शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 17:39 IST

Swati Maliwal Case: १३ मे रोजी सकाळी  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवास्थानी झालेल्या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांनी विभन कुमार याने कुणाच्या सांगण्यावरून आपणास मारहाण केली, असा सवाल उपस्थित केला आहे. 

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या मारहाणीचं प्रकरण दररोज नवनवी वळणं घेत आहे. दरम्यान, १३ मे रोजी सकाळी  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवास्थानी झालेल्या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांनी विभन कुमार याने कुणाच्या सांगण्यावरून आपणास मारहाण केली, असा सवाल उपस्थित केला आहे. 

एनएआयला दिलेल्या मुलाखतीत त्या दिवशीचा घटनाक्रम सांगताना स्वाती मालिवाल म्हणाल्या की, मी १३ मे रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. तेथील कर्मचाऱ्यांनी मला ड्रॉइंग रुममध्ये बसवले आणि अरविंद केजरीवाल हे घरी असून, ते मला भेटण्यासाठी येत आहेत, असे सांगितले. तेवढ्यात अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार तिथे तणतणत आले. मी त्यांना विचारलं की काय झालं? अरविंद केजरीवाल येताहेत का, तेवढ्यात त्यांनी हात उगारला.

विभव यांनी माझ्यावर हाताने ७-८ फटके मारले. जेव्हा मी त्यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी माझे पाय पकडला आणि मला जमिनीवरून फरफटत नेले. त्यावेळी माझं डोकं टेबलावर आदळलं. मी खाली पडले तेव्हा त्यांनी मला लाथांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मी जोराजोरात ओरडून मदत मागत होती. मात्र कुणीही माझ्या मदतीसाठी पुढे आला नाही, असा आरोप स्वाती मालिवाल यांनी केला. 

त्या पुढे म्हणाल्या की, मी मोठ्याने ओरडत होते. तरीही मदतीसाठी कुणी ला नाही, ही खूप अजब गोष्ट होती. विभव यांनी एकट्याने मारहाण केली. त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली या सर्व बाबी चौकशीच्या चौकटीत आहेत. मी दिल्ली पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहे. मात्र मी या प्रकरणी कुणालाही क्लीन चिट देत नाही आहे कारण जेव्हा मी ड्ऱॉईंग रुममध्ये होते तेव्हा अरविंद केजरीवाल हे घरीच होते. मला खूप मारहाण करण्यात आली. मी ओरडत होते. मात्र कुणीही मदतीसाठी आलं नाही.  

मी आता माझं काय होईल, माझ्या करिअरचं काय होईल, माझ्यासोबत हे लोक काय करतील, याचा विचार करत नाही आहे. मी इतर महिलांना सत्यासोबत उभं राहण्यास सांगत असते. तुमच्यासोबत काही चुकीचं झाल्यास अवश्य लढा, असं सांगत असते. त्यामुळे मी जर त्यांना असं आवाहन करत असेन तर मग मी आज कशी काय लढू शकत नाही, असा प्रश्न मी स्वत:ला विचारतेय, असं स्वाती मालिवाल यांनी सांगितलं.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्वाती मालिवाल प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल आणि न्याय मिळेल, असी प्रतिक्रिया दिली होती.  

टॅग्स :delhiदिल्लीAam Admi partyआम आदमी पार्टी