शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

लसीकरणामुळे देशाची कोरोना साथीविरुद्ध लढण्याची ताकद वाढली- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 06:05 IST

अनेकांचे प्राण, रोजीरोटीचे झाले रक्षण

नवी दिल्ली : लसीकरण मोहिमेमुळे देशाची कोरोना साथीविरुद्ध लढण्याची ताकद वाढली. त्यामुळे अनेकांचे प्राण व रोजीरोटी यांचे रक्षण झाले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या लसीकरण मोहिमेला रविवारी एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोदी यांनी हे वक्तव्य केले. भारतामध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेने कहर केल्यानंतर गेल्या वर्षी १६ जानेवारीला जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना साथीची सुरुवात झाली, तेव्हा या आजाराविषयी कोणालाच फारसे माहीत नव्हते. मात्र देशातील शास्त्रज्ञांनी त्यानंतर काही महिन्यांतच कोरोना प्रतिबंधक लस तयार केली. या लसींमुळे कोरोना साथीविरोधात मुकाबला करण्याची देशाची ताकद वाढली आहे.त्यांनी सांगितले की, कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी वंदन करतो. सर्व डाॅक्टर, नर्स, आरोग्यसेवक यांनी लसीकरणात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. आरोग्यसेवक दुर्गम भागात जाऊन तेथील लोकांना लस देत आहेत. अशा गोष्टींनीच ही मोहीम यशस्वी झाली. कोरोना साथीच्या काळात देशातील आरोग्ययंत्रणा आणखी सुसज्ज करण्यात आली.७० टक्के लोकांना दिले दोन्ही डोसपात्र गटांतील ७० टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले तर ९१ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस दिला आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले. लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त स्वदेशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन लसीवर काढलेल्या विशेष टपाल तिकिटाचे मांडवीय यांच्या हस्ते अनावरण झाले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसNarendra Modiनरेंद्र मोदी