शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

सीबीआयमध्ये उलथापालथ; वर्मा, अस्थाना यांना बसवले घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 06:21 IST

भारताची सर्वोच्च तपास संस्था म्हणून दबदब्यासह नावलौकिक असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) मुख्यालयात मंगळवारी मध्यरात्रीपासून ‘न भूतो’ अशा घडामोडी घडल्या.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : भारताची सर्वोच्च तपास संस्था म्हणून दबदब्यासह नावलौकिक असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) मुख्यालयात मंगळवारी मध्यरात्रीपासून ‘न भूतो’ अशा घडामोडी घडल्या.सीबीआयच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आपसांतील भांडणाला अभूतपूर्व कलाटणी देण्याºया नाट्यमय घडामोडींमुळे संचालक आलोक वर्मा व विशेष संचालक राकेश अस्थाना यांचे अधिकार काढून घेऊ न, त्यांना घरी बसविण्यात आले. त्यानंतर बुधवारी सकाळी संचालक एम. नागेश्वर राव यांनी सीबीआय प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली.ओडिशाच्या १९८६ च्या तुकडीतील अधिकारी नागेश्वर राव मध्यरात्री थेट आलोक वर्मा यांच्या ११ व्या मजल्यावरील कार्यालयात पदाची सूत्रे घेण्यास दाखल झाले. सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाºयांचे अधिकार केंद्र सरकारने केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) शिफारशीनुसार काढल्याने नागेश्वर राव यांच्याकडे सूत्रे देण्यास एकही अधिकारी नव्हता.वर्मा, अस्थाना यांना रोखलेबुधवारी सकाळी वर्माव अस्थाना सीबीआयच्या मुख्यालयात गेले असता त्यांना दारापाशीच रोखण्यात आले. तडकाफकडी अधिकार काढून घेतल्याने वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, तर अस्थाना उदास मनाने घरी परतले. वर्मा यांच्या आव्हान याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होईल.अशा घडल्या हालचालीकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मंगळवारी रात्री ११.४५ वाजता (पान ८ वर)>केंद्राची भूमिका नाही - जेटलीसीबीआयमधील दोन अधिकाºयांच्या संघर्षात केंद्र सरकारची कोणतीही भूमिका नाही. त्यात हस्तक्षेप करण्याचाही सरकारचा इरादा नाही. अशा घटनांबाबत केंद्रीय दक्षता आयोग ही सुपरवायझरी अ‍ॅथॉरिटी आहे. आयोगाची मंगळवारी बैठक झाली. त्यानंतर बुधवारी सरकारने दोन्ही अधिकाºयांना सदर प्रकरणाची चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत आलोक वर्मा व राकेश अस्थाना यांचे अधिकार काढून घेतले आहेत, असे प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी केले.>राफेल चौकशीमुळेच कारवाईसीबीआयचे संचालक आलोक वर्मा राफेल सौद्यातील घोटाळ्याशी संबंधित दस्तावेज तपासत असताना त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. जो या प्रकरणाला हात घालेल, त्याला हटविण्यात येईल, संपविण्यात येईल, असाच स्पष्ट संदेश पंतप्रधानांच्या वर्मा यांच्यावरील कारवाईतून मिळतो. देश व राज्यघटना धोक्यात आहे, असा भीतीवजा इशाराही राहुल गांधी यांनी दिला आहे.