शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 17:39 IST

Swati Maliwal Case: १३ मे रोजी सकाळी  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवास्थानी झालेल्या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांनी विभन कुमार याने कुणाच्या सांगण्यावरून आपणास मारहाण केली, असा सवाल उपस्थित केला आहे. 

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या मारहाणीचं प्रकरण दररोज नवनवी वळणं घेत आहे. दरम्यान, १३ मे रोजी सकाळी  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवास्थानी झालेल्या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांनी विभन कुमार याने कुणाच्या सांगण्यावरून आपणास मारहाण केली, असा सवाल उपस्थित केला आहे. 

एनएआयला दिलेल्या मुलाखतीत त्या दिवशीचा घटनाक्रम सांगताना स्वाती मालिवाल म्हणाल्या की, मी १३ मे रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. तेथील कर्मचाऱ्यांनी मला ड्रॉइंग रुममध्ये बसवले आणि अरविंद केजरीवाल हे घरी असून, ते मला भेटण्यासाठी येत आहेत, असे सांगितले. तेवढ्यात अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार तिथे तणतणत आले. मी त्यांना विचारलं की काय झालं? अरविंद केजरीवाल येताहेत का, तेवढ्यात त्यांनी हात उगारला.

विभव यांनी माझ्यावर हाताने ७-८ फटके मारले. जेव्हा मी त्यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी माझे पाय पकडला आणि मला जमिनीवरून फरफटत नेले. त्यावेळी माझं डोकं टेबलावर आदळलं. मी खाली पडले तेव्हा त्यांनी मला लाथांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मी जोराजोरात ओरडून मदत मागत होती. मात्र कुणीही माझ्या मदतीसाठी पुढे आला नाही, असा आरोप स्वाती मालिवाल यांनी केला. 

त्या पुढे म्हणाल्या की, मी मोठ्याने ओरडत होते. तरीही मदतीसाठी कुणी ला नाही, ही खूप अजब गोष्ट होती. विभव यांनी एकट्याने मारहाण केली. त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली या सर्व बाबी चौकशीच्या चौकटीत आहेत. मी दिल्ली पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहे. मात्र मी या प्रकरणी कुणालाही क्लीन चिट देत नाही आहे कारण जेव्हा मी ड्ऱॉईंग रुममध्ये होते तेव्हा अरविंद केजरीवाल हे घरीच होते. मला खूप मारहाण करण्यात आली. मी ओरडत होते. मात्र कुणीही मदतीसाठी आलं नाही.  

मी आता माझं काय होईल, माझ्या करिअरचं काय होईल, माझ्यासोबत हे लोक काय करतील, याचा विचार करत नाही आहे. मी इतर महिलांना सत्यासोबत उभं राहण्यास सांगत असते. तुमच्यासोबत काही चुकीचं झाल्यास अवश्य लढा, असं सांगत असते. त्यामुळे मी जर त्यांना असं आवाहन करत असेन तर मग मी आज कशी काय लढू शकत नाही, असा प्रश्न मी स्वत:ला विचारतेय, असं स्वाती मालिवाल यांनी सांगितलं.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्वाती मालिवाल प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल आणि न्याय मिळेल, असी प्रतिक्रिया दिली होती.  

टॅग्स :delhiदिल्लीAam Admi partyआम आदमी पार्टी