शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

1962 आणि 2017 मध्ये खूप फरक ! भारताचे चीनला प्रत्युत्तर

By admin | Updated: June 30, 2017 16:31 IST

सिक्कीमच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने दिलेल्या धमकीला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - सिक्कीमच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने दिलेल्या धमकीला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय जवानांनी आपल्या सीमेत घुसखोरी केल्याचा चीनचा दावा भारताने फेटाळून लावला आहे. तसेच चीनला दिलेल्या विस्तारित प्रत्युत्तरात परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, चुंबी घाटी परिसरातील तिबेटचा भूभाग असलेल्या डोकलममध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी करून रस्ता बांधण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरच संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनीही युद्धाची धमकी देणाऱ्या चीनला कडक शब्दात उत्तर देताना 1962 आणि 2017 मध्ये खूप फरक असल्याचे सांगितले.  दरम्यान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर  भारताने नथूला खिंडीतून होणारी मानसरोवर यात्रा रद्द केली आहे. चीनने तणाव वाढल्यावर भारतीय यात्रेकरूंना सीमेवर रोखले होते.  
भारताने सिक्कीमच्या सीमेवरील तणाव आणि चीनकडून येत असलेल्या आक्रमक वक्तव्यांना प्रत्युत्तर म्हणून आक्रमक पवित्रा घेत आपल्या शेजाऱ्याला त्याच्याच शब्दात उत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने 11 मुद्यांवर आधारित प्रत्युत्तर देत भारतीय जवानंवर घुसखोरीचे आरोप करणाऱ्या चीनच्या कांगाव्याचे पितळ उघडे पाडले आहे. चीनचा खोटारडेपणा उघड करताना भारताने सांगितले की, 16 जून रोजी पीएलएचे पथक डोकलम परिसरात रस्ता बनवण्यासाठी घुसले होते. मात्र रॉयल भूतान आर्मीने चिनी लष्कराला असे करण्यापासून रोखले. तसेच भूतान सरकारच्या राजदूतानेही आपण दिल्लीतील भारतीय दूतावासाच्या माध्यमातून चिनी सरकारकडे आपला विरोध व्यक्त केल्याचे स्पष्टपणे सांगितले.  
संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनीही एका वृत्तवाहिनीवर आयोजित कार्यक्रमात चीनला कठोर शब्दाच उत्तर दिले आहे.  चीन विस्तारवादी भूमिकेतून दुसऱ्या देशांच्या भूभागांवर कब्जा करत आहे. भारत आणि भूतानमध्ये संरक्षणविषयक करार झालेला आहे. त्यामुळे भारताला चीनच्या विस्तारवादाची चिंता लागणे साहजिकच आहे.  तसेच 1962 आणि 2017 यामध्ये खूप फरक आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.