
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
9
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
10
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
11
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
12
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
13
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
14
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
15
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
16
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
19
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
20
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

स्वातंत्र्यपूर्व भारतातील 'या' होत्या पहिल्या महिला मंत्री; देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही सक्रीय सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 10:05 IST

Vijaya Lakshmi Pandit : देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना जाणून घेऊया, भारतीय महिला नेत्या विजयालक्ष्मी पंडित यांच्याविषयी. त्यांना स्वातंत्र्यपूर्व भारतात मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

भारताच्या राजकारणात आज महिलांचे स्थान खूप मजबूत झाले आहे. अलीकडेच देशाला द्रौपदी मुर्मूंच्या रूपाने दुसऱ्या महिला राष्ट्रपती मिळाल्या. पण, जेव्हा भारत इंग्रजांचा गुलाम होता, तेव्हाही एक स्त्री राजकीय पद भूषवत होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देण्यासोबतच त्यांनी गुलामगिरीतील भारताच्या राजकारणातही सक्रिय भूमिका बजावली. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना जाणून घेऊया, भारतीय महिला नेत्या विजयालक्ष्मी पंडित यांच्याविषयी. त्यांना स्वातंत्र्यपूर्व भारतात मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते, तसेच संयुक्त राष्ट्र महासभेच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या होत्या.

विजयालक्ष्मी पंडित कोण?विजयालक्ष्मी पंडित या स्वातंत्र्यपूर्व भारतातील सक्रिय राजकारणात सहभागी असलेल्या महिला नेत्या होत्या. लोक विजयालक्ष्मी पंडित यांना भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची बहीण म्हणूनही ओळखतात. पण, भारताच्या स्वातंत्र्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, राजकीय कारकीर्द घडवण्यापूर्वी मुत्सद्दी म्हणून काम केले, ज्यात आणीबाणी लागू केल्याबद्दल भाची इंदिरा गांधी यांची निंदा करणे आणि राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणे यांचा समावेश होता.

जीवन परिचय अलाहाबादमध्ये १८ ऑगस्ट १९०० रोजी मोतीलाल नेहरू आणि स्वरूप राणी नेहरू यांच्या घरी विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्म झाला. त्या जवाहरलाल नेहरूंपेक्षा अकरा वर्षांनी लहान होत्या. १९२१ मध्ये त्यांचा विवाह काठियावाड येथील प्रसिद्ध वकील रणजीत सीताराम पंडित यांच्याशी झाला. त्यांच्या मुलीचे नाव नयनतारा सहगल आहे. १९३२-१९३३, १९४० आणि १९४२-१९४३ या स्वातंत्र्यलढ्यात त्यांना तीनदा अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. तथापि, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश भारताच्या अनैच्छिक सहभागाला विरोध करण्यासाठी त्यांनी १९३९ मध्ये काँग्रेसमधील आपल्या सहकाऱ्यांसह राजीनामाही दिला होता. १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन शिगेला पोहोचले असताना पंडित आणि त्यांचे पती दोघांनाही ब्रिटिशांनी अटक केली. जानेवारी १९४४ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले.

राजकारणात विजयालक्ष्मी १९३७ मध्ये त्या संयुक्त प्रांताच्या प्रांतीय विधानसभेची निवडणूक जिंकल्या. यावेळी त्यांना स्थानिक स्वराज्य आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री बनवण्यात आले. ज्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळवणाऱ्या त्या स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिल्या महिला ठरल्या. १९३८ पर्यंत आणि पुन्हा १९४६ ते १९४७ पर्यंत हे पद सांभाळले. १९४६ मध्ये त्या संयुक्त प्रांतातून संविधान सभेवर निवडून आल्या.

संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या पहिल्या महिलायाशिवाय १९४० ते १९४२ या काळात अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्या संयुक्त राष्ट्रात भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. १९४७ मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यातून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी राजनैतिक सेवेत प्रवेश केला आणि १९४७ मध्ये त्यांची पहिली महिला राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९४७ ते १९४९ पर्यंत सोव्हिएत युनियनमध्ये, १९४९ ते १९५१ पर्यंत युनायटेड स्टेट्स आणि मेक्सिकोमध्ये, १९५५ ते १९६१ पर्यंत आयर्लंडमध्ये (या काळात त्या युनायटेड किंगडममध्ये भारतीय उच्चायुक्तही होत्या) आणि १९५८ ते १९६१ पर्यंत स्पेनमध्ये त्या भारताच्या राजदूत होत्या. १९५३ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या. १९९० मध्ये विजयालक्ष्मी पंडित यांचे निधन झाले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन