शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बोगद्यात अडकलेल्या मुलाची १७ दिवस वाट पाहिली; सुटकेच्या दिवशीच बापानं जीव सोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 12:53 IST

जेव्हा मुलगा बोगद्यात अडकल्याचं कळाले तेव्हापासून वडील चिंतेत होते.

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात बोगद्यात अडकलेले ४१ कामगार आता सुखरुप बाहेर आले आहेत. या कामगारांच्या भेटीसाठी गेल्या १७ दिवसांपासून त्यांचे कुटुंब प्रतिक्षा करत होते. १७ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर मंगळवारी या कामगारांची सुटका करण्यात आली त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. परंतु या ४१ कामगारांपैकी १ असा कामगार होता जो बाहेर आल्यानंतर त्याच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले. या कामगाराचे नाव भत्त्कू मुर्मू असं आहे. तो झारखंडच्या सिंहभूम जिल्ह्यातील राहणारा होता. 

भत्त्कू जेव्हा मंगळवारी २८ नोव्हेंबरच्या रात्री सिलक्यारा बोगद्यातून सुखरुप बाहेर पडला.तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी त्याच्या कानावर पडली. वडिलांच्या मृत्यूनं भत्त्कू धाय मोकलून रडला. मागील १७ दिवसापासून तो बोगद्यात अडकलेला असताना जेव्हा मी बाहेर पडेन तेव्हा घरच्यांना भेटेन, वडिलांना बघेन असं त्याला वाटत होते. परंतु नियतीनं वेगळाच डाव त्याच्यासमोर मांडला होता. बोगद्यात भत्त्कूशिवाय सिंहभूम जिल्ह्यातील डुमरिया येथील ६ अन्य कामगार होते. 

रिपोर्टनुसार, २९ वर्षीय भत्त्कू सिंहभूम येथील बांकीशील तालुक्यातील बाहदा गावचा रहिवाशी होता. त्याचे ७० वर्षीय वडील बारसा मुर्मू गावातच होते. जेव्हा मुलगा बोगद्यात अडकल्याचं कळाले तेव्हापासून ते चिंतेत होते. मंगळवारी सकाळी नाश्ता करून ते खाटेवर मुलाच्या सुखरुप येण्याकडे वाट पाहत होते.तेव्हा अचानक ते खाटेवरून खाली पडले आणि त्यांचा जीव गेला. बारसा मुर्मू यांनी मुलाच्या आठवणीत जीव तोडला असं गावकरी म्हणतात. जेव्हा मुलगा बोगद्यात अडकला तेव्हापासून वडील निराश होते, त्यांना प्रचंड चिंता लागली होती असं बारसा मुर्मू यांच्या जावयाने म्हटलं. 

बोगद्याच्या कामासाठी भत्त्कू इतर सहकाऱ्यांसोबत उत्तराखंडला गेला होता. त्याच्यासोबत सहकारी सोंगा बांडरा हादेखील होता. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा बांडरा बाहेर होता. अपघातानंतर सोंगाने लगेच भत्त्कूच्या घरी फोन करून तो बोगद्यात अडकल्याची माहिती दिली. त्यानंतर घरातील सगळेच चिंताग्रस्त झाले. भत्त्कूच्या वडिलांनी या घटनेचा धसकाच घेतला. ते मुलगा कधी बाहेर येईल यासाठी चिंता करत बसले असंही जावयानं सांगितले. तर अपघात १२ नोव्हेंबरला झाला परंतु इतके दिवस एकानेही बारसा मुर्मू यांचा दरवाजा ठोठावला नाही. कुणीही अधिकारी भेटायला आले नाही. प्रत्येक दिवशी कुटुंबाला निराशाजनक बातम्या मिळत होत्या. ज्यामुळे बारसा मुर्मू यांची चिंताही वाढत चालली होती. त्याच चिंतेत अखेर मुलाच्या प्रतिक्षेत बापानं जीव सोडला त्यामुळे गावकरीही हळहळले. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड