शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Uttarakhand Glacier Burst: हिमनदीचा पूर म्हणजे काय? हिमकडे कधी व का कोसळतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 05:48 IST

उत्तराखंडात रविवारी हिमकडा कोसळून तीन हिमनद्यांना महापूर आला. या प्रयलयात ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला.

उत्तराखंडात रविवारी हिमकडा कोसळून तीन हिमनद्यांना महापूर आला. या प्रयलयात ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला. अनेक घरांचे नुकसान झाले. जीवितहानीही झाली. परंतु ज्यामुळे ही आपत्ती ओढवली त्याचं कारण काय आणि ते कसं घडलं याची माहिती जाणून घेऊ या...हिमकडे कधी व का कोसळतात?हिमकडे कोसळण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यात मुख्यत्वे हिमकड्याची झीज होणे, पाण्याचा दाब वाढणे, हिमस्खलन किंवा भूस्खलन होणे आणि बर्फाखाली भूकंप होणे इत्यादी कारणांचा समावेश असतो. अचानक पूर येण्यामागे कारण काय?हिमनद्यांना बांध घालून पाणीसाठा केला जातो. मात्र, अचानक हिमकडा कोसळल्याने पूर येऊन पाण्याची पातळी वाढते. अशा परिस्थितीत धरणाचे दरवाजे उघडून अतिरिक्त पाण्याला वाट करून द्यावी लागते. हिमकडा कधीही कोसळू शकतात. त्यामुळे हिमनद्यांना कधी पूर येईल, याचा काही नेम नसतो. सतत सतर्क रहावे लागते.हिमनदीला पूर कशामुळे आला?हिमनदीला लागून असलेला हिमकडा कोसळल्याने धौलीगंगा नदीला महापूर आला. या महापुरात नदी परिसरात असलेल्या जलविद्युत प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले. मोठी जीवितहानी झाल्याची भीतीही व्यक्त होत आहे. हिमकड्याच्या परिसरात एखादा नजीकचा हिमकडा कोसळल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचे असंतुलन निर्माण झाले तर दुसऱ्या हिमकड्यावर त्याचा परिणाम होतो. हिमकडा नदीत कोसळल्यानंतर पाण्याचा वेग एवढा प्रचंड असतो की पाण्याचा हा लोंढा मार्गात येणारी प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त करत जातो.तज्ज्ञांचे म्हणणे...   अतिपाऊस वा बर्फ वितळणे, भूकंप, बर्फाची झीज, धरणाची झीज आणि हिमनदीच्या रचनेत अचानक बदल होणे इत्यादी कारणांमुळे हिमकडे कोसळण्याचे प्रकार घडू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.हिमकडा कोसळल्याने पाण्याचा अतिसंचय झाल्यास अतिरिक्त पाणी सोडण्यात येते. ते तासागणिकही असू शकते वा दिवसागणिकही असू शकते. 

टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडा