शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

भीषण वास्तव! स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही ना वीज, ना रस्ता, ना शाळा; 'या' गावचा झालाच नाही विकास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 14:31 IST

गावातील लोकांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही अंधारात आणि चिखलात चालावे लागत आहे.

देश स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने अमृत महोत्सव साजरा करत असताना, देशात असंच एक गाव आहे, जे अजूनही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. या गावाचे फोटो पाहिल्यास हे चित्र स्वातंत्र्यापूर्वीचे असल्याचं दिसून येईल. पण सत्य हे आहे की, हे फोटो स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरचे आहेत. या गावातील लोकांनी वीज, रस्ता, शाळा यासह मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. इतर गावातील या सर्व सुविधा पाहून आपण स्वतःला दिलासा देतो की, कधीतरी आपली घरेही प्रकाशाने उजळून निघतील आणि आपणही पक्क्या रस्त्यावरून चालत जाऊ असं म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावस्तीचे हे ककरदरी गाव आहे. जिथे राहणाऱ्या लोकांची घरं कधी प्रकाशाने उजळून निघतील आणि लोकं पक्क्या रस्त्यावरून कधी चालणार? याचे उत्तर बहुधा कुणाकडेच नाही. त्यामुळेच या गावातील लोकांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही अंधारात आणि चिखलात चालावे लागत आहे. भारत-नेपाळ सीमेवरील श्रावस्तीच्या ककरदरी गावात ईशान्येला पर्वत, उत्तरेला नेपाळची सीमा, पश्चिम-दक्षिण भागात राप्ती नदी आणि आग्नेय भागात घनदाट जंगले आहेत. त्याची एकूण लोकसंख्या साडेतीन हजारांहून अधिक असून एकूण मतदारांची संख्या सुमारे 1570 आहे.

या गावात ना वीज आहे ना रस्ता. अंधारात जगणे आणि चिखलात चालणे हे येथील ग्रामस्थांनी आता स्वीकारले आहे. त्याचबरोबर या गावातील नवीन पिढीला देश आणि राज्यातील सरकारकडून मोठ्या आशा आहेत, ज्यांना विश्वास आहे की, येणा-या काळात आपली घरंही विजेने उजळून निघेल आणि आपणही पायी चालत जाऊ शकू. रस्ते शासनाच्या योजना या गावापर्यंत पोहोचल्याच नाहीत असे नाही. योजना आल्या पण जबाबदाऱ्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या अभावामुळे आणि सरकारी विभागांमधील संघर्षामुळे ते प्रत्यक्षात उतरू शकले नाहीत.

2011 मध्ये शासनाने या गावाला वीज देण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे ककरदरी गावात विजेचे खांब गेले, खांबावर ताराही लोंबकळत होत्या, मात्र वीज विभाग आणि वनविभाग यांच्यात असलेल्या संघर्षामुळे ककरदरी गावात आजपर्यंत विद्युतप्रवाह सुरू झालेला नाही. हे खांब ककरदरी गावापासून जंगलाच्या आतपर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र जंगलात असलेले विजेचे काही खांब अज्ञात व्यक्तींनी रातोरात उखडून काढले होते. 

ककरदरीपर्यंत पोहोचण्याबाबत बोलायचं झालं तर सार्वजनिक बांधकाम विभागाने जामुन्हा ते ककरदरी गावापर्यंतचा पक्का रस्ता मंजूर केला असला तरी त्याचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही. दुसरीकडे ककरदारीच्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ ते पुढील शिक्षणासाठी 15 किमी अंतरावर असलेल्या मल्हीपूर आणि जामुन्हा येथे जाण्यासाठी घनदाट जंगल पार करावे लागते. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधीही या प्रकरणात रस घेत नसल्याने ककरदरी येथील रहिवाशांची फसवणूक झाल्याची भावना व्यक्त होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :electricityवीजSchoolशाळाroad transportरस्ते वाहतूक