शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

उत्कृष्टतेचा आदर आणि सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 03:03 IST

भारतीय संसदीय लोकशाहीच्या इतिहासात १९ जुलै २०१७चा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला गेलाय. देशात पहिल्यांदा मीडिया हाऊस असलेल्या लोकमत वृत्तपत्र समूहाने

- अमिताभ श्रीवास्तवभारतीय संसदीय लोकशाहीच्या इतिहासात १९ जुलै २०१७चा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला गेलाय. देशात पहिल्यांदा मीडिया हाऊस असलेल्या लोकमत वृत्तपत्र समूहाने नवी दिल्लीतील विज्ञान भवनात लोकसभा आणि राज्यसभेत आपली कामगिरी व आचरणाने संसदीय लोकशाहीला विशेष प्रतिष्ठा मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाºया सदस्यांचा सन्मान केला. या संसद सदस्यांची कार्यपद्धती नव्या नेतृत्वासाठी मार्गदर्शक आहे. आधी विधिमंडळ गौरव पुरस्कार आणि नंतर लोकमत संसदीय पुरस्कार देण्यामागे लोकमत समूहाची एक रचनात्मक भावना आहे. संसदेत नुसता गोंधळ घालण्यापेक्षा जनतेच्या आशा-आकांक्षांना मूर्त रूप कसे देता येईल, पूर्ण माहितीसह अभ्यासपूर्ण भाषणे कशी केली जातील, विचारांचे आदान-प्रदान कसे होईल, यावर विचार करणे खूपच गरजेचे आहे. संसद आणि विधिमंडळाने लोककल्याणाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण कायदे बनविले आहेत. परंतु अलिकडील काळात संसद असो वा देशभरातील विधिमंडळ, यामध्ये गंभीर चर्चा, तार्किक वादविवादापेक्षा सभागृह ठप्प पाडणे, चर्चा न होऊ देणे, गोंधळाचा फायदा घेऊन विधेयके पारित करून घेण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. समाजसुधारक आणि विचारवंतांना जशी या गोष्टींची चिंता आहे आणि देशातील कोट्यवधी नागरिकांनाही त्यांचा अपेक्षाभंग होण्याचे दु:ख आहे. कारण सुखी आयुष्य, अन्न-वस्त्र-निवारा या सारख्या मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी जनतेच्या सर्व अपेक्षा या सभागृहाशी जुळलेल्या आहेत. अशा स्थितीत देशातील तरुणाईच्या मनात असलेला सभागृहाचा आदर एका क्षणालाही कमी होऊ नये, हेच लोकमत समूहाचे प्रयत्न राहिले आहेत.निरंतर निर्भीड, निष्पक्ष आणि लोकोपयोगी पत्रकारिता करणारा ‘लोकमत’ दलित, पीडित, शोषित, उपेक्षितांच्या हक्कांसाठी नेहमी लढत आला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुद्ध आणि स्वातंत्र्यानंतर जनतेसाठी लढण्याचे व्रत ‘लोकमत’ने परिश्रमपूर्वक जपले आहे. याच क्रमात पुढे संसदेत जनतेच्याआशा-आकांक्षा पूर्ण करणाºया आदर्श लोकप्रतिनिधींचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकमत संसदीय पुरस्कार’ची योजना करण्यात आली. विज्ञान भवनात आयोजित या कार्यक्रमात उपराष्ट्रपती श्री. हमीद अन्सारी मुख्य अतिथीच्या रूपात तर विविध पक्षांचे वरिष्ठ नेत्यांसोबतच विविध देशांचे राजदूत आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.