शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

उत्तर प्रदेश : शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्या लखीमपूरमध्ये कुणाला मिळणार कौल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 09:31 IST

मंत्र्यांचा राजीनामा न घेतल्याने संताप; विकासकामे, जातीची गणितेही प्रभावी ठरणार

योगेश बिडवईटिकुनिया (लखीमपूर खिरी) : देशातील शेतकरी आंदोलनावेळी भाजपच्या मंत्रिपुत्राच्या ताफ्यातील गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेने देशभरात चर्चेत आलेेल्या लखीमपूरमध्ये मतदारांचा कौल कुणाला मिळणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. शेतकऱ्यांना चिरडण्याची टिकुनिया येथील संतापजनक घटना लखीमपूर खिरी जिल्ह्यात निवडणुकीचा मुद्दा बनली आहे. शेती, ग्रामीण भागातील विकासकामे, सुरक्षा हे मुद्देही निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत. 

लखीमपूर खिरी क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा जिल्हा आहे. टिकुनिया हे गाव निघासन या विधानसभा मतदारसंघात येते. लखनौपासून २३६ किलोमीटरवरील टिकुनिया गावातील संतापजनक घटनेची जगभरातील प्रसारमाध्यमांनी दखल घेतली होती. साधारण १६ हजार लोकसंख्या असलेल्या टिकुनियातील घटनास्थळावर गेल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. ग्रामीण भागातील हा रस्ता फारसा रहदारीचा नाही. मात्र, केंद्रीय कृषी कायद्यांना शांततेच्या मार्गाने विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना भरधाव गाड्यांनी चिरडून टाकण्याचा प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो. गाडीखाली चिरडल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कानठळ्या बसविणाऱ्या किंकाळ्या तुमच्या कानात घुमल्याशिवाय राहत नाही. या घटनेनंतर मंत्री अजयकुमार मिश्र यांचा राजीनामा न घेतल्याचा येथील लोकांमध्ये राग आहे. 

‘मला टिकुनियात येऊन ४० वर्षे झाली. मी पंजाबमधून येथे शेती करण्यासाठी आलो. अर्धा एकर जमीन विकत घेतली. त्यात गहू करतो. सरकार आमचे एेकत नाही. शेतकरी समाधानी नाही,’ असे येथील शीख समुदायातील एका स्थानिक शेतकऱ्याने सांगितले. तर टिकुनियातील घटनेचा प्रभाव एका ठराविक वर्गापुरताच आहे. ही घटना निवडणुकीचे गणित बदलेल, असे वाटत नसल्याचे स्थानिक पत्रकार शुभम कश्यप यांनी सांगितले. येथे बिरादरीचा मुद्दा नाही. बाबाला (योगी आदित्यनाथ) चोर, भामटे घाबरतात, असे स्थानिक व्यापारी बजरंग गोयल यांनी सांगितले. 

सपा-भाजपमध्ये चुरशीची लढतनिघोसन मतदारसंघात भाजप व समाजवादी पार्टीतच मुख्य लढत आहे. भाजपचे विद्यमान आमदार शशांक वर्मा यांची प्रतिमा चांगली आहे. त्यांचे वडील योगी आदित्यनाथ सरकारमध्ये मंत्री होते. त्यांच्या निधनानंतर शशांक पोटनिवडणुकीत विजयी झाले. बसपाचे दोनवेळा आमदार राहिलेले आर. एस. कुशवाह यंदा समाजवादी पक्षातून नशीब आजमावत आहेत.

छोटे शेतकरी कोणाच्या बाजूने?ऊस उत्पादक व इतर शेतकऱ्यांचे प्रश्नही येथे चर्चेत आहेत. या भागात छोट्या शेतकऱ्यांची संख्या ७० टक्क्यांच्या आसपास आहे. शेतमजुरांची संख्याही मोठी आहे.

ओबीसी, दलितांची मते कोणाला?टिकुनियातील घटनेत शीख समुदायातील शेतकरी मारले गेले. या मतदारसंघात शीख समुदायाची सुमारे दहा टक्के मते आहेत. त्याशिवाय मौर्य, कश्यप, चौहाण, वर्मा अशा इतर मागासवर्गीय व दलित समाजातील मतदारांचीही मोठी संख्या आहे. मुस्लीम समाजाची मतेही निर्णायक ठरतील. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२lakhimpur-pcलखीमपुर