शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात आगामी मुख्यमंत्री महायुतीचाच- हुसेन

By admin | Updated: June 21, 2014 02:10 IST

काँग्रेस राज्यातील आपला मुख्यमंत्री बदलो वा ना बदलो. विधानसभा निवडणुकीवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही.

जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
काँग्रेस राज्यातील आपला मुख्यमंत्री बदलो वा ना बदलो. विधानसभा निवडणुकीवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. लोकसभेत राज्यातील जनतेने काँग्रेसला नाकारले. त्याचप्रमाणो विधानसभेच्या निवडणुकीतही भाजप-शिवसेना आघाडी प्रचंड बहुमताने विजयी होणार असून आगामी सरकार या आघाडीचेच असेल, असा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे.
पक्षाचे प्रवक्ते सय्यद शाहनवाज हुसेन यांनी केंद्रात भाजपाप्रणीत रालोआचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच माध्यमांशी बोलताना उपरोक्त विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, सध्या महाराष्ट्र सरकारजवळ संख्याबळ असले तरी जनमत त्यांच्यासोबत नाही. मुख्यमंत्री बदलला किंवा नाही बदलला तरी त्याचा जनमतावर कुठलाही परिणाम होणार नाही. 
राज्यात सरकार आले तर मुख्यमंत्री कोण असेल? भाजपाचा की शिवसेनेचा? असा प्रश्न विचारला असता शाहनवाज यांनी सांगितले की, दोन्ही पक्ष तसेच लोकसभेत सोबत आलेले इतर पक्ष विधानसभा निवडणूकही मिळून लढवतील आणि नवीन मुख्यमंत्री हा भाजप-सेना आघाडीचाच राहील. नंतर अनौपचारिक चर्चेत मात्र केंद्रात ज्या पद्धतीने प्रथम पक्षात आणि नंतर रालोआत नेता निवडण्यात आला त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही मित्र पक्षांच्या बैठकीत नेत्याची निवड केली जाईल, असे शाहनवाज यांनी स्पष्ट केले. अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात भाजपा प्रवक्ते म्हणाले की, दिल्लीत आम आदमी पार्टी किंवा काँग्रेसच्या आमदारांचा घोडेबाजार करून सरकार स्थापन्याच्या खेळीत त्यांचा पक्ष सहभागी होणार नाही. परंतु दुस:या पक्षाचे आमदार स्वेच्छेने आमच्या सोबत आले आणि सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला तर मात्र भाजपा आपली संवैधानिक जबाबदारी पार पाडण्यास मागेपुढे बघणार नाही. 
केंद्रात राज्यमंत्री असलेले आणि सध्या बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भोव:यात अडकलेले निहालचंद मेघवाल यांचा त्यांनी बचाव केला. ज्या प्रकरणात त्यांना आरोपी सांगण्यात येत आहे त्याच्या पहिल्या आणि दुस:या प्राथमिकीत मेघवाल यांचे नाव नव्हते. या आधारे त्यांच्याविरुद्धचे प्रकरण बंद करण्यात आले होते; परंतु मंत्री होताच ते पुन्हा उचलून धरण्यात आले. 
याचा अर्थ स्पष्ट आहे. हे एक राजकीय कारस्थान आहे,असे मत त्यांनी व्यक्त केले.