शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

VIDEO : सुकमाचा बदला ! स्पेशल कमांडोंच्या कारवाईत 20 नक्षलवादी ठार

By admin | Updated: May 17, 2017 13:24 IST

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात रविवारीपासून ते मंगळवारपर्यंत नक्षलवाद्यांविरोधात चालवण्यात आलेल्या मोहीमेअंतर्गत जवळपास 20 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा सुरक्षा अधिका-यांकडून करण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमत

रायपूर, दि. 17 - नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर 300 नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. यात कमांडर रघुवीर सिंह यांच्यासह 25 जवान शहीद झाले होते. संपूर्ण देशाला हादरवणा-या सुकमा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेचा सीआरपीएफ जवानांनी बदला घेतला आहे.
 
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात रविवारीपासून ते मंगळवारपर्यंत नक्षलवाद्यांविरोधात चालवण्यात आलेल्या मोहीमेअंतर्गत जवळपास 20 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा सुरक्षा अधिका-यांकडून करण्यात येत आहे. 
 
कोब्रा बटालियननं 13 - 14 मे रोजीच्या रात्री सुकमा आणि बिजापूरमध्ये चालवण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये 15 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
 
सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजापूर जिल्ह्यातील बासागुडा पोलीस स्टेशन अंर्तगत येणा-या रायगुंडममधील जंगलात सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात सुरक्षादलाच्या जवानांनी 15 ते 20 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. तर रविवारी करण्यात आलेल्या कारवाईत सुरक्षादलाचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. 
 
दरम्यान, या कारवाईसंदर्भातील एक व्हिडीओदेखील ""एएनआय"" या वृत्तसंस्थेनं जारी केला आहे. व्हिडीओमध्ये स्पेशल कमांडो ""कोब्रा""चे जवान व नक्षलवाद्यांमधील चमकम दिसत आहे. गोळीबाराचा आवाजही ऐकू येत आहे. 
नक्षलवाद्यांचा खात्मा
पोलीस निरीक्षकांनाही असेही सांगितले की, घटनास्थळावरील रक्ताचे डाग व अन्य मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे येथे नक्षलवाद्यांचा मोठ्या प्रमाणात खात्मा करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या मोहीमेत जखमी जवानांना हेलिकॉप्टरमधून रायपूर येथे आणण्यात आले. जखमी जवानांवर सध्या उपचार सुरू आहेत. 
100-150 नक्षलवादी सक्रिय 
बिजापूरचे पोलीस अधीक्षक के.एल. ध्रुव यांनी सांगितले की, सीआरपीएफ, डीआरजी, जिल्हा पोलीस आणि कोब्रा बटालियनमधील जवानांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. तीन दिवस नक्षलवाद्यांविरोधात अभियान चालवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगुंडम जंगलात 100-150 नक्षलवादी सक्रिय आहेत. 
 
दरम्यान, दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कारवाईत 20 नक्षलवादी मारले गेलेत. या चकमकीनंतर  नक्षलवाद्यांनी खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह घेऊन जंगलात पळ काढल्याचे वृत्त आहे.