शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

वाराणसीत घाटांचे बदलले नशीब

By admin | Updated: May 25, 2015 03:01 IST

वाराणशीला गेलेला व्यक्ती घाटावर जाणार नाही, असे शक्य नाही. या घाटांशी माझी जुनी ओळख आहे. परंतु या वेळी मात्र मी येथील बदललेल्या स्थितीची माहिती

विकास मिश्र, वाराणसीवाराणशीला गेलेला व्यक्ती घाटावर जाणार नाही, असे शक्य नाही. या घाटांशी माझी जुनी ओळख आहे. परंतु या वेळी मात्र मी येथील बदललेल्या स्थितीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आलो आहे. हा पंतप्रधानांचा मतदारसंघ असून त्यांनी येथील घाटांच्या सफाईचा संकल्प केला आहे. बनारस लाईव्हचा पहिला प्रवास या घाटांच्या किनाऱ्यावरून सुरु होतो...! मी यावेळी दशाश्वमेध घाटावर आहे. हा घाट वाराणशीच्या सर्वात प्रमुख घाटांपैकी एक असून येथे सर्वात जास्त गर्दी राहते. पर्व, सणासुदीच्या दिवसात येथे २ लाखावरून अधिक लोक स्नान करतात. त्यामुळे या घाटाच्या सफाईचे काम सर्वात कठीण आहे. दोन वर्षापूर्वी जेंव्हा मी येथे आलो होतो तेंव्हा या घाटावर स्नान करण्याची माझी हिंमत झाली नव्हती. तेंव्हा घाटाच्या खाली कचरा पडून होता. स्नान करण्यासाठी मला नावेतून गंगेच्या दुसऱ्या तीरावर जावे लागले होते. परंतु या वर्षी मी या घाटावर आंघोळ केली. हे आहे बनारसच्या या घाटाचे बदललेले चित्र ! याला आपण चमत्कार नाही म्हटले तरी चालेल परंतु आशेचा किरण नक्कीच दिसत आहे. दशाश्वमेध घाटावर जाणारे रस्तेही अतिशय स्वच्छ दिसू लागले आहेत. गोदौलिया चौकार ठंडाईची दुकान लावणाऱ्या राजु केसरी म्हणाला की, मोदी यांनी घाटाच्या किनाऱ्यांच्या सफाईचे काम पूर्ण केले आहे. वाराणशीत प्रमुख ८० घाट आहेत. पहिला घाट म्हणजे आदिनाथ घाट आहे. चला आता या ८० घाटांपैकी जेथून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छतेला सुरुवात केली. नावेतून प्रवास करण्यासाठी एक तास लागतो. दरभंगा घाट, राना महाल घाट, राजा घाट आणि खुप सारे घाट आहेत. सर्व घाटांच्या किनाऱ्यावर नागरिक आंघोळ करताना दिसत आहेत. मागील वेळी जेंव्हा मी येथे आलो तेंव्हा या घाटांवर इतकी घाण होती की कोणीही आंघोळ करण्याची हिंमत करीत नव्हता. आता पाण्यात घाण दिसत नाही. माझी नाव चालविणारा रमेश शंकर म्हणाला, आता पाणी स्वच्छ असल्यामुळे कोणीही त्यात घाण टाकत नाही. येथे येणाऱ्यांच्या वागणुकीत बदल होत आहे. प्रत्येकजण वाराणशीच्या घाटांना आणि गंगेला स्वच्छ पाहू इच्छीत आहे. येथील स्वच्छता पाहून मनाला आनंद झाला असून गंगेचे पाणीही स्वच्छ व्हावे अशी मनोमन इच्छा झाली. तेंव्हा माझी दृष्टी राजा घाटाच्या जवळील ड्रेनेजच्या एका मोठ्या पाईपवर पडली. त्यात थोडेच पण ड्रेनेजचे पाणी येत होते. तेथेच एक व्यक्ती शौचास बसला होता. माझ्या नाव चालविणाऱ्याने सांगितले की, ‘इनका समझावे मोदी अईहें का ?’काशीचा अस्सीआता आम्ही अस्सी घाटावर पोहोचलो. हा लेखक, कवि, कलावंत आणि बनारस हिंदू विद्यापीठाच्या विद्वानांचा आवडता घाट आहे. कला आणि संस्कृतीचा येथे मेळ होतो. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी सफाईची सुरुवात येथून केली. दशाश्वमेध घाटाच्या तुलनेत येथे गर्दी कमी आहे. दुधी रंगाच्या पांढऱ्या प्रकाशाने हा घाट न्हाऊन निघाला आहे. अस्सी घाटावर सरासरी ३०० नागरिक प्रति तासाला येतात. सणासुदीच्या काळात ही संख्या २५०० प्रतितास एवढी होते. येथे एकाच वेळी २२ हजार ५०० लोक जमा होऊ शकतात. मी येथे विदेशी पर्यटकांची गर्दी पाहत आहे. तेंव्हा माझे लक्ष जवळच खोदकाम करीत असलेल्या मशीनवर गेली. मशीन दुसऱ्या घाटावर आहे. परंतु तो सुद्धा अस्सी घाटाचाच भाग आहे. येथे दिवसरात्र काम सुरु आहे. येथे २६ मे रोजी मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रम होणार आहे. मी आता त्या पप्पू चहावाल्याच्या दुकानावर जाऊ इच्छित आहे, जो नरेंद्र मोदींच्या निवडणुकीत त्यांच्या नामांकनातील एक प्रस्तावक होता. पप्पुच्या दुकानाला १०० वर्षाच्या वर दिवस झाले. याच घाटाच्या नावावर प्रसिद्ध लेखक काशीनाथ सिंह यांनी ‘काशी का अस्सी’ ही कादंबरी लिहिली. सध्या वेळेचे बंधन आणि बातमी द्यायची असल्यामुळे तेथे थांबणे शक्य नाही. चला परत जाऊ, पप्पुचा चहा याच प्रवासात कधीतरी घेऊ. परत येताना हिंदी साहित्यिक केदारनाथ सिंह यांच्या काही ओळी आठवत आहेत. वाराणशीच्या बाबतीत त्यांनी अगदी छान रचना केली आहे....इस शहर में धूलधीरे-धीरे उड़ती है.धीरे-धीरे चलते हैं लोगधीरे-धीरे बजते हैं घंटेशाम धीरे-धीरे होती हैया मंद शहरात राहणाऱ्या कमीत कमी घाटांचा विकास तरी मंदगतीने झाला नाही. घाटांचे चित्र पार बदलले आहे.