शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
2
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
3
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
4
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
5
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
6
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
7
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
8
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
9
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
10
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
11
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
12
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
13
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
14
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
15
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
16
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
17
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
18
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
19
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!

वाजपेयी, मालवीय भारतरत्नचे मानकरी

By admin | Updated: December 25, 2014 03:06 IST

भाजपाचे मुत्सद्दी नेते आणि विविध राजकीय विचारधारांचे आघाडी सरकार चालविण्यात सर्वाधिक यशस्वी ठरलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी

नवी दिल्ली : भाजपाचे मुत्सद्दी नेते आणि विविध राजकीय विचारधारांचे आघाडी सरकार चालविण्यात सर्वाधिक यशस्वी ठरलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तसेच स्वातंत्र्यसैनिक, हिंदू महासभेचे नेते व बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पं. मदन मोहन मालवीय (मरणोत्तर) यांना भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला़ ओजस्वी वाणी लाभलेला कविमनाचा राजकारणी आणि सरस्वतीचे वरदान लाभलेला द्रष्टा शिक्षणतज्ज्ञ व तेजस्वी स्वातंत्र्यसेनानी अशा दोन महानुभावांना एकाच वेळी हा सन्मान देण्याच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. गुरुवारी वाजपेयी यांचा वाढदिवस असून ते वयाची नव्वद वर्षे पूर्ण करीत आहे़ पं. मालवीय यांचीही उद्या १५३ वी जयंती आहे़ याचे औचित्य साधून त्याच्या पूर्वसंध्येला या सन्मानाची घोषणा करण्यात आली़ राष्ट्रपती भवनाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली़ येत्या प्रजासत्ताक दिनी हा सन्मान प्रदान करण्यात येईल़आतापर्यंत ४३ महनीय व्यक्तींना भारतरत्नने गौरविण्यात आले आहे़ गतवर्षी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि शास्त्रज्ञ सी़एऩआऱ राव यांना या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले होते़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: राष्ट्रपतींकडे या द्वयींना भारतरत्नने गौरविण्यात यावे, अशी विनंती केली होती़ या पुरस्कारासाठी कुठल्याही औपचारिक शिफारशीची गरज नाही़ गेल्या अनेक वर्षांपासून वाजपेयींना भारतरत्न देण्याची मागणी होत आहे़