शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
"इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
5
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
6
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
7
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
8
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
9
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
10
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
11
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
12
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
15
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
16
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
17
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
18
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
19
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
20
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी

"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 17:39 IST

Swati Maliwal Case: १३ मे रोजी सकाळी  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवास्थानी झालेल्या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांनी विभन कुमार याने कुणाच्या सांगण्यावरून आपणास मारहाण केली, असा सवाल उपस्थित केला आहे. 

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या मारहाणीचं प्रकरण दररोज नवनवी वळणं घेत आहे. दरम्यान, १३ मे रोजी सकाळी  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवास्थानी झालेल्या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांनी विभन कुमार याने कुणाच्या सांगण्यावरून आपणास मारहाण केली, असा सवाल उपस्थित केला आहे. 

एनएआयला दिलेल्या मुलाखतीत त्या दिवशीचा घटनाक्रम सांगताना स्वाती मालिवाल म्हणाल्या की, मी १३ मे रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. तेथील कर्मचाऱ्यांनी मला ड्रॉइंग रुममध्ये बसवले आणि अरविंद केजरीवाल हे घरी असून, ते मला भेटण्यासाठी येत आहेत, असे सांगितले. तेवढ्यात अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार तिथे तणतणत आले. मी त्यांना विचारलं की काय झालं? अरविंद केजरीवाल येताहेत का, तेवढ्यात त्यांनी हात उगारला.

विभव यांनी माझ्यावर हाताने ७-८ फटके मारले. जेव्हा मी त्यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी माझे पाय पकडला आणि मला जमिनीवरून फरफटत नेले. त्यावेळी माझं डोकं टेबलावर आदळलं. मी खाली पडले तेव्हा त्यांनी मला लाथांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मी जोराजोरात ओरडून मदत मागत होती. मात्र कुणीही माझ्या मदतीसाठी पुढे आला नाही, असा आरोप स्वाती मालिवाल यांनी केला. 

त्या पुढे म्हणाल्या की, मी मोठ्याने ओरडत होते. तरीही मदतीसाठी कुणी ला नाही, ही खूप अजब गोष्ट होती. विभव यांनी एकट्याने मारहाण केली. त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली या सर्व बाबी चौकशीच्या चौकटीत आहेत. मी दिल्ली पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहे. मात्र मी या प्रकरणी कुणालाही क्लीन चिट देत नाही आहे कारण जेव्हा मी ड्ऱॉईंग रुममध्ये होते तेव्हा अरविंद केजरीवाल हे घरीच होते. मला खूप मारहाण करण्यात आली. मी ओरडत होते. मात्र कुणीही मदतीसाठी आलं नाही.  

मी आता माझं काय होईल, माझ्या करिअरचं काय होईल, माझ्यासोबत हे लोक काय करतील, याचा विचार करत नाही आहे. मी इतर महिलांना सत्यासोबत उभं राहण्यास सांगत असते. तुमच्यासोबत काही चुकीचं झाल्यास अवश्य लढा, असं सांगत असते. त्यामुळे मी जर त्यांना असं आवाहन करत असेन तर मग मी आज कशी काय लढू शकत नाही, असा प्रश्न मी स्वत:ला विचारतेय, असं स्वाती मालिवाल यांनी सांगितलं.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्वाती मालिवाल प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल आणि न्याय मिळेल, असी प्रतिक्रिया दिली होती.  

टॅग्स :delhiदिल्लीAam Admi partyआम आदमी पार्टी