शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

1962 आणि 2017 मध्ये खूप फरक ! भारताचे चीनला प्रत्युत्तर

By admin | Updated: June 30, 2017 16:31 IST

सिक्कीमच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने दिलेल्या धमकीला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - सिक्कीमच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने दिलेल्या धमकीला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय जवानांनी आपल्या सीमेत घुसखोरी केल्याचा चीनचा दावा भारताने फेटाळून लावला आहे. तसेच चीनला दिलेल्या विस्तारित प्रत्युत्तरात परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, चुंबी घाटी परिसरातील तिबेटचा भूभाग असलेल्या डोकलममध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी करून रस्ता बांधण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरच संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनीही युद्धाची धमकी देणाऱ्या चीनला कडक शब्दात उत्तर देताना 1962 आणि 2017 मध्ये खूप फरक असल्याचे सांगितले.  दरम्यान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर  भारताने नथूला खिंडीतून होणारी मानसरोवर यात्रा रद्द केली आहे. चीनने तणाव वाढल्यावर भारतीय यात्रेकरूंना सीमेवर रोखले होते.  
भारताने सिक्कीमच्या सीमेवरील तणाव आणि चीनकडून येत असलेल्या आक्रमक वक्तव्यांना प्रत्युत्तर म्हणून आक्रमक पवित्रा घेत आपल्या शेजाऱ्याला त्याच्याच शब्दात उत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने 11 मुद्यांवर आधारित प्रत्युत्तर देत भारतीय जवानंवर घुसखोरीचे आरोप करणाऱ्या चीनच्या कांगाव्याचे पितळ उघडे पाडले आहे. चीनचा खोटारडेपणा उघड करताना भारताने सांगितले की, 16 जून रोजी पीएलएचे पथक डोकलम परिसरात रस्ता बनवण्यासाठी घुसले होते. मात्र रॉयल भूतान आर्मीने चिनी लष्कराला असे करण्यापासून रोखले. तसेच भूतान सरकारच्या राजदूतानेही आपण दिल्लीतील भारतीय दूतावासाच्या माध्यमातून चिनी सरकारकडे आपला विरोध व्यक्त केल्याचे स्पष्टपणे सांगितले.  
संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनीही एका वृत्तवाहिनीवर आयोजित कार्यक्रमात चीनला कठोर शब्दाच उत्तर दिले आहे.  चीन विस्तारवादी भूमिकेतून दुसऱ्या देशांच्या भूभागांवर कब्जा करत आहे. भारत आणि भूतानमध्ये संरक्षणविषयक करार झालेला आहे. त्यामुळे भारताला चीनच्या विस्तारवादाची चिंता लागणे साहजिकच आहे.  तसेच 1962 आणि 2017 यामध्ये खूप फरक आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.