शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

“हिंदूनो, जर ‘हे’ षडयंत्र समजलं नाही तर नष्ट व्हाल”; महंत नरसिंहानंदांचं पुन्हा वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 16:28 IST

उत्तर प्रदेश एटीएसनं मूकबधिर विद्यार्थी आणि गरीब लोकांना पैसे, नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून धर्मांतरण करायला भाग पाडणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे.

ठळक मुद्देविशेष म्हणजे अटक केलेल्यांपैकी एक मोहम्मद उमर गौतम हा धर्मपरिवर्तन करून मुस्लीम बनला आहेअटक केलेल्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव मुफ्ती काजी जहांगीर आलम कासमी असं आहे. एक मोठा गट आहे जो हिंदुंचं धर्म परिवर्तन करून त्यांना मुसलमान बनवत आहे.

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश एटीएसकडून देशाची राजधानी दिल्लीतून धर्म परिवर्तन करणाऱ्या रॅकेटमधील २ जणांना अटक केली आहे. या कारवाईनंतर गाजियाबाद येथील डासना देवी मंदिराचे महंत नरसिंहानंद सरस्वती यांनी मोठं विधान केले आहे. मी आज काशीत आहे. यूपी एटीएसनं जहांगीर आणि उमर गौतम नावाच्या दोन मौलवींना पकडलं आहे. त्यांचे धागेदोरे माझी हत्य करण्यासाठी जे मुस्लीम आले होते त्यांच्याशी जोडले आहेत असा दावा नरसिंहानंद सरस्वती यांनी केला.

महंत नरसिंहानंद सरस्वती म्हणाले की, एक मोठा गट आहे जो हिंदुंचं धर्म परिवर्तन करून त्यांना मुसलमान बनवत आहे. हा गट देशातंर्गत युद्ध करण्यासाठी काम करतोय. हिंदूमधील सर्व लोकांना याची माहिती आहे. परंतु कोणीही चर्चा करत नाही. ज्या मोठ्या प्रमाणात हा गट हिंदू लोकांचे धर्मांतरण करत आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. हिंदूंविरोधात होणारं षडयंत्र वेळीच ओळखायला हवं. आतापर्यंत लाखो हिंदुंना मुस्लिम बनवण्यात आलं आहे. पण कोणी बोलत नाही. हिंदूना जर हे षडयंत्र समजलं नाही तर ते नष्ट होतील असं त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेश एटीएसनं मूकबधिर विद्यार्थी आणि गरीब लोकांना पैसे, नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून धर्मांतरण करायला भाग पाडणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्यांपैकी एक मोहम्मद उमर गौतम हा धर्मपरिवर्तन करून मुस्लीम बनला आहे. त्याच्या वडिलांचे नाव धनराज सिंह गौतम आहे. तर अटक केलेल्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव मुफ्ती काजी जहांगीर आलम कासमी असं आहे. हे दोघंही दिल्लीच्या जामिया नगर येथे राहणारे आहेत.

“कोरोना मोठं षडयंत्र, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचं कारण; प्रत्येक हिंदूने ५-६ मुलांना जन्म द्यावा”

प्रत्येक हिंदूने ५-६ मुलांना जन्म द्यावा

अलीकडेच नरसिंहानंद सरस्वती यांनी मुस्लिमांच्या वाढत्या संख्येवर भाष्य केले होते. भारतात मुस्लिमांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. ज्याठिकाणी मुस्लिमांची संख्या वाढली आहे त्याठिकाणी ते इतरांना जिवंत सोडत नाहीत. हिंदू नेत्यांवर भरवसा ठेऊ नका. प्रत्येक हिंदूने कमीत कमी ५ ते ६ मुलांना जन्म द्यायला हवा. ज्यारितीने मुस्लिमांची संख्या वाढतेय ते पाहता महाविनाश होऊ शकतो. प्रत्येक हिंदूला शस्त्रधारी बनण्याची आवश्यकता आहे असंही महंत नरसिंहानंद सरस्वती म्हणाले होते.

नरसिंहानंदांची वादग्रस्त मालिका

डासना मंदिरात पाणी पिण्यासाठी एक मुस्लीम मुलगा आला होता तेव्हा त्याला मारहाण करण्यात आली होती तेव्हा या मंदिराचे महंत असलेले नरसिंहानंद सरस्वती चर्चेत आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, माझ्या समर्थकांनी त्या मुलाला मारलं कारण ते सर्व मुस्लिमांना संशयाच्या नजरेने पाहतात. आमच्या मंदिर परिसरात कोणत्याही मुस्लिमांना प्रवेश दिला जात नाही. मग तो पत्रकार असो वा सरकारी अधिकारी. हे मंदिर सनातन धर्माच्या भक्तांसाठी आहे असं ते म्हणाले होते.   

टॅग्स :HinduहिंदूMuslimमुस्लीमAnti Terrorist Squadएटीएस