शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

भाजीपाला कडाडला मिरची १०० रुपये किलो : टोमॅटो, भेंडीचा तुटवडा, वांगी मुबलक

By admin | Updated: June 11, 2016 18:29 IST

जळगाव : दुष्काळाची दाहकता जसजसी वाढली तसा भाजीपाल्याच्या उत्पादनालाही फटका बसला. आता तर मिरची, टोमॅटो, भेंडी, कारले यांचा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे मागणी व पुरवठा याचे गणित बिघडले असून, किरकोळ बाजारामध्ये भाजीपाला कडाडला आहे.

जळगाव : दुष्काळाची दाहकता जसजसी वाढली तसा भाजीपाल्याच्या उत्पादनालाही फटका बसला. आता तर मिरची, टोमॅटो, भेंडी, कारले यांचा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे मागणी व पुरवठा याचे गणित बिघडले असून, किरकोळ बाजारामध्ये भाजीपाला कडाडला आहे.
जळगाव बाजार समितीमध्ये नजीकच्या औरंगाबादमधून कारले व मिरची येत आहे. घाऊक बाजारात मिरचीला सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला. भेंडीला ३८०० रुपयांपर्यंत बाजार समितीमध्ये क्विंटलमागे भाव होता. शनिवारी भेंडी व मिरचीची फक्त प्रत्येकी १६ व १३ क्विंटल आवक झाली. मागील आठवड्यामध्ये ही आवक बर्‍यापैकी होती. पण त्यात आठवडाभरात मोठी घट झाली. भेंडीची आवक एरंडोल, धरणगावमधून झाली.

तुटवडा असल्याने हिरव्या मिरचीचा भाव १०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. दोडके, भोपळा, वांगी, गोल भेंडी वगळता सर्वच भाजीपाल्याचा भाव ५० रुपये किलोपेक्षा अधिक आहे. परिणामी गृहीणींचे बजेट कोलमडले आहे. ३०० रुपयातही पुरेसा भाजीपाला मिळेनासा झाला आहे. १०० रुपयात पाव किंवा अर्धा किलो अशा फक्त तीनच भाज्या मिळतात.
सिंचनासाठी पाणी नसल्याने भाजीपाला जगविणे कठीण झाले आहे. भाजीपाल्यासही अधिक पाण्याची गरज असते. परंतु दुष्काळी स्थितीमुळे भाजीपाला पिकविणार्‍या धरणगाव, पाचोरा, एरंडोल, भडगाव, जळगाव, जामनेर, भुसावळ, यावल या तालुक्यांमध्ये स्थिती खराब झाली आहे. अनेकांना पुरेशा पाण्याअभावी भाजीपाल्याचे पीक उपटून फेकून द्यावे लागले.
शहरातील बळीराम पेठ, बीजे मार्केट भागातील भाजीबाजारामध्ये भाज्यांचे भाव तेजीत आहेत. पिंप्राळ्याच्या बाजारामध्ये शेतकरी स्वत: आपला भाजीपाला विक्रीसाठी येतात. त्यामुळे या बाजारामध्ये भाजीपाला काही प्रमाणात स्वस्त असतो. परंतु हा बाजार फक्त बुधवारी भरतो. त्यामुळे गोलाणी मार्केट, बळीराम पेठेतील व उपनगरांमधील लहान, मोठ्या बाजारातून भाजीपाला घेण्याशिवाय ग्राहकांसमोर पर्याय नाही. घाऊक बाजार आणि किरकोळ बाजारातील भाजीपाल्याच्या भावामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे ग्राहकांना चढ्या भावात भाजीपाला घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.

विविध भाजीपाल्याचे भाव
(भाव प्रतिकिलोचे)
मिरची- ९० ते १००
कारले- ६० ते ७०
गिलके- ६०
वांगी- ४० ते ४५
ढोबळी मिरची- ८० ते ९०
कोथिंबीर- १५ रुपये जुडी
गोल भेंडी- ४० ते ४५
लांब भेंडी- ६०
गवार- ६० ते ७०
मेथी- ६०
वाटाणे- ६० ते ७०
दोडके- ४०
भोपळा- ४०
टोमॅटो- ६०