शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वाजपेयी सरकारने सोडलेला 'तो' दहशतवादी ठरला अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 08:56 IST

काश्मीरमध्ये दबदबा कायम ठेवण्यासाठी दहशतवादी संघटना आक्रमक होत नवीन संघटनेच्या माध्यमातून राज्यात दहशत पसरविण्याचं काम करत आहेत

नवी दिल्ली - पाकिस्तानमधील क्रूर दहशतवादी मुश्ताक अहमद जरगर याने पुन्हा जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. मुळचा काश्मीरमधील रहिवासी असलेला मुश्ताक अहमद जरगर हा जैश-ए-मोहम्मद आणि अल-उमर-मुजाहिदीन यांच्यात समन्वय साधण्याचं काम करतो. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरविण्याच काम जरगर करत असतो. 

काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षायंत्रणांनी केलेल्या गोळीबारात जैश-ए-मोहम्मदचे अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये दबदबा कायम ठेवण्यासाठी दहशतवादी संघटना आक्रमक होत नवीन संघटनेच्या माध्यमातून राज्यात दहशत पसरविण्याचं काम करत आहेत. भारतीय विमानाला हायजॅक केल्यामुळे तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने मुश्ताक अहमद जरगरला मुक्त केलं होतं. बुधवारी अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मुश्ताकचा सहभाग असल्याचं आता समोर येत आहे. अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 5 जवान शहीद झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दहशतवादी हल्ल्यामध्ये मुश्ताक अहमदची महत्वाची भूमिका होती. 

अनंतनाग येथे CRPF च्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, पाच जवान शहीद

अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात 24 डिसेंबर 1999 दहशतवाद्यांनी भारतीय विमानाचं अपहरण केलं होतं. त्यात 176 प्रवासी आणि 15 हवाई कर्मचारी होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी सरकारकडे कैदेत असलेल्या 35 दहशतवाद्यांची सुटका तसेच 200 मिलियन अमेरिकी डॉलर्सची मागणी केली होती. सरकारने दहशतवाद्यांची मागणी मान्य केली त्यानंतर 3 दहशतवाद्यांना सोडण्याच्या अट सरकारकडून दहशतवाद्यांना घालण्यात आली. वाजपेयी सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्री जसवंत सिन्हा स्वत: मसूद अजहर, अहमद जरगर, शेख अहमद उमर सईद यांना घेऊन प्रवाशांची सुटका करण्यासाठी गेले होते. 

अनंतनाग येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात 5 जवान शहीद झाले तर अन्य 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. अनंतनाग दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड अहमद जरगर याला मानलं जातंय. या हल्ल्यामागे अल-उमर-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय भारतीय सुरक्षा यंत्रणांना आहे.

सूत्रांची माहिती अशी आहे की, अल-उमर-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत एकट्याने असा हल्ला करण्याची क्षमता नाही. त्यामुळे जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी हातमिळवणी करुन अल-उमर-मुजाहिदीनने हा दहशतवादी हल्ला घडवून आणला असावा. जम्मू-काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरविण्यासाठी या दोन्ही दहशतवादी संघटना एकत्र आल्या आहेत. काश्मीर खोऱ्यात पुन्हा दहशतवाद अहमद जरगर हातपाय पसरण्याचं काम करत आहे.   

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी