शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

२२० गावात विहीर अधिग्रहण : ८४१ ठिकाणी नवीन विंधन विहिरी ५१ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा

By admin | Updated: April 26, 2016 23:11 IST

जळगाव : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्‘ातील टंचाईसदृष्य गावांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पारोळा, अमळनेर व जामनेर तालुक्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाभरात ५१ गावांमध्ये ४३ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे.

जळगाव : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्‘ातील टंचाईसदृष्य गावांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पारोळा, अमळनेर व जामनेर तालुक्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाभरात ५१ गावांमध्ये ४३ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे.
३५९ गावांमध्ये टंचाईस्थिती
सलग दुसर्‍या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे यावर्षी पाणी टंचाई असलेल्या गावांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या जळगाव जिल्‘ातील ३५९ गावांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने टँकरने पाणी पुरविणे, विहीर अधिग्रहण करणे, तात्पुरत्या पाणी योजना राबविणे यासारख्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
५१ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा
सध्या जिल्हा प्रशासनातर्फे ५१ गावांमध्ये ४३ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. यात १० शासकीय तर खाजगी ३३ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा होत आहे. जामनेर तालुक्यातील १४ गावांमध्ये तर पारोळा तालुक्यातील १५ गावांमध्ये, अमळनेर तालुक्यातील १३ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
८४१ नवीन विंधन विहीर
जिल्हा प्रशासनाने तब्बल ८४१ नवीन विंधन विहिरीसाठी मंजुरी दिली आहे. तर २२० गावांमध्ये भीषण पाणी टंचाई असल्याने विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात सर्वाधिक जामनेर तालुक्यातील ४५ गावांमध्ये विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. तर धरणगाव तालुक्यात३७ गावांमधील ४१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ अमळनेर तालुक्यातील ३५ गावांमध्ये ३३ विहिरींचे अधिग्रहण झाले आहे.

३८९ गावांत विधन विहीर
पाणी टंचाईच्या झळा जाणवत असल्याने प्रत्येक तालुक्यात जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हाभरात ३८९ गावांमधील ८४१ ठिकाणी नवीन विंधन विहीर देण्यात आल्या आहेत. यात चाळीसगाव तालुक्यातील ९० गावांमध्ये सर्वाधिक २२३ विंधन विहिरी देण्यात आल्या आहेत. तर जामनेर तालुक्यात फक्त दोन गावांमध्ये पाच नवीन विंधन विहिरी देण्यात आल्या आहेत.

जामनेर, पारोळा व अमळनेर तालुक्यात गंभीर स्थिती
जामनेर तालुक्यातील सर्वाधिक ८५ गावांमध्ये तर पारोळा तालुक्यातील ६८ गावांमध्ये पाणी टंचाईची स्थिती आहे. त्या पाठोपाठ अमळनेर तालुक्यातील ५२ गावांमध्ये टंचाईस्थिती असणार आहे. चाळीसगाव व पाचोरा तालुक्यातील गावांची संख्या ५० पेक्षा जास्त असल्याने या ठिकाणी भीषण पाणी टंचाई भासत आहे.