शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

VIDEO : सुकमाचा बदला ! स्पेशल कमांडोंच्या कारवाईत 20 नक्षलवादी ठार

By admin | Updated: May 17, 2017 13:24 IST

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात रविवारीपासून ते मंगळवारपर्यंत नक्षलवाद्यांविरोधात चालवण्यात आलेल्या मोहीमेअंतर्गत जवळपास 20 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा सुरक्षा अधिका-यांकडून करण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमत

रायपूर, दि. 17 - नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर 300 नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. यात कमांडर रघुवीर सिंह यांच्यासह 25 जवान शहीद झाले होते. संपूर्ण देशाला हादरवणा-या सुकमा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेचा सीआरपीएफ जवानांनी बदला घेतला आहे.
 
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात रविवारीपासून ते मंगळवारपर्यंत नक्षलवाद्यांविरोधात चालवण्यात आलेल्या मोहीमेअंतर्गत जवळपास 20 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा सुरक्षा अधिका-यांकडून करण्यात येत आहे. 
 
कोब्रा बटालियननं 13 - 14 मे रोजीच्या रात्री सुकमा आणि बिजापूरमध्ये चालवण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये 15 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
 
सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजापूर जिल्ह्यातील बासागुडा पोलीस स्टेशन अंर्तगत येणा-या रायगुंडममधील जंगलात सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात सुरक्षादलाच्या जवानांनी 15 ते 20 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. तर रविवारी करण्यात आलेल्या कारवाईत सुरक्षादलाचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. 
 
दरम्यान, या कारवाईसंदर्भातील एक व्हिडीओदेखील ""एएनआय"" या वृत्तसंस्थेनं जारी केला आहे. व्हिडीओमध्ये स्पेशल कमांडो ""कोब्रा""चे जवान व नक्षलवाद्यांमधील चमकम दिसत आहे. गोळीबाराचा आवाजही ऐकू येत आहे. 
नक्षलवाद्यांचा खात्मा
पोलीस निरीक्षकांनाही असेही सांगितले की, घटनास्थळावरील रक्ताचे डाग व अन्य मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे येथे नक्षलवाद्यांचा मोठ्या प्रमाणात खात्मा करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या मोहीमेत जखमी जवानांना हेलिकॉप्टरमधून रायपूर येथे आणण्यात आले. जखमी जवानांवर सध्या उपचार सुरू आहेत. 
100-150 नक्षलवादी सक्रिय 
बिजापूरचे पोलीस अधीक्षक के.एल. ध्रुव यांनी सांगितले की, सीआरपीएफ, डीआरजी, जिल्हा पोलीस आणि कोब्रा बटालियनमधील जवानांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. तीन दिवस नक्षलवाद्यांविरोधात अभियान चालवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगुंडम जंगलात 100-150 नक्षलवादी सक्रिय आहेत. 
 
दरम्यान, दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कारवाईत 20 नक्षलवादी मारले गेलेत. या चकमकीनंतर  नक्षलवाद्यांनी खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह घेऊन जंगलात पळ काढल्याचे वृत्त आहे.