शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

“हिंदूनो, जर ‘हे’ षडयंत्र समजलं नाही तर नष्ट व्हाल”; महंत नरसिंहानंदांचं पुन्हा वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 16:28 IST

उत्तर प्रदेश एटीएसनं मूकबधिर विद्यार्थी आणि गरीब लोकांना पैसे, नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून धर्मांतरण करायला भाग पाडणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे.

ठळक मुद्देविशेष म्हणजे अटक केलेल्यांपैकी एक मोहम्मद उमर गौतम हा धर्मपरिवर्तन करून मुस्लीम बनला आहेअटक केलेल्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव मुफ्ती काजी जहांगीर आलम कासमी असं आहे. एक मोठा गट आहे जो हिंदुंचं धर्म परिवर्तन करून त्यांना मुसलमान बनवत आहे.

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश एटीएसकडून देशाची राजधानी दिल्लीतून धर्म परिवर्तन करणाऱ्या रॅकेटमधील २ जणांना अटक केली आहे. या कारवाईनंतर गाजियाबाद येथील डासना देवी मंदिराचे महंत नरसिंहानंद सरस्वती यांनी मोठं विधान केले आहे. मी आज काशीत आहे. यूपी एटीएसनं जहांगीर आणि उमर गौतम नावाच्या दोन मौलवींना पकडलं आहे. त्यांचे धागेदोरे माझी हत्य करण्यासाठी जे मुस्लीम आले होते त्यांच्याशी जोडले आहेत असा दावा नरसिंहानंद सरस्वती यांनी केला.

महंत नरसिंहानंद सरस्वती म्हणाले की, एक मोठा गट आहे जो हिंदुंचं धर्म परिवर्तन करून त्यांना मुसलमान बनवत आहे. हा गट देशातंर्गत युद्ध करण्यासाठी काम करतोय. हिंदूमधील सर्व लोकांना याची माहिती आहे. परंतु कोणीही चर्चा करत नाही. ज्या मोठ्या प्रमाणात हा गट हिंदू लोकांचे धर्मांतरण करत आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. हिंदूंविरोधात होणारं षडयंत्र वेळीच ओळखायला हवं. आतापर्यंत लाखो हिंदुंना मुस्लिम बनवण्यात आलं आहे. पण कोणी बोलत नाही. हिंदूना जर हे षडयंत्र समजलं नाही तर ते नष्ट होतील असं त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेश एटीएसनं मूकबधिर विद्यार्थी आणि गरीब लोकांना पैसे, नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून धर्मांतरण करायला भाग पाडणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्यांपैकी एक मोहम्मद उमर गौतम हा धर्मपरिवर्तन करून मुस्लीम बनला आहे. त्याच्या वडिलांचे नाव धनराज सिंह गौतम आहे. तर अटक केलेल्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव मुफ्ती काजी जहांगीर आलम कासमी असं आहे. हे दोघंही दिल्लीच्या जामिया नगर येथे राहणारे आहेत.

“कोरोना मोठं षडयंत्र, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचं कारण; प्रत्येक हिंदूने ५-६ मुलांना जन्म द्यावा”

प्रत्येक हिंदूने ५-६ मुलांना जन्म द्यावा

अलीकडेच नरसिंहानंद सरस्वती यांनी मुस्लिमांच्या वाढत्या संख्येवर भाष्य केले होते. भारतात मुस्लिमांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. ज्याठिकाणी मुस्लिमांची संख्या वाढली आहे त्याठिकाणी ते इतरांना जिवंत सोडत नाहीत. हिंदू नेत्यांवर भरवसा ठेऊ नका. प्रत्येक हिंदूने कमीत कमी ५ ते ६ मुलांना जन्म द्यायला हवा. ज्यारितीने मुस्लिमांची संख्या वाढतेय ते पाहता महाविनाश होऊ शकतो. प्रत्येक हिंदूला शस्त्रधारी बनण्याची आवश्यकता आहे असंही महंत नरसिंहानंद सरस्वती म्हणाले होते.

नरसिंहानंदांची वादग्रस्त मालिका

डासना मंदिरात पाणी पिण्यासाठी एक मुस्लीम मुलगा आला होता तेव्हा त्याला मारहाण करण्यात आली होती तेव्हा या मंदिराचे महंत असलेले नरसिंहानंद सरस्वती चर्चेत आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, माझ्या समर्थकांनी त्या मुलाला मारलं कारण ते सर्व मुस्लिमांना संशयाच्या नजरेने पाहतात. आमच्या मंदिर परिसरात कोणत्याही मुस्लिमांना प्रवेश दिला जात नाही. मग तो पत्रकार असो वा सरकारी अधिकारी. हे मंदिर सनातन धर्माच्या भक्तांसाठी आहे असं ते म्हणाले होते.   

टॅग्स :HinduहिंदूMuslimमुस्लीमAnti Terrorist Squadएटीएस