शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

यूपीएससीचा यू-टर्न, ४५ पदांची वादग्रस्त थेट भरती अखेर रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 06:04 IST

विरोधकांसह घटकपक्षांच्या विरोधामुळे केंद्राचा निर्णय

नवी दिल्ली : विरोधकांकडून होणारी तीव्र टीका आणि सत्तेत सहभागी घटकपक्षांच्या विरोधानंतर केंद्र सरकारने केंद्रीय मंत्रालयांमध्ये खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची सहसचिव, संचालक, उपसचिव स्तरावरील ४५ जागांवर होणारी थेट भरती व त्यासाठीची जाहिरात रद्द करण्याची सूचना केंद्रीय लोकसेवा आयोगाला (यूपीएससी) मंगळवारी केली. त्याचे पालन यूपीएससीने केले आहे. 

केंद्रीय कार्मिक खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी यासंदर्भात यूपीएससीच्या अध्यक्ष प्रीती सूदन यांना एक पत्र लिहिले होते. भाजप अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी यांचा आरक्षणाचा हक्क हिरावून घेत असल्याची टीका काँग्रेसने केली होती. जितेंद्र सिंह यांनी म्हटले की, समाजातील उपेक्षित घटकांना सरकारी सेवेमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळायला हवे. सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टीने ही गोष्ट अतिशय आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे. 

या थेट भरतीसाठी प्रसिद्ध झालेली जाहिरातही रद्द करण्यात आली आहे. सदर पदांच्या भरतीसाठी यूपीएससीने १७ ऑगस्ट रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली होती. ज्या ४५ पदांसाठी थेट भरती करण्यात येणार होती, त्यावर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यासाठी आरक्षण ठेवले नव्हते. मात्र, आता या गोष्टीचा फेरआढावा घेणे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सामाजिक न्यायाबाबतच्या दृष्टिकोनानुसार ही निवड प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे.

या आधी कधी झाली थेट भरती?वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखाली २००५ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने सरकारी नोकऱ्यांमध्ये थेट भरतीस मान्यता दिली होती. अशीच शिफारस सहाव्या वित्त आयोगाने २०१३ साली केंद्र सरकारला केली होती. त्यावेळी व नंतरही केंद्र सरकारच्या विविध खात्यांत थेट भरतीद्वारे व आरक्षणाशिवाय ही पदे भरण्यात आल्याची उदाहरणे आहेत. विविध मंत्रालयांतील सचिव, यूआयडीएआयचे प्रमुख अशी महत्त्वाची पदेही याच प्रक्रियेद्वारे भरण्यात आली होती. पूर्वीच्या सरकारमध्ये राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य पंतप्रधान कार्यालयावर नियंत्रण ठेवत असत हे सर्वांना माहिती, आहे असा टोला जितेंद्र सिंह यांनी लगावला.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग