शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

देशात काही लोकांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी आहे - व्यंकय्या नायडू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 09:58 IST

'...तरीही त्यांना असा दृष्कीकोण बाळगण्याचा अधिकार आहे'

चेन्नई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यावरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. यातच आता उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या विधानावरून खळबळ उड्ण्याची शक्यता आहे.  भारतात काही लोकांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी आहे, असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. एखाद्या खास धर्माचा अपमान किंवा समाधान करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता होत नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेशात धार्मिक छळाला सामोरे जावे लागले, अशा अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी आहे, असेही एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. 

चेन्नईमध्ये श्री रामकृष्ण मठाद्वारे प्रकाशित तमीळ मासिक श्री रामकृष्ण विजयमच्या शताब्दी समारोह आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एम. व्यंकय्या नायडू बोलत होते. भारतात काही लोकांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी आहे. जरी हे योग्य नसले, तरीही त्यांना असा दृष्कीकोण बाळगण्याचा अधिकार आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे दुसऱ्या धर्मांचा अपमान नाही आहे, तर धर्मनिरपेक्ष संस्कृती भारतीय लोकाचारचा एक भाग आहे, असे एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.

एम. व्यंकय्या नायडू म्हणाले, "देशाने नेहमीच पीडित लोकांना आश्रय दिला आहे. स्वामी विवेकानंद एक सामाजिक सुधारक होते आणि त्यांनी पश्चिमेत हिंदुत्वापासून परिचय केला. स्वामी विवेकानंद यांनी सांगितले होते की, विविध देशातील पीडित लोकांना आणि शरणार्थींना आश्रय दिला आहे, त्या देशातून मी आलो आहे." याचबरोबर, भारत आता पीडित लोकांना आश्रय देण्यासाठी तयार आहे. मात्र, काही तत्वे यासंदर्भात वाद-विवाद करत आहेत, असेही व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. 

(रस्त्यांवर हिंसा केल्याने समस्या सुटणार नाहीत : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू)(विरोध झाला तरी नागरिकत्व कायदा राबवूच; अमित शहांनी ठणकावले)('विरोधकांकडून युवकांची दिशाभूल सुरू; ईशान्येतील संस्कृती नष्ट होणार नाही') 

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक