शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अमेरिकेच्या २९ वस्तूंवरील आयात करात केली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:09 IST

भारताच्या काही वस्तूंवर वाढीव आयात कर लावणाऱ्या अमेरिकेला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले असून, २९ अमेरिकी उत्पादनांवरील आयात करात वाढ केली आहे.

नवी दिल्ली : भारताच्या काही वस्तूंवर वाढीव आयात कर लावणाऱ्या अमेरिकेला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले असून, २९ अमेरिकी उत्पादनांवरील आयात करात वाढ केली आहे. डाळी, लोह व पोलाद उत्पादने आणि रसायने यांचा त्यात समावेश आहे.आयात करातील ही वाढ ४ आॅगस्टपासून लागू होईल, असे वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे. भारत सरकारने याआधीच याची घोषणा केली होती. ती आता प्रत्यक्षात अमलात येईल.अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत संरक्षणवादी धोरण स्वीकारून आयात करात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे युरोपीय संघाने तसेच चीनने अमेरिकी वस्तूंवर वाढीव आयात कर लावला आहे. याचा परिणाम म्हणून व्यापारी युद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता भारतानेही अमेरिकी वस्तूंवर वाढीव आयात कर लावला आहे.>भारताला आर्थिक फटकारोगनिदान घटक द्रव्यांवरील आयात कर दुपटीने वाढवून २० टक्के तर फौंड्री क्षेत्रातील साच्यांच्या बंधकावरील कर १७.५ टक्के केला आहे. लोहावरील आयात कर १५ वरून २७.५० टक्के, तर स्टेनलेस स्टीलवरील कर १५ वरून २२.५० टक्के केला आहे. अमेरिकेने भारतातून आयात होणाºया लोह व अ‍ॅल्युमिनियम उत्पादनांवर आयात कर वाढविला आहे. त्यामुळे भारताला २४.१ कोटी डॉलरचा फटका बसणार आहे. याच्या उत्तरात भारताने ही कारवाई केली.>कशावर किती कर आकारला जाणार?वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की, अमेरिकेतून आयात होणारे वाटाणे, चणे व मसूर डाळीवरील आयात कर ३० वरून ७० टक्के केला आहे. फोडलेल्या बदामावर आयात कर १०० वरून १२० रुपये इतका होणार आहे. सालासह बदामावरील आयात शुल्क ३५ रुपये किलोवरून ४२ रुपये किलो इतके करण्यात आले आहे. अक्रोडवरील आयात कर ३० टक्क्यांवरून १२० टक्के, सफरचंदावरील कर ५० टक्क्यांवरून ७५ टक्के, बोरिक अ‍ॅसिडवरील कर १७.५० टक्के, फॉस्परिक अ‍ॅसिडवरील कर १० वरून २० टक्के इतका करण्यात आला आहे.