शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
2
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
4
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
5
संविधान दिन २०२५: PM नरेंद्र मोदींचे देशाला खुले पत्र; म्हणाले, “निवडणुकीत मतदानाची संधी...”
6
काजू, बदाम, पिस्ता आणि शेरनी बाई...; मतदार यादी पाहून अधिकारीही झाले थक्क! हटके नावांमागे कारण काय?
7
“भाजपाची ठोकशाही सहन करणार नाही, सत्तेचा माज उतरायला वेळ लागणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
9
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
10
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
11
"घरात चाललीय मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर...", पूजाने घेतला सोहमच्या नावाचा हटके उखाणा
12
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
13
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
14
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
15
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
16
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
17
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
18
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
19
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
20
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

२२० गावात विहीर अधिग्रहण : ८४१ ठिकाणी नवीन विंधन विहिरी ५१ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा

By admin | Updated: April 26, 2016 23:11 IST

जळगाव : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्‘ातील टंचाईसदृष्य गावांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पारोळा, अमळनेर व जामनेर तालुक्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाभरात ५१ गावांमध्ये ४३ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे.

जळगाव : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्‘ातील टंचाईसदृष्य गावांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पारोळा, अमळनेर व जामनेर तालुक्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाभरात ५१ गावांमध्ये ४३ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे.
३५९ गावांमध्ये टंचाईस्थिती
सलग दुसर्‍या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे यावर्षी पाणी टंचाई असलेल्या गावांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या जळगाव जिल्‘ातील ३५९ गावांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने टँकरने पाणी पुरविणे, विहीर अधिग्रहण करणे, तात्पुरत्या पाणी योजना राबविणे यासारख्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
५१ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा
सध्या जिल्हा प्रशासनातर्फे ५१ गावांमध्ये ४३ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. यात १० शासकीय तर खाजगी ३३ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा होत आहे. जामनेर तालुक्यातील १४ गावांमध्ये तर पारोळा तालुक्यातील १५ गावांमध्ये, अमळनेर तालुक्यातील १३ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
८४१ नवीन विंधन विहीर
जिल्हा प्रशासनाने तब्बल ८४१ नवीन विंधन विहिरीसाठी मंजुरी दिली आहे. तर २२० गावांमध्ये भीषण पाणी टंचाई असल्याने विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात सर्वाधिक जामनेर तालुक्यातील ४५ गावांमध्ये विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. तर धरणगाव तालुक्यात३७ गावांमधील ४१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ अमळनेर तालुक्यातील ३५ गावांमध्ये ३३ विहिरींचे अधिग्रहण झाले आहे.

३८९ गावांत विधन विहीर
पाणी टंचाईच्या झळा जाणवत असल्याने प्रत्येक तालुक्यात जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हाभरात ३८९ गावांमधील ८४१ ठिकाणी नवीन विंधन विहीर देण्यात आल्या आहेत. यात चाळीसगाव तालुक्यातील ९० गावांमध्ये सर्वाधिक २२३ विंधन विहिरी देण्यात आल्या आहेत. तर जामनेर तालुक्यात फक्त दोन गावांमध्ये पाच नवीन विंधन विहिरी देण्यात आल्या आहेत.

जामनेर, पारोळा व अमळनेर तालुक्यात गंभीर स्थिती
जामनेर तालुक्यातील सर्वाधिक ८५ गावांमध्ये तर पारोळा तालुक्यातील ६८ गावांमध्ये पाणी टंचाईची स्थिती आहे. त्या पाठोपाठ अमळनेर तालुक्यातील ५२ गावांमध्ये टंचाईस्थिती असणार आहे. चाळीसगाव व पाचोरा तालुक्यातील गावांची संख्या ५० पेक्षा जास्त असल्याने या ठिकाणी भीषण पाणी टंचाई भासत आहे.