शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

उत्तर प्रदेशातील पराभवाचे खापर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 01:06 IST

उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा व नुरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्या पक्षाच्या दोन आमदारांनी त्याचे खापर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर फोडले आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा व नुरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्या पक्षाच्या दोन आमदारांनी त्याचे खापर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर फोडले आहे. भ्रष्टाचार थांबवण्यात राज्य सरकारला अपयश आले असून, अकार्यक्षम मंत्र्यांना आता तरी हाकलणे, हाच त्यावरील मार्ग आहे, असे या आमदारांनी म्हटले आहे.गोपामाईचे आमदार श्याम प्रकाश यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून या पराभवाबद्दल थेट योगी आदित्यनाथ तसेच रा. स्व. संघ व भाजपाचे नेते यांनाच जबाबदार धरले आहे. त्यांनी लिहिले आहे की, आधी गोरखपूर व फुलपूर आणि आता कैराना आणि नूरपूर... या पराभवाचे आम्हाला दु:ख आहे. नरेंद्र मोदी यांच्या नावाने भाजपाला राज्यात सत्ता मिळाली. पण सरकारची सारी सूत्रे मात्र संघ व संघटना यांच्या हातात असल्याने मुख्यमंत्रीही असहाय्य आहेत.एका वृत्तपत्राशी बोलतानाही श्याम प्रकाश म्हणाले की ही केवळ माझी नव्हे, तर बहुतांशी भाजपा आमदारांची भावना आहे. लोकप्रतिनिधींचे अधिकारी ऐकत नाही. भ्रष्टाचार प्रचंड असून, त्यामुळे लोक नाराज आहेत. मुख्यमंत्री मोकळेपणाने फिरू शकत नाहीत, मनासारखे काम करू शकत नाहीत. अशी स्थिती कायम राहिल्यास भाजपाचे भवितव्य अंधकारमय असेल.दुष्ट शक्तींचा विजय?योगी आदित्यनाथ यांनी मात्र हा विजय दुष्ट शक्तींचा आहे. भ्रष्टाचार करून पैसा जमा केलेल्या मंडळींनी वाईट पद्धत अवलंबली आणि त्याचा विजय झाला. अर्थात, अशा पराभवाने आपण खचून जाणार नाही. या प्रकारे त्यांना सतत जिंकता येणार नाही, असे म्हटले आहे.आपल्याला घरचा रस्ता जनताच दाखवेलबलिया जिल्ह्यातील आमदार सुरेंद्र सिंह यांनीही राज्य सरकारच्या एकूणच कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की आता तरी अकार्यक्षम मंत्र्यांना दूर करायला हवे. त्यांना दूर न केल्यास पुढील निवडणुकामध्ये राज्यातील जनताच भाजपाला घरचा रस्ता दाखवेल. भाजपा नेत्यांनी आता तरी याचा विचार करायला हवा.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथ