शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

भीषण वास्तव! स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही ना वीज, ना रस्ता, ना शाळा; 'या' गावचा झालाच नाही विकास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 14:31 IST

गावातील लोकांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही अंधारात आणि चिखलात चालावे लागत आहे.

देश स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने अमृत महोत्सव साजरा करत असताना, देशात असंच एक गाव आहे, जे अजूनही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. या गावाचे फोटो पाहिल्यास हे चित्र स्वातंत्र्यापूर्वीचे असल्याचं दिसून येईल. पण सत्य हे आहे की, हे फोटो स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरचे आहेत. या गावातील लोकांनी वीज, रस्ता, शाळा यासह मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. इतर गावातील या सर्व सुविधा पाहून आपण स्वतःला दिलासा देतो की, कधीतरी आपली घरेही प्रकाशाने उजळून निघतील आणि आपणही पक्क्या रस्त्यावरून चालत जाऊ असं म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावस्तीचे हे ककरदरी गाव आहे. जिथे राहणाऱ्या लोकांची घरं कधी प्रकाशाने उजळून निघतील आणि लोकं पक्क्या रस्त्यावरून कधी चालणार? याचे उत्तर बहुधा कुणाकडेच नाही. त्यामुळेच या गावातील लोकांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही अंधारात आणि चिखलात चालावे लागत आहे. भारत-नेपाळ सीमेवरील श्रावस्तीच्या ककरदरी गावात ईशान्येला पर्वत, उत्तरेला नेपाळची सीमा, पश्चिम-दक्षिण भागात राप्ती नदी आणि आग्नेय भागात घनदाट जंगले आहेत. त्याची एकूण लोकसंख्या साडेतीन हजारांहून अधिक असून एकूण मतदारांची संख्या सुमारे 1570 आहे.

या गावात ना वीज आहे ना रस्ता. अंधारात जगणे आणि चिखलात चालणे हे येथील ग्रामस्थांनी आता स्वीकारले आहे. त्याचबरोबर या गावातील नवीन पिढीला देश आणि राज्यातील सरकारकडून मोठ्या आशा आहेत, ज्यांना विश्वास आहे की, येणा-या काळात आपली घरंही विजेने उजळून निघेल आणि आपणही पायी चालत जाऊ शकू. रस्ते शासनाच्या योजना या गावापर्यंत पोहोचल्याच नाहीत असे नाही. योजना आल्या पण जबाबदाऱ्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या अभावामुळे आणि सरकारी विभागांमधील संघर्षामुळे ते प्रत्यक्षात उतरू शकले नाहीत.

2011 मध्ये शासनाने या गावाला वीज देण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे ककरदरी गावात विजेचे खांब गेले, खांबावर ताराही लोंबकळत होत्या, मात्र वीज विभाग आणि वनविभाग यांच्यात असलेल्या संघर्षामुळे ककरदरी गावात आजपर्यंत विद्युतप्रवाह सुरू झालेला नाही. हे खांब ककरदरी गावापासून जंगलाच्या आतपर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र जंगलात असलेले विजेचे काही खांब अज्ञात व्यक्तींनी रातोरात उखडून काढले होते. 

ककरदरीपर्यंत पोहोचण्याबाबत बोलायचं झालं तर सार्वजनिक बांधकाम विभागाने जामुन्हा ते ककरदरी गावापर्यंतचा पक्का रस्ता मंजूर केला असला तरी त्याचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही. दुसरीकडे ककरदारीच्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ ते पुढील शिक्षणासाठी 15 किमी अंतरावर असलेल्या मल्हीपूर आणि जामुन्हा येथे जाण्यासाठी घनदाट जंगल पार करावे लागते. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधीही या प्रकरणात रस घेत नसल्याने ककरदरी येथील रहिवाशांची फसवणूक झाल्याची भावना व्यक्त होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :electricityवीजSchoolशाळाroad transportरस्ते वाहतूक