शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

उत्तर प्रदेशला बाहेरच्या माणसाची गरज नाही

By admin | Updated: February 18, 2017 01:44 IST

उत्तर प्रदेशला बाहेरच्या माणसाची गरज नाही. राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्याच्याकडे त्याची माणसे आहेत, अशा शब्दांत

रायबरेली (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशला बाहेरच्या माणसाची गरज नाही. राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्याच्याकडे त्याची माणसे आहेत, अशा शब्दांत प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी उत्तर प्रदेशचा दत्तकपुत्र या केलेल्या विधानावर शुक्रवारी टीका केली.उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रियांका गांधी प्रथमच येथील जाहीर सभेत भाषण केले. लोकांनी समाजवादी पक्ष-काँग्रेस युतीला बळकट करून सत्ता द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रियांका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही मोदी यांच्यावर टीका केली. मोदी लोकसभा मतदार संघात ‘पोकळ’ आणि ‘खोटी’ आश्वासने देत असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी यांनी गुरुवारी हरदोईत प्रचार सभेत बोलताना वाराणसीने मला दत्तक घेतले असून मी तिच्या मुलासारखा आहे. मी तिचा विकास करीन,’ असे म्हटले होते. यावर प्रियांका गांधी म्हणाल्या,‘‘उत्तर प्रदेशला बाहेरचा माणूस दत्तक घ्यायची गरज आहे, असे मला वाटत नाही.’’ ‘‘मोदीजी, बाहेरील व्यक्ती दत्तक घ्यावी अशी राज्याला गरज आहे का? राज्यात कोणी तरूण नाही का? असे दोन तरूण तुमच्यासमोर आहेत ते म्हणजे राहुलजी आणि अखिलेशजी. या दोघांच्याही हृदयात आणि मनात उत्तर प्रदेश आहे.’’ आपल्या छोट्याशा भाषणात गांधी म्हणाल्या की, कोणताही बाहेरचा नेता गरजेचा नाही. राज्यातील प्रत्येक युवक नेता बनू शकतो. येथील प्रत्येक युवक हा उत्तर प्रदेशसाठी काम करील. (वृत्तसंस्था)पक्ष कमकुवत करणाऱ्यांपासून सावध राहाआपण ज्या समाजवादी पार्टीचे (सपा) नेतृत्व करीत आहोत तोच खरा समाजवादी पक्ष असून, जे लोक या पक्षाला कमकुवत करू इच्छितात त्यांच्यापासून सर्वांनी सावध राहावे, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेख यादव यांनी येथे केले. इटावा येथील नुमाईश मैदानावर गुरुवारी निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. आपले काका शिवपाल यादव यांचा थेट नामोल्लेख टाळून ते म्हणाले की, आम्ही ज्या लोकांवर विश्वास ठेवत होतो, त्याच लोकांनी माझ्यात आणि नेताजींमध्ये (मुलायमसिंह) मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भांडणे लावून सायकल हिसकावण्याचा प्रयत्न केला. ते मला षडयंत्र रचून पक्षातून बाहेर करू इच्छित होते. मात्र, आम्ही त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ दिले नाहीत.