शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
3
लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
5
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
6
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
7
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
8
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
9
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
10
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
13
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
14
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
15
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
16
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
17
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
18
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
19
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
20
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

२२० गावात विहीर अधिग्रहण : ८४१ ठिकाणी नवीन विंधन विहिरी ५१ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा

By admin | Updated: April 26, 2016 23:11 IST

जळगाव : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्‘ातील टंचाईसदृष्य गावांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पारोळा, अमळनेर व जामनेर तालुक्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाभरात ५१ गावांमध्ये ४३ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे.

जळगाव : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्‘ातील टंचाईसदृष्य गावांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पारोळा, अमळनेर व जामनेर तालुक्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाभरात ५१ गावांमध्ये ४३ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे.
३५९ गावांमध्ये टंचाईस्थिती
सलग दुसर्‍या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे यावर्षी पाणी टंचाई असलेल्या गावांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या जळगाव जिल्‘ातील ३५९ गावांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने टँकरने पाणी पुरविणे, विहीर अधिग्रहण करणे, तात्पुरत्या पाणी योजना राबविणे यासारख्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
५१ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा
सध्या जिल्हा प्रशासनातर्फे ५१ गावांमध्ये ४३ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. यात १० शासकीय तर खाजगी ३३ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा होत आहे. जामनेर तालुक्यातील १४ गावांमध्ये तर पारोळा तालुक्यातील १५ गावांमध्ये, अमळनेर तालुक्यातील १३ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
८४१ नवीन विंधन विहीर
जिल्हा प्रशासनाने तब्बल ८४१ नवीन विंधन विहिरीसाठी मंजुरी दिली आहे. तर २२० गावांमध्ये भीषण पाणी टंचाई असल्याने विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात सर्वाधिक जामनेर तालुक्यातील ४५ गावांमध्ये विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. तर धरणगाव तालुक्यात३७ गावांमधील ४१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ अमळनेर तालुक्यातील ३५ गावांमध्ये ३३ विहिरींचे अधिग्रहण झाले आहे.

३८९ गावांत विधन विहीर
पाणी टंचाईच्या झळा जाणवत असल्याने प्रत्येक तालुक्यात जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हाभरात ३८९ गावांमधील ८४१ ठिकाणी नवीन विंधन विहीर देण्यात आल्या आहेत. यात चाळीसगाव तालुक्यातील ९० गावांमध्ये सर्वाधिक २२३ विंधन विहिरी देण्यात आल्या आहेत. तर जामनेर तालुक्यात फक्त दोन गावांमध्ये पाच नवीन विंधन विहिरी देण्यात आल्या आहेत.

जामनेर, पारोळा व अमळनेर तालुक्यात गंभीर स्थिती
जामनेर तालुक्यातील सर्वाधिक ८५ गावांमध्ये तर पारोळा तालुक्यातील ६८ गावांमध्ये पाणी टंचाईची स्थिती आहे. त्या पाठोपाठ अमळनेर तालुक्यातील ५२ गावांमध्ये टंचाईस्थिती असणार आहे. चाळीसगाव व पाचोरा तालुक्यातील गावांची संख्या ५० पेक्षा जास्त असल्याने या ठिकाणी भीषण पाणी टंचाई भासत आहे.