शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
4
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
5
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
6
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
7
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
8
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
9
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
10
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
11
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
12
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
13
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
14
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
15
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
16
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
17
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
18
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
19
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट

या राज्यात बाहेरील लोकांना खरेदी करता येणार नाही जमीन, सरकारने घेतला मोठा निर्णय, या कारणानं उचललं कठोर पाऊल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:22 IST

Uttarakhand News: एकीकडे महाराष्ट्रात परप्रांतियांच्या येणाऱ्या लोंढ्यांवर निर्बंध आणण्याची मागणी होत असतानाच तिकडे उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक कठोर निर्णय घेतला आहे. सरकारने सक्त जमीन कायद्याला मान्यता दिली आहे.

एकीकडे महाराष्ट्रात परप्रांतियांच्या येणाऱ्या लोंढ्यांवर निर्बंध आणण्याची मागणी होत असतानाच तिकडे उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक कठोर निर्णय घेतला आहे. सरकारने सक्त जमीन कायद्याला मान्यता दिली आहे. तसेच या कायद्याचा संशोधित मसुदा हा विधानसभेच्या अधिवेशनात सभागृहात मांडला जाणार आहे. त्यानंतर बाहेरील लोकांना उत्तराखंडमध्ये शेती आणि हॉर्टिकल्चरसाठी जमीन खरेदी करता येणार नाही. मागच्या दशकभरापासून उत्तराखंडमध्ये शेतजमीन वेगाने वेगळ्या वापरासाठी उपयोगात आणली जात होती. त्यानंतर असा कायदा तयार करण्याची मागणी सुरू झाली होती.

या नव्या कायद्यातील तरतुदीनुसार २०१८ मध्ये रावत सरकारने तयार केलेले सर्व भूमी कायदे रद्द करण्यात आले आहेत. राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये बाहेरील लोक शेती आणि बागायतीसाठी जमीन खरेदी करू शकणार नाही. हरिद्वार आणि उधमसिंह नगर जिल्ह्यांचा समावेश या कायद्यात करण्यात आलेला नाही. पर्वतीय परिसरातील जमिनींवर नव्या पद्धतीने चर्चा होईल. तसेच जिल्हा दंडाधिकारी जमीन खरेदीवर शिक्कामोर्तब करू शकणार नाही. तसेच डेटा सुव्यवस्थित उपलब्ध व्हावा यासाठी जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन पोर्टल तयार केलं जाईल. तसेच जर कुणी नियम मोडून जमीन खरेदी-विक्री केली तर सरकार ती जमीन आपल्या ताब्यात घेऊ शकेल.

स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशमधून विभाजन होऊन वेगळं राज्य बनेपर्यंत उत्तराखंडमध्ये जमीन खरेदीवर  कुठलेही निर्बंध नव्हते. एवढंच नाही तर वेगळं राज्य तयार झाल्यानंतरही यावर कुणी आक्षेप घेतला नव्हता. त्यामुळे बाहेरील लोकांची या भागात वर्दळ वाढली आणि ते स्वस्तात जमीन खरेदी करून आपल्याला हवा तसा वापर करू लागले. त्यामुळे स्थानिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. राज्यात पर्यटन मोठ्या प्रमाणात असल्याने बाहेरील लोक फार्म हाऊस, हॉटेल आणि रिसॉर्ट बांधू लागले. त्यामुळे स्थानिकांना शेतीसाठी जमीन कमी पडू लागली. त्यामधूनच या कायद्याची मागणी होऊ लागली.    

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडGovernmentसरकार