शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
3
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
4
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
5
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
6
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
7
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
8
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
9
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
10
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
11
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
12
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
13
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
14
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
15
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
16
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
17
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
18
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
19
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
20
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का

“बांगलादेश सरकारने हिंदुंचे संरक्षण करावे, जिहादींवर कारवाई आवश्यक”; VHP ची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 08:43 IST

बांगलादेशातील अल्पसंख्यक हिंदूंवरील अत्याचार सुरूच असून, याबाबत ठोस भूमिका घेऊन कारवाई करावी, असेही विश्व हिंदू परिषदेने (VHP) म्हटले आहे. 

नवी दिल्ली:नवरात्रीच्या काळात बांगलादेशमधील मंदिरे आणि देवी-देवतांच्या मूर्तींवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत निषेध नोंदवत विश्व हिंदू परिषदेने (VHP) बांगलादेश सरकारने हिंदुंचे संरक्षण करावे आणि या घटनांना जबाबदार असलेल्या जिहादींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. बांगलादेशातील अल्पसंख्यक हिंदूंवरील अत्याचार सुरूच असून, याबाबत ठोस भूमिका घेऊन कारवाई करावी, असेही विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे. 

विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महासचिव मिलिंद परांदे म्हणाले की, रात्रीच्या अंधारात चटगाव येथील कोमिला क्षेत्रात मुद्दामहून षडयंत्र रचले गेले आणि कुराणाचा अपमान झाल्याची अफवा पसरवली गेली. यानंतर हल्लेखोरांनी दुर्गा पूजा मंडळावर हल्ला करत देवी-देवतांच्या मूर्तींची नासधूस केली. तोडफोड केली. यामुळे हिंदू समाज अतिशय दुःखी झाला आहे. हिंदूवरील अत्याचार आणि शोषण कायम असून, यातील घटनांमध्ये वाढ होत आहे, असे परांदे यांनी म्हटले आहे. 

५०० जण जखमी आणि दोन जणांचा मृत्यू

मंदिरांवर झालेल्या हल्ल्यात दोन हिंदुंचा मृत्यू झाला असून, या घटनेत सुमारे ५०० जण जखमी झाल्याचे परांदे यांनी म्हटले आहे. बांगलादेशमध्ये दुर्गा पूजा उत्सवादरम्यान देवी-देवतांच्या प्रतिमेचा अपमान करण्यात आला. अशाच घटना सुरू राहिल्या, तर परिस्थिती बिकट होऊ शकते. याला कारण स्थानिक दहशतवादी संघटना आहे. त्यांच्या चिथावणीखोर अफवांमुळे हिंदूंवर आणि मंदिरे, देवी-देवतांच्या मूर्त्यांवर वारंवार हल्ले केले जात आहेत. 

संयुक्त राष्ट्रसंघात आवाज उठवणे आवश्यक

मिलिंद परांदे यांनी भारत सरकारने बांगलादेशातील या घटनांबाबत संयुक्त राष्ट्रसंघात आवाज उठवणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच हिंदूंवर होणारे हल्ले, अत्याचार यावरून भारताने बांगलादेशवर दबाव टाकायला हवा. तसेच हिंदूवर हल्ले, अत्याचार तसेच हिंदूंच्या मालमत्तांचे नुकसान करण्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी भारताने बांगलादेशची चर्चा करायला हवी, असे सांगत विश्व हिंदू परिषद बांगलादेशातील सर्व हिंदू समाजाच्या पाठिशी कायम राहील, असे परांदे यांनी यावेळी बोलताना नमूद केले.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशNavratriनवरात्री