शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

“हिंदूनो, जर ‘हे’ षडयंत्र समजलं नाही तर नष्ट व्हाल”; महंत नरसिंहानंदांचं पुन्हा वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 16:28 IST

उत्तर प्रदेश एटीएसनं मूकबधिर विद्यार्थी आणि गरीब लोकांना पैसे, नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून धर्मांतरण करायला भाग पाडणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे.

ठळक मुद्देविशेष म्हणजे अटक केलेल्यांपैकी एक मोहम्मद उमर गौतम हा धर्मपरिवर्तन करून मुस्लीम बनला आहेअटक केलेल्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव मुफ्ती काजी जहांगीर आलम कासमी असं आहे. एक मोठा गट आहे जो हिंदुंचं धर्म परिवर्तन करून त्यांना मुसलमान बनवत आहे.

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश एटीएसकडून देशाची राजधानी दिल्लीतून धर्म परिवर्तन करणाऱ्या रॅकेटमधील २ जणांना अटक केली आहे. या कारवाईनंतर गाजियाबाद येथील डासना देवी मंदिराचे महंत नरसिंहानंद सरस्वती यांनी मोठं विधान केले आहे. मी आज काशीत आहे. यूपी एटीएसनं जहांगीर आणि उमर गौतम नावाच्या दोन मौलवींना पकडलं आहे. त्यांचे धागेदोरे माझी हत्य करण्यासाठी जे मुस्लीम आले होते त्यांच्याशी जोडले आहेत असा दावा नरसिंहानंद सरस्वती यांनी केला.

महंत नरसिंहानंद सरस्वती म्हणाले की, एक मोठा गट आहे जो हिंदुंचं धर्म परिवर्तन करून त्यांना मुसलमान बनवत आहे. हा गट देशातंर्गत युद्ध करण्यासाठी काम करतोय. हिंदूमधील सर्व लोकांना याची माहिती आहे. परंतु कोणीही चर्चा करत नाही. ज्या मोठ्या प्रमाणात हा गट हिंदू लोकांचे धर्मांतरण करत आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. हिंदूंविरोधात होणारं षडयंत्र वेळीच ओळखायला हवं. आतापर्यंत लाखो हिंदुंना मुस्लिम बनवण्यात आलं आहे. पण कोणी बोलत नाही. हिंदूना जर हे षडयंत्र समजलं नाही तर ते नष्ट होतील असं त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेश एटीएसनं मूकबधिर विद्यार्थी आणि गरीब लोकांना पैसे, नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून धर्मांतरण करायला भाग पाडणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्यांपैकी एक मोहम्मद उमर गौतम हा धर्मपरिवर्तन करून मुस्लीम बनला आहे. त्याच्या वडिलांचे नाव धनराज सिंह गौतम आहे. तर अटक केलेल्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव मुफ्ती काजी जहांगीर आलम कासमी असं आहे. हे दोघंही दिल्लीच्या जामिया नगर येथे राहणारे आहेत.

“कोरोना मोठं षडयंत्र, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचं कारण; प्रत्येक हिंदूने ५-६ मुलांना जन्म द्यावा”

प्रत्येक हिंदूने ५-६ मुलांना जन्म द्यावा

अलीकडेच नरसिंहानंद सरस्वती यांनी मुस्लिमांच्या वाढत्या संख्येवर भाष्य केले होते. भारतात मुस्लिमांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. ज्याठिकाणी मुस्लिमांची संख्या वाढली आहे त्याठिकाणी ते इतरांना जिवंत सोडत नाहीत. हिंदू नेत्यांवर भरवसा ठेऊ नका. प्रत्येक हिंदूने कमीत कमी ५ ते ६ मुलांना जन्म द्यायला हवा. ज्यारितीने मुस्लिमांची संख्या वाढतेय ते पाहता महाविनाश होऊ शकतो. प्रत्येक हिंदूला शस्त्रधारी बनण्याची आवश्यकता आहे असंही महंत नरसिंहानंद सरस्वती म्हणाले होते.

नरसिंहानंदांची वादग्रस्त मालिका

डासना मंदिरात पाणी पिण्यासाठी एक मुस्लीम मुलगा आला होता तेव्हा त्याला मारहाण करण्यात आली होती तेव्हा या मंदिराचे महंत असलेले नरसिंहानंद सरस्वती चर्चेत आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, माझ्या समर्थकांनी त्या मुलाला मारलं कारण ते सर्व मुस्लिमांना संशयाच्या नजरेने पाहतात. आमच्या मंदिर परिसरात कोणत्याही मुस्लिमांना प्रवेश दिला जात नाही. मग तो पत्रकार असो वा सरकारी अधिकारी. हे मंदिर सनातन धर्माच्या भक्तांसाठी आहे असं ते म्हणाले होते.   

टॅग्स :HinduहिंदूMuslimमुस्लीमAnti Terrorist Squadएटीएस