शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange; सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम!
2
आजचे राशीभविष्य, ०१ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, वादग्रस्त विषय आज टाळावेत
3
Maratha Reservation: आरक्षणामध्ये अडसर न्यायालयीन निकालांचा, समितीच्या सल्लामसलतीत बाब समोर
4
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
5
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
6
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली!
7
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
8
विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
9
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
10
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
11
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
12
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
13
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
14
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
15
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
16
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
17
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
18
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
19
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
20
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर

भीषण वास्तव! स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही ना वीज, ना रस्ता, ना शाळा; 'या' गावचा झालाच नाही विकास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 14:31 IST

गावातील लोकांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही अंधारात आणि चिखलात चालावे लागत आहे.

देश स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने अमृत महोत्सव साजरा करत असताना, देशात असंच एक गाव आहे, जे अजूनही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. या गावाचे फोटो पाहिल्यास हे चित्र स्वातंत्र्यापूर्वीचे असल्याचं दिसून येईल. पण सत्य हे आहे की, हे फोटो स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरचे आहेत. या गावातील लोकांनी वीज, रस्ता, शाळा यासह मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. इतर गावातील या सर्व सुविधा पाहून आपण स्वतःला दिलासा देतो की, कधीतरी आपली घरेही प्रकाशाने उजळून निघतील आणि आपणही पक्क्या रस्त्यावरून चालत जाऊ असं म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावस्तीचे हे ककरदरी गाव आहे. जिथे राहणाऱ्या लोकांची घरं कधी प्रकाशाने उजळून निघतील आणि लोकं पक्क्या रस्त्यावरून कधी चालणार? याचे उत्तर बहुधा कुणाकडेच नाही. त्यामुळेच या गावातील लोकांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही अंधारात आणि चिखलात चालावे लागत आहे. भारत-नेपाळ सीमेवरील श्रावस्तीच्या ककरदरी गावात ईशान्येला पर्वत, उत्तरेला नेपाळची सीमा, पश्चिम-दक्षिण भागात राप्ती नदी आणि आग्नेय भागात घनदाट जंगले आहेत. त्याची एकूण लोकसंख्या साडेतीन हजारांहून अधिक असून एकूण मतदारांची संख्या सुमारे 1570 आहे.

या गावात ना वीज आहे ना रस्ता. अंधारात जगणे आणि चिखलात चालणे हे येथील ग्रामस्थांनी आता स्वीकारले आहे. त्याचबरोबर या गावातील नवीन पिढीला देश आणि राज्यातील सरकारकडून मोठ्या आशा आहेत, ज्यांना विश्वास आहे की, येणा-या काळात आपली घरंही विजेने उजळून निघेल आणि आपणही पायी चालत जाऊ शकू. रस्ते शासनाच्या योजना या गावापर्यंत पोहोचल्याच नाहीत असे नाही. योजना आल्या पण जबाबदाऱ्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या अभावामुळे आणि सरकारी विभागांमधील संघर्षामुळे ते प्रत्यक्षात उतरू शकले नाहीत.

2011 मध्ये शासनाने या गावाला वीज देण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे ककरदरी गावात विजेचे खांब गेले, खांबावर ताराही लोंबकळत होत्या, मात्र वीज विभाग आणि वनविभाग यांच्यात असलेल्या संघर्षामुळे ककरदरी गावात आजपर्यंत विद्युतप्रवाह सुरू झालेला नाही. हे खांब ककरदरी गावापासून जंगलाच्या आतपर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र जंगलात असलेले विजेचे काही खांब अज्ञात व्यक्तींनी रातोरात उखडून काढले होते. 

ककरदरीपर्यंत पोहोचण्याबाबत बोलायचं झालं तर सार्वजनिक बांधकाम विभागाने जामुन्हा ते ककरदरी गावापर्यंतचा पक्का रस्ता मंजूर केला असला तरी त्याचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही. दुसरीकडे ककरदारीच्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ ते पुढील शिक्षणासाठी 15 किमी अंतरावर असलेल्या मल्हीपूर आणि जामुन्हा येथे जाण्यासाठी घनदाट जंगल पार करावे लागते. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधीही या प्रकरणात रस घेत नसल्याने ककरदरी येथील रहिवाशांची फसवणूक झाल्याची भावना व्यक्त होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :electricityवीजSchoolशाळाroad transportरस्ते वाहतूक