शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

उत्तर प्रदेशला बाहेरच्या माणसाची गरज नाही

By admin | Updated: February 18, 2017 01:44 IST

उत्तर प्रदेशला बाहेरच्या माणसाची गरज नाही. राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्याच्याकडे त्याची माणसे आहेत, अशा शब्दांत

रायबरेली (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशला बाहेरच्या माणसाची गरज नाही. राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्याच्याकडे त्याची माणसे आहेत, अशा शब्दांत प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी उत्तर प्रदेशचा दत्तकपुत्र या केलेल्या विधानावर शुक्रवारी टीका केली.उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रियांका गांधी प्रथमच येथील जाहीर सभेत भाषण केले. लोकांनी समाजवादी पक्ष-काँग्रेस युतीला बळकट करून सत्ता द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रियांका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही मोदी यांच्यावर टीका केली. मोदी लोकसभा मतदार संघात ‘पोकळ’ आणि ‘खोटी’ आश्वासने देत असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी यांनी गुरुवारी हरदोईत प्रचार सभेत बोलताना वाराणसीने मला दत्तक घेतले असून मी तिच्या मुलासारखा आहे. मी तिचा विकास करीन,’ असे म्हटले होते. यावर प्रियांका गांधी म्हणाल्या,‘‘उत्तर प्रदेशला बाहेरचा माणूस दत्तक घ्यायची गरज आहे, असे मला वाटत नाही.’’ ‘‘मोदीजी, बाहेरील व्यक्ती दत्तक घ्यावी अशी राज्याला गरज आहे का? राज्यात कोणी तरूण नाही का? असे दोन तरूण तुमच्यासमोर आहेत ते म्हणजे राहुलजी आणि अखिलेशजी. या दोघांच्याही हृदयात आणि मनात उत्तर प्रदेश आहे.’’ आपल्या छोट्याशा भाषणात गांधी म्हणाल्या की, कोणताही बाहेरचा नेता गरजेचा नाही. राज्यातील प्रत्येक युवक नेता बनू शकतो. येथील प्रत्येक युवक हा उत्तर प्रदेशसाठी काम करील. (वृत्तसंस्था)पक्ष कमकुवत करणाऱ्यांपासून सावध राहाआपण ज्या समाजवादी पार्टीचे (सपा) नेतृत्व करीत आहोत तोच खरा समाजवादी पक्ष असून, जे लोक या पक्षाला कमकुवत करू इच्छितात त्यांच्यापासून सर्वांनी सावध राहावे, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेख यादव यांनी येथे केले. इटावा येथील नुमाईश मैदानावर गुरुवारी निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. आपले काका शिवपाल यादव यांचा थेट नामोल्लेख टाळून ते म्हणाले की, आम्ही ज्या लोकांवर विश्वास ठेवत होतो, त्याच लोकांनी माझ्यात आणि नेताजींमध्ये (मुलायमसिंह) मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भांडणे लावून सायकल हिसकावण्याचा प्रयत्न केला. ते मला षडयंत्र रचून पक्षातून बाहेर करू इच्छित होते. मात्र, आम्ही त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ दिले नाहीत.