शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
2
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
3
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, चंद्रकांतदादांच्या 'त्या' व्हिडीओवर म्हणाली..
4
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
5
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
6
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
7
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
8
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
9
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
10
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
11
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
12
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
13
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
14
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
15
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
16
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
17
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
18
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
19
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
20
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत

VIDEO: 'ऐ दिल...' वर बहिष्कार टाका, गोव्याच्या पोलीस महासंचालकांचं आवाहन

By admin | Updated: November 2, 2016 17:47 IST

ऐ दिल है मुश्किल मोहम्मद रफी यांचा अपमान केला असल्याने गोव्याचे पोलीस महासंचालक मुकेश चंदेर यांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 2 - वादात अडकल्यानंतर अखेर रिलीज झालेल्या 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाची मुश्किल अजून काही संपता संपत नाही आहे. चित्रपटात पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्याने अगोदरच अनेकांची चित्रपटावर बहिष्कार टाकला असताना चित्रपटात मोहम्मद रफी यांचा अपमान केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे गोव्याचे पोलीस महासंचालक मुकेश चंदेर यांनी स्वत: या घटनेचा निषेध केला असून चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. 
 
 
मुकेश चंदेर यांनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांना चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं असून नाराजी व्यक्त केली आहे. 'मोहम्मद रफी भारतातील एक महान गायक होते, आणि यासाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. जर तुम्ही खरंत रफींचे चाहते असाल तर चित्रपटावर बहिष्कार टाका', असं ट्विट मुकेश चंदेर यांनी केलं आहे.
 
एनडीटीव्हीने मुकेश चंदेर यांच्याशी संपर्क साधला असता 'मी संगीताचा आणि रफी यांचा चाहता आहे. जर एखादी गोष्ट खटकत असेल तर ती पाहू नये. मी पाहणार नाही. रफींच्या करोडो चाहत्यांना दुखावण्यात आलं आहे. संगीताचा चाहता म्हणून हे माझं वैयक्तिक मत आहे,' असं बोलले आहेत.
 
चित्रपटात अनुष्का शर्माचा एक डायलॉग आहे. ज्यामध्ये 'मोहम्मद रफी ? ते गायचे कमी, रडायचे जास्त ना ?' असं बोलताना दिसत आहे. मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहीद रफी यांनी करण जोहरला सार्वजनिक माफी मागण्यास सांगितलं असून सीन डिलीट करायला सांगितलं आहे. गायक सोनू निगमनेही या वादानंतर ट्विट केलं आहे.
 
‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटातील पाकिस्तानी कलाकार फवाद खानच्या भूमिकेमुळे मोठा वाद निर्माण झाला होता.  जम्मू-काश्मीरमधील उरी येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २० जवान शहीद झाल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करून ३८-४० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशात पाकिस्तानविरोधी वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना, मनसे या राजकीय पक्षांनी पाक कलाकार, खेळाडू, गायक यांच्याविरोधात भूमिका घेत त्यांना भारतात काम करू देण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे करण जोहरचा ' ए दिल' चित्रपट अडचणीत सापडला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर मनसेने चित्रपटाला सशर्त परवानगी दिली.