शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

२२० गावात विहीर अधिग्रहण : ८४१ ठिकाणी नवीन विंधन विहिरी ५१ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा

By admin | Updated: April 26, 2016 23:11 IST

जळगाव : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्‘ातील टंचाईसदृष्य गावांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पारोळा, अमळनेर व जामनेर तालुक्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाभरात ५१ गावांमध्ये ४३ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे.

जळगाव : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्‘ातील टंचाईसदृष्य गावांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पारोळा, अमळनेर व जामनेर तालुक्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाभरात ५१ गावांमध्ये ४३ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे.
३५९ गावांमध्ये टंचाईस्थिती
सलग दुसर्‍या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे यावर्षी पाणी टंचाई असलेल्या गावांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या जळगाव जिल्‘ातील ३५९ गावांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने टँकरने पाणी पुरविणे, विहीर अधिग्रहण करणे, तात्पुरत्या पाणी योजना राबविणे यासारख्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
५१ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा
सध्या जिल्हा प्रशासनातर्फे ५१ गावांमध्ये ४३ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. यात १० शासकीय तर खाजगी ३३ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा होत आहे. जामनेर तालुक्यातील १४ गावांमध्ये तर पारोळा तालुक्यातील १५ गावांमध्ये, अमळनेर तालुक्यातील १३ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
८४१ नवीन विंधन विहीर
जिल्हा प्रशासनाने तब्बल ८४१ नवीन विंधन विहिरीसाठी मंजुरी दिली आहे. तर २२० गावांमध्ये भीषण पाणी टंचाई असल्याने विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात सर्वाधिक जामनेर तालुक्यातील ४५ गावांमध्ये विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. तर धरणगाव तालुक्यात३७ गावांमधील ४१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ अमळनेर तालुक्यातील ३५ गावांमध्ये ३३ विहिरींचे अधिग्रहण झाले आहे.

३८९ गावांत विधन विहीर
पाणी टंचाईच्या झळा जाणवत असल्याने प्रत्येक तालुक्यात जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हाभरात ३८९ गावांमधील ८४१ ठिकाणी नवीन विंधन विहीर देण्यात आल्या आहेत. यात चाळीसगाव तालुक्यातील ९० गावांमध्ये सर्वाधिक २२३ विंधन विहिरी देण्यात आल्या आहेत. तर जामनेर तालुक्यात फक्त दोन गावांमध्ये पाच नवीन विंधन विहिरी देण्यात आल्या आहेत.

जामनेर, पारोळा व अमळनेर तालुक्यात गंभीर स्थिती
जामनेर तालुक्यातील सर्वाधिक ८५ गावांमध्ये तर पारोळा तालुक्यातील ६८ गावांमध्ये पाणी टंचाईची स्थिती आहे. त्या पाठोपाठ अमळनेर तालुक्यातील ५२ गावांमध्ये टंचाईस्थिती असणार आहे. चाळीसगाव व पाचोरा तालुक्यातील गावांची संख्या ५० पेक्षा जास्त असल्याने या ठिकाणी भीषण पाणी टंचाई भासत आहे.