शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सीबीआयमध्ये उलथापालथ; वर्मा, अस्थाना यांना बसवले घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 06:21 IST

भारताची सर्वोच्च तपास संस्था म्हणून दबदब्यासह नावलौकिक असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) मुख्यालयात मंगळवारी मध्यरात्रीपासून ‘न भूतो’ अशा घडामोडी घडल्या.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : भारताची सर्वोच्च तपास संस्था म्हणून दबदब्यासह नावलौकिक असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) मुख्यालयात मंगळवारी मध्यरात्रीपासून ‘न भूतो’ अशा घडामोडी घडल्या.सीबीआयच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आपसांतील भांडणाला अभूतपूर्व कलाटणी देण्याºया नाट्यमय घडामोडींमुळे संचालक आलोक वर्मा व विशेष संचालक राकेश अस्थाना यांचे अधिकार काढून घेऊ न, त्यांना घरी बसविण्यात आले. त्यानंतर बुधवारी सकाळी संचालक एम. नागेश्वर राव यांनी सीबीआय प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली.ओडिशाच्या १९८६ च्या तुकडीतील अधिकारी नागेश्वर राव मध्यरात्री थेट आलोक वर्मा यांच्या ११ व्या मजल्यावरील कार्यालयात पदाची सूत्रे घेण्यास दाखल झाले. सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाºयांचे अधिकार केंद्र सरकारने केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) शिफारशीनुसार काढल्याने नागेश्वर राव यांच्याकडे सूत्रे देण्यास एकही अधिकारी नव्हता.वर्मा, अस्थाना यांना रोखलेबुधवारी सकाळी वर्माव अस्थाना सीबीआयच्या मुख्यालयात गेले असता त्यांना दारापाशीच रोखण्यात आले. तडकाफकडी अधिकार काढून घेतल्याने वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, तर अस्थाना उदास मनाने घरी परतले. वर्मा यांच्या आव्हान याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होईल.अशा घडल्या हालचालीकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मंगळवारी रात्री ११.४५ वाजता (पान ८ वर)>केंद्राची भूमिका नाही - जेटलीसीबीआयमधील दोन अधिकाºयांच्या संघर्षात केंद्र सरकारची कोणतीही भूमिका नाही. त्यात हस्तक्षेप करण्याचाही सरकारचा इरादा नाही. अशा घटनांबाबत केंद्रीय दक्षता आयोग ही सुपरवायझरी अ‍ॅथॉरिटी आहे. आयोगाची मंगळवारी बैठक झाली. त्यानंतर बुधवारी सरकारने दोन्ही अधिकाºयांना सदर प्रकरणाची चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत आलोक वर्मा व राकेश अस्थाना यांचे अधिकार काढून घेतले आहेत, असे प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी केले.>राफेल चौकशीमुळेच कारवाईसीबीआयचे संचालक आलोक वर्मा राफेल सौद्यातील घोटाळ्याशी संबंधित दस्तावेज तपासत असताना त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. जो या प्रकरणाला हात घालेल, त्याला हटविण्यात येईल, संपविण्यात येईल, असाच स्पष्ट संदेश पंतप्रधानांच्या वर्मा यांच्यावरील कारवाईतून मिळतो. देश व राज्यघटना धोक्यात आहे, असा भीतीवजा इशाराही राहुल गांधी यांनी दिला आहे.