शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

वाजपेयी सरकारने सोडलेला 'तो' दहशतवादी ठरला अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 08:56 IST

काश्मीरमध्ये दबदबा कायम ठेवण्यासाठी दहशतवादी संघटना आक्रमक होत नवीन संघटनेच्या माध्यमातून राज्यात दहशत पसरविण्याचं काम करत आहेत

नवी दिल्ली - पाकिस्तानमधील क्रूर दहशतवादी मुश्ताक अहमद जरगर याने पुन्हा जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. मुळचा काश्मीरमधील रहिवासी असलेला मुश्ताक अहमद जरगर हा जैश-ए-मोहम्मद आणि अल-उमर-मुजाहिदीन यांच्यात समन्वय साधण्याचं काम करतो. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरविण्याच काम जरगर करत असतो. 

काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षायंत्रणांनी केलेल्या गोळीबारात जैश-ए-मोहम्मदचे अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये दबदबा कायम ठेवण्यासाठी दहशतवादी संघटना आक्रमक होत नवीन संघटनेच्या माध्यमातून राज्यात दहशत पसरविण्याचं काम करत आहेत. भारतीय विमानाला हायजॅक केल्यामुळे तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने मुश्ताक अहमद जरगरला मुक्त केलं होतं. बुधवारी अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मुश्ताकचा सहभाग असल्याचं आता समोर येत आहे. अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 5 जवान शहीद झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दहशतवादी हल्ल्यामध्ये मुश्ताक अहमदची महत्वाची भूमिका होती. 

अनंतनाग येथे CRPF च्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, पाच जवान शहीद

अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात 24 डिसेंबर 1999 दहशतवाद्यांनी भारतीय विमानाचं अपहरण केलं होतं. त्यात 176 प्रवासी आणि 15 हवाई कर्मचारी होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी सरकारकडे कैदेत असलेल्या 35 दहशतवाद्यांची सुटका तसेच 200 मिलियन अमेरिकी डॉलर्सची मागणी केली होती. सरकारने दहशतवाद्यांची मागणी मान्य केली त्यानंतर 3 दहशतवाद्यांना सोडण्याच्या अट सरकारकडून दहशतवाद्यांना घालण्यात आली. वाजपेयी सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्री जसवंत सिन्हा स्वत: मसूद अजहर, अहमद जरगर, शेख अहमद उमर सईद यांना घेऊन प्रवाशांची सुटका करण्यासाठी गेले होते. 

अनंतनाग येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात 5 जवान शहीद झाले तर अन्य 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. अनंतनाग दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड अहमद जरगर याला मानलं जातंय. या हल्ल्यामागे अल-उमर-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय भारतीय सुरक्षा यंत्रणांना आहे.

सूत्रांची माहिती अशी आहे की, अल-उमर-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत एकट्याने असा हल्ला करण्याची क्षमता नाही. त्यामुळे जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी हातमिळवणी करुन अल-उमर-मुजाहिदीनने हा दहशतवादी हल्ला घडवून आणला असावा. जम्मू-काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरविण्यासाठी या दोन्ही दहशतवादी संघटना एकत्र आल्या आहेत. काश्मीर खोऱ्यात पुन्हा दहशतवाद अहमद जरगर हातपाय पसरण्याचं काम करत आहे.   

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी