शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विजय मल्ल्या भारतामध्ये येणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:32 IST

‘किंगफिशर एअरलाइन्स’साठी सरकारी बँकांकडून घेतलेले सुमारे ९,००० हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परागंदा झालेले वादग्रस्त ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्याचे

- लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘किंगफिशर एअरलाइन्स’साठी सरकारी बँकांकडून घेतलेले सुमारे ९,००० हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परागंदा झालेले वादग्रस्त ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्याचे ब्रिटनमधून भारतात प्रत्यार्पण दोन्ही देशांमधील करारातील एका अटीमुळे कठीण ठरू श्केल, असे संकेत सरकारने बुधवारी संसदेत दिले.आरोपीचे ज्या कारणासाठी प्रत्यार्पण करायचे आहे तो दोन्ही देशांच्या कायद्यानुसार फौजदारी गुन्हा असायला हवा, अशी भारत व ब्रिटन यांच्यातील करारात अट आहे. म्हणजेच बँकांचे कर्ज बुडविणे हा भारताप्रमाणे ब्रिटनमध्येही गुन्हा आहे, असे भारत दाखवू शकला तरच मल्ल्याचे प्रत्यार्पण केले जाऊ शकेल.ब्रिटनमध्ये बँकांचे कर्ज बुडविणे हा फौजदारी गुन्हा नाही तर तो एक दिवाणी स्वरूपाचा प्रमाद आहे. यामुळे मल्ल्याच्या प्रत्यार्पणात अडचण येऊ शकते का, या एका सदस्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी उभय देशांमधील प्रत्यार्पण करारात अट असल्याचे कबुल केले.मात्र असे असले तरी सरकार या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष देत आहे व ब्रिटिश न्यायालयाचे समाधान करून प्रत्यार्पण यशस्वी व्हावे यासाठी जे काही करावे लागेल ते सर्व करत आहे, अशी खात्री जनरल सिंग यांनी दिली. वेस्टमिन्स्टर येथील दंडाधिकारी न्यायालयात मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणी डिसेंबरपासून नियमित सुनावणी होणे अपेक्षित आहे.मल्ल्याच्या जामिनाच्या अटीप्रत्यार्पणाचे प्रकरण हाती घेण्याआधी लंडनमध्ये मल्ल्याला औपचारिक अटक करून जामिनावर सोडण्यात आले आहे. सरकारतर्फे मल्ल्याच्या जामिनाच्या अटींची माहितीही संसदेत दिली गेली. त्यापैकी काही प्रमुख अटी खाली नमूद केल्या आहे...- रद्द केलेला भारतीय पासपोर्ट पोलिसांकडेच राहिल.- लंडनमधील दिलेल्या पत्त्यावरच वास्तव्य करावे लागेल.- ब्रिटन सोडून बाहेर जाता येणार नाही.- मोबाईल फोन पूर्णपणे चार्ज करून ‘आॅन’ स्थितीमध्ये अहोरात्र जवळ बाळगावा लागेल.- ६.५० लाख पौंडांचा व्यक्तिगत बॉण्ड द्यावा लागेल.