शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

VIDEO : सुकमाचा बदला ! स्पेशल कमांडोंच्या कारवाईत 20 नक्षलवादी ठार

By admin | Updated: May 17, 2017 13:24 IST

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात रविवारीपासून ते मंगळवारपर्यंत नक्षलवाद्यांविरोधात चालवण्यात आलेल्या मोहीमेअंतर्गत जवळपास 20 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा सुरक्षा अधिका-यांकडून करण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमत

रायपूर, दि. 17 - नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर 300 नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. यात कमांडर रघुवीर सिंह यांच्यासह 25 जवान शहीद झाले होते. संपूर्ण देशाला हादरवणा-या सुकमा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेचा सीआरपीएफ जवानांनी बदला घेतला आहे.
 
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात रविवारीपासून ते मंगळवारपर्यंत नक्षलवाद्यांविरोधात चालवण्यात आलेल्या मोहीमेअंतर्गत जवळपास 20 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा सुरक्षा अधिका-यांकडून करण्यात येत आहे. 
 
कोब्रा बटालियननं 13 - 14 मे रोजीच्या रात्री सुकमा आणि बिजापूरमध्ये चालवण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये 15 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
 
सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजापूर जिल्ह्यातील बासागुडा पोलीस स्टेशन अंर्तगत येणा-या रायगुंडममधील जंगलात सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात सुरक्षादलाच्या जवानांनी 15 ते 20 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. तर रविवारी करण्यात आलेल्या कारवाईत सुरक्षादलाचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. 
 
दरम्यान, या कारवाईसंदर्भातील एक व्हिडीओदेखील ""एएनआय"" या वृत्तसंस्थेनं जारी केला आहे. व्हिडीओमध्ये स्पेशल कमांडो ""कोब्रा""चे जवान व नक्षलवाद्यांमधील चमकम दिसत आहे. गोळीबाराचा आवाजही ऐकू येत आहे. 
नक्षलवाद्यांचा खात्मा
पोलीस निरीक्षकांनाही असेही सांगितले की, घटनास्थळावरील रक्ताचे डाग व अन्य मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे येथे नक्षलवाद्यांचा मोठ्या प्रमाणात खात्मा करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या मोहीमेत जखमी जवानांना हेलिकॉप्टरमधून रायपूर येथे आणण्यात आले. जखमी जवानांवर सध्या उपचार सुरू आहेत. 
100-150 नक्षलवादी सक्रिय 
बिजापूरचे पोलीस अधीक्षक के.एल. ध्रुव यांनी सांगितले की, सीआरपीएफ, डीआरजी, जिल्हा पोलीस आणि कोब्रा बटालियनमधील जवानांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. तीन दिवस नक्षलवाद्यांविरोधात अभियान चालवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगुंडम जंगलात 100-150 नक्षलवादी सक्रिय आहेत. 
 
दरम्यान, दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कारवाईत 20 नक्षलवादी मारले गेलेत. या चकमकीनंतर  नक्षलवाद्यांनी खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह घेऊन जंगलात पळ काढल्याचे वृत्त आहे.