शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

VIDEO : सुकमाचा बदला ! स्पेशल कमांडोंच्या कारवाईत 20 नक्षलवादी ठार

By admin | Updated: May 17, 2017 13:24 IST

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात रविवारीपासून ते मंगळवारपर्यंत नक्षलवाद्यांविरोधात चालवण्यात आलेल्या मोहीमेअंतर्गत जवळपास 20 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा सुरक्षा अधिका-यांकडून करण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमत

रायपूर, दि. 17 - नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर 300 नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. यात कमांडर रघुवीर सिंह यांच्यासह 25 जवान शहीद झाले होते. संपूर्ण देशाला हादरवणा-या सुकमा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेचा सीआरपीएफ जवानांनी बदला घेतला आहे.
 
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात रविवारीपासून ते मंगळवारपर्यंत नक्षलवाद्यांविरोधात चालवण्यात आलेल्या मोहीमेअंतर्गत जवळपास 20 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा सुरक्षा अधिका-यांकडून करण्यात येत आहे. 
 
कोब्रा बटालियननं 13 - 14 मे रोजीच्या रात्री सुकमा आणि बिजापूरमध्ये चालवण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये 15 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
 
सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजापूर जिल्ह्यातील बासागुडा पोलीस स्टेशन अंर्तगत येणा-या रायगुंडममधील जंगलात सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात सुरक्षादलाच्या जवानांनी 15 ते 20 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. तर रविवारी करण्यात आलेल्या कारवाईत सुरक्षादलाचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. 
 
दरम्यान, या कारवाईसंदर्भातील एक व्हिडीओदेखील ""एएनआय"" या वृत्तसंस्थेनं जारी केला आहे. व्हिडीओमध्ये स्पेशल कमांडो ""कोब्रा""चे जवान व नक्षलवाद्यांमधील चमकम दिसत आहे. गोळीबाराचा आवाजही ऐकू येत आहे. 
नक्षलवाद्यांचा खात्मा
पोलीस निरीक्षकांनाही असेही सांगितले की, घटनास्थळावरील रक्ताचे डाग व अन्य मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे येथे नक्षलवाद्यांचा मोठ्या प्रमाणात खात्मा करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या मोहीमेत जखमी जवानांना हेलिकॉप्टरमधून रायपूर येथे आणण्यात आले. जखमी जवानांवर सध्या उपचार सुरू आहेत. 
100-150 नक्षलवादी सक्रिय 
बिजापूरचे पोलीस अधीक्षक के.एल. ध्रुव यांनी सांगितले की, सीआरपीएफ, डीआरजी, जिल्हा पोलीस आणि कोब्रा बटालियनमधील जवानांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. तीन दिवस नक्षलवाद्यांविरोधात अभियान चालवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगुंडम जंगलात 100-150 नक्षलवादी सक्रिय आहेत. 
 
दरम्यान, दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कारवाईत 20 नक्षलवादी मारले गेलेत. या चकमकीनंतर  नक्षलवाद्यांनी खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह घेऊन जंगलात पळ काढल्याचे वृत्त आहे.